शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

पांढुर्ण्यासह परिसरात सोयाबीनला शेंगाच नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:24 IST

पांढुर्णा: यंदा परिसरात अति पाऊस झाल्याने, हजारो हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. असे असताना सद्यस्थितीत सोयाबीनच्या पिकाला शेंगाच ...

पांढुर्णा: यंदा परिसरात अति पाऊस झाल्याने, हजारो हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. असे असताना सद्यस्थितीत सोयाबीनच्या पिकाला शेंगाच नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. काही शेतात शेंगांचे प्रमाण कमी दिसून येत आहेत. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. लागवडीचा खर्चही वसूल होत नसल्याचे चित्र असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

पातूर तालुक्यातील पांढुर्णा शिवारात शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाला पसंती दिल्याने मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली आहे. परिसरातील अनेक शेतांत सोयाबीनला शेंगा न लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अतिवृष्टी व अति पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेल्या मूग, उडीद पिकाचे नुकसान झाले आहे. परिसरात संबंधित विभागाकडून पंचनामे झाले. मात्र, अद्याप आर्थिक मदत मिळाली नाही. सोयाबीन पीक फुलोरा अवस्थेत असताना, अतिवृष्टी झाल्याने फुलगळ झाली आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाला शेंगा लागल्या नसल्याचा तर्क काढण्यात येत आहे. काही शेतात शेंगांची संख्या कमी असल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

------------------------------

अतिवृष्टीमुळे नुकसान, मदत मिळाली नाही

जुलै महिन्यात तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने, खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. परिसरात पंचनामे झाले. मात्र, अद्यापही आर्थिक मदत मिळाली नाही. शेतकरी संकटात असल्याने त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

-------------------------------

पीकविम्याचा लाभ देण्याची मागणी

परिसरात खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशातच सोयाबीनला शेंगा लागल्याच नसल्याने उत्पादन घटणार आहे. त्यामुळे या भागात संबंधित विभागाने सर्व्हे करून पीकविम्याचा लाभ देण्याची मागणी होत आहे.