शहरं
Join us  
Trending Stories
1
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
2
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
3
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
4
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
5
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
6
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
7
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
8
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
9
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
10
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
11
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
12
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
13
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
14
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
15
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
16
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
17
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
18
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
19
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
20
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?

...तर लुटारूंच्या फौजा उभ्या राहतील!

By admin | Updated: June 24, 2016 00:45 IST

जिल्हा परिषदेतील मोफत बियाणे वाटप कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर यांचे प्रतिपादन.

अकोला: सरकार व्यापार्‍यांच्या हिताचे निर्णय घेत असल्याचा आरोप करीत, शेतकर्‍यांच्या शेतमालास बाजारमूल्य मिळाले नाही, तर लुटारूंच्या फौजा उभ्या राहतील, असे प्रतिपादन भारिप-बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा अँड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी येथे केले. जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित शेतकर्‍यांना मोफत कपाशी बियाणे वाटप कार्यक्रमात अँड. आंबेडकर बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार बळीराम सिरस्कार, भारिप-बमसंचे जिल्हा कार्याध्यक्ष काशीराम साबळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष गुलाम हुसेन देशमुख, सभापती रामदास मालवे, गोदावरी जाधव, द्रौपदा वाहोकार, गटनेता विजय लव्हाळे, सदस्य गोपाल कोल्हे, जमीरउल्ला पठाण, संध्या वाघोडे, रेखा अंभोरे, शबीना खातून सैफुल्लाखाँ, ज्ञानेश्‍वर सुलताने, बळीराम चिकटे उपस्थित होते. दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी सरकारने काहीच केले नसून, शेतकर्‍यांच्या दृष्टीने राज्य सरकार संवेदनशील नसल्याचा आरोप अँड. आंबेडकर यांनी केला. व्यापारासाठी मार्केट उभारण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला; मात्र शेतकर्‍यांच्या शेतमालास बाजारमूल्य उपलब्ध करून देण्यासाठी कोणतेही धोरण ठरविण्यात येत नसल्याचे सांगत, शेतकर्‍यांच्या शेतमालास बाजारमूल्य न मिळाल्यास लुटारूंच्या फौजा तयार होतील, असा इशारा त्यांनी दिला. जिल्हा परिषद सेस फंडातून अल्पभूधारक शेतकर्‍यांना मोफत बियाणे वाटपाची योजना राबविण्यात येत असून, या माध्यमातून दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या योजनेत पुढील वर्षी बियाण्यासोबतच खतवाटपाचा समावेश करण्याचा सुतोवाच त्यांनी केला. लागवडीचा खर्च कमी कसा होईल, याच दिशेने यापुढे जिल्हा परिषद वाटचाल करणार असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले. अनेक अडथळे पार करून, जिल्हा परिषदमार्फत मोफत बियाणे वाटपाची योजना मार्गी लागली असून, समन्वय आणि सहकार्याची भूमिका घेऊन योजना राबविण्यात आल्या पाहिजे, असे विचार आ. बळीराम सिरस्कार यांनी यावेळी मांडले.