शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांना परीक्षेची धडकी

By admin | Updated: April 27, 2015 01:40 IST

निकाल चांगले लागावे म्हणून पुन्हा घ्यावे लागणार परिश्रम.

विवेक चांदूरकर/अकोला: पहिली ते आठवीपर्यंतच्या ढकलगाडी शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असले, तरी शिक्षक मात्र आनंदात होते. २0१५-१६ च्या सत्रापासून विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार असल्याचे सुतोवाच मंत्र्यांनी करताच शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून, शिक्षकांना धडकी भरली आहे. शाळांचा निकाल चांगला लागण्याकरिता आता शिक्षकांना परिश्रम घ्यावे लागणार आहेत. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नुकतीच पुढील वर्षांपासून विद्यार्थ्यांची पूर्वीप्रमाणेच परीक्षा होणार असल्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयावर सर्वत्र चर्चा व्हायला लागली आहे. शासनाच्या या नव्या निर्णयामुळे गुणवत्ता नसताना वरच्या श्रेणीत ढकलगाडी करणार्‍या गुरुजींना चाप बसणार आहे. शिक्षण प्रशासनाला परीक्षा घेऊन गुणवत्ता निश्‍चित करावी लागणार आहे. परीक्षा व्यवस्था शिक्षण प्रशासनाच्या नियंत्रणाखाली होणार असल्याने गुणवत्तेचा आलेख नेमका समोर येणार आहे. पुढील वर्षीपासून विद्यार्थ्यांना तीन परीक्षा द्याव्या लागणार आहेत. यामध्ये पहिली परीक्षा प्रवेश घेताना, दुसरी परीक्षा दिवाळीमध्ये तर तिसरी परीक्षा उन्हाळ्यात होणार आहे. मोफत आणि हक्काचे शिक्षण कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतर पारंपरिक शिक्षणाच्या ढाच्यामध्ये बदल झाले. कायद्यातील निकषांच्या आधारे सन २00९ पासून एक ते आठपर्यंत सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीची अंमलबजावणी सुरू केली. यामध्ये वार्षिक परीक्षेत नापास झाल्यानंतर पुन्हा त्याच वर्गात बसविणे बंद केले. विद्यार्थी कसा शिकतो, त्याला काय चांगले येते, कोठे अडचण आहे, आकलन, उपाययोजना, विचारशीलता, सर्जनशीलता या पातळ्यांवर मूल्यमापन करण्यात येत आहे. शाळा पातळीवरच प्रश्नपत्रिका तयार करून दैनंदिन नोंदवहीतील प्रगती व परीक्षेतील गुण यानुसार संबंधित विद्यार्थी कोणत्या श्रेणीत आहे, हे निश्‍चित केले जाते. अ, ब, क, ड आणि इ अशा श्रेणी आहेत. ड आणि इ श्रेणींमधील विद्यार्थ्यांना मागास समजल्या जाते. दरम्यान माध्यमिक शिक्षण अधिकारी अशोक सोनोने यांनी शिक्षणमंत्र्यांनी पुढील वर्षीपासून प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचे सुतोवाच केले असल्याचे स्पष्ट केले. मात्र, अद्याप आमच्यापर्यंत तसे काही आदेश आले नसल्याचे सांगीतले.