शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

...तर लुटारूंच्या फौजा उभ्या राहतील!

By admin | Updated: June 24, 2016 00:45 IST

जिल्हा परिषदेतील मोफत बियाणे वाटप कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर यांचे प्रतिपादन.

अकोला: सरकार व्यापार्‍यांच्या हिताचे निर्णय घेत असल्याचा आरोप करीत, शेतकर्‍यांच्या शेतमालास बाजारमूल्य मिळाले नाही, तर लुटारूंच्या फौजा उभ्या राहतील, असे प्रतिपादन भारिप-बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा अँड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी येथे केले. जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित शेतकर्‍यांना मोफत कपाशी बियाणे वाटप कार्यक्रमात अँड. आंबेडकर बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार बळीराम सिरस्कार, भारिप-बमसंचे जिल्हा कार्याध्यक्ष काशीराम साबळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष गुलाम हुसेन देशमुख, सभापती रामदास मालवे, गोदावरी जाधव, द्रौपदा वाहोकार, गटनेता विजय लव्हाळे, सदस्य गोपाल कोल्हे, जमीरउल्ला पठाण, संध्या वाघोडे, रेखा अंभोरे, शबीना खातून सैफुल्लाखाँ, ज्ञानेश्‍वर सुलताने, बळीराम चिकटे उपस्थित होते. दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी सरकारने काहीच केले नसून, शेतकर्‍यांच्या दृष्टीने राज्य सरकार संवेदनशील नसल्याचा आरोप अँड. आंबेडकर यांनी केला. व्यापारासाठी मार्केट उभारण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला; मात्र शेतकर्‍यांच्या शेतमालास बाजारमूल्य उपलब्ध करून देण्यासाठी कोणतेही धोरण ठरविण्यात येत नसल्याचे सांगत, शेतकर्‍यांच्या शेतमालास बाजारमूल्य न मिळाल्यास लुटारूंच्या फौजा तयार होतील, असा इशारा त्यांनी दिला. जिल्हा परिषद सेस फंडातून अल्पभूधारक शेतकर्‍यांना मोफत बियाणे वाटपाची योजना राबविण्यात येत असून, या माध्यमातून दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या योजनेत पुढील वर्षी बियाण्यासोबतच खतवाटपाचा समावेश करण्याचा सुतोवाच त्यांनी केला. लागवडीचा खर्च कमी कसा होईल, याच दिशेने यापुढे जिल्हा परिषद वाटचाल करणार असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले. अनेक अडथळे पार करून, जिल्हा परिषदमार्फत मोफत बियाणे वाटपाची योजना मार्गी लागली असून, समन्वय आणि सहकार्याची भूमिका घेऊन योजना राबविण्यात आल्या पाहिजे, असे विचार आ. बळीराम सिरस्कार यांनी यावेळी मांडले.