शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

...तर लुटारूंच्या फौजा उभ्या राहतील!

By admin | Updated: June 24, 2016 00:45 IST

जिल्हा परिषदेतील मोफत बियाणे वाटप कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर यांचे प्रतिपादन.

अकोला: सरकार व्यापार्‍यांच्या हिताचे निर्णय घेत असल्याचा आरोप करीत, शेतकर्‍यांच्या शेतमालास बाजारमूल्य मिळाले नाही, तर लुटारूंच्या फौजा उभ्या राहतील, असे प्रतिपादन भारिप-बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा अँड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी येथे केले. जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित शेतकर्‍यांना मोफत कपाशी बियाणे वाटप कार्यक्रमात अँड. आंबेडकर बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार बळीराम सिरस्कार, भारिप-बमसंचे जिल्हा कार्याध्यक्ष काशीराम साबळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष गुलाम हुसेन देशमुख, सभापती रामदास मालवे, गोदावरी जाधव, द्रौपदा वाहोकार, गटनेता विजय लव्हाळे, सदस्य गोपाल कोल्हे, जमीरउल्ला पठाण, संध्या वाघोडे, रेखा अंभोरे, शबीना खातून सैफुल्लाखाँ, ज्ञानेश्‍वर सुलताने, बळीराम चिकटे उपस्थित होते. दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी सरकारने काहीच केले नसून, शेतकर्‍यांच्या दृष्टीने राज्य सरकार संवेदनशील नसल्याचा आरोप अँड. आंबेडकर यांनी केला. व्यापारासाठी मार्केट उभारण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला; मात्र शेतकर्‍यांच्या शेतमालास बाजारमूल्य उपलब्ध करून देण्यासाठी कोणतेही धोरण ठरविण्यात येत नसल्याचे सांगत, शेतकर्‍यांच्या शेतमालास बाजारमूल्य न मिळाल्यास लुटारूंच्या फौजा तयार होतील, असा इशारा त्यांनी दिला. जिल्हा परिषद सेस फंडातून अल्पभूधारक शेतकर्‍यांना मोफत बियाणे वाटपाची योजना राबविण्यात येत असून, या माध्यमातून दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या योजनेत पुढील वर्षी बियाण्यासोबतच खतवाटपाचा समावेश करण्याचा सुतोवाच त्यांनी केला. लागवडीचा खर्च कमी कसा होईल, याच दिशेने यापुढे जिल्हा परिषद वाटचाल करणार असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले. अनेक अडथळे पार करून, जिल्हा परिषदमार्फत मोफत बियाणे वाटपाची योजना मार्गी लागली असून, समन्वय आणि सहकार्याची भूमिका घेऊन योजना राबविण्यात आल्या पाहिजे, असे विचार आ. बळीराम सिरस्कार यांनी यावेळी मांडले.