शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

पांढुर्ण्यासह परिसरात सोयाबीनला शेंगाच नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:24 IST

पांढुर्णा: यंदा परिसरात अति पाऊस झाल्याने, हजारो हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. असे असताना सद्यस्थितीत सोयाबीनच्या पिकाला शेंगाच ...

पांढुर्णा: यंदा परिसरात अति पाऊस झाल्याने, हजारो हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. असे असताना सद्यस्थितीत सोयाबीनच्या पिकाला शेंगाच नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. काही शेतात शेंगांचे प्रमाण कमी दिसून येत आहेत. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. लागवडीचा खर्चही वसूल होत नसल्याचे चित्र असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

पातूर तालुक्यातील पांढुर्णा शिवारात शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाला पसंती दिल्याने मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली आहे. परिसरातील अनेक शेतांत सोयाबीनला शेंगा न लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अतिवृष्टी व अति पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेल्या मूग, उडीद पिकाचे नुकसान झाले आहे. परिसरात संबंधित विभागाकडून पंचनामे झाले. मात्र, अद्याप आर्थिक मदत मिळाली नाही. सोयाबीन पीक फुलोरा अवस्थेत असताना, अतिवृष्टी झाल्याने फुलगळ झाली आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाला शेंगा लागल्या नसल्याचा तर्क काढण्यात येत आहे. काही शेतात शेंगांची संख्या कमी असल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

------------------------------

अतिवृष्टीमुळे नुकसान, मदत मिळाली नाही

जुलै महिन्यात तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने, खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. परिसरात पंचनामे झाले. मात्र, अद्यापही आर्थिक मदत मिळाली नाही. शेतकरी संकटात असल्याने त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

-------------------------------

पीकविम्याचा लाभ देण्याची मागणी

परिसरात खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशातच सोयाबीनला शेंगा लागल्याच नसल्याने उत्पादन घटणार आहे. त्यामुळे या भागात संबंधित विभागाने सर्व्हे करून पीकविम्याचा लाभ देण्याची मागणी होत आहे.