शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
4
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
5
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
6
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
7
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
8
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
9
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
10
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
11
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
12
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
13
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
14
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
15
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
16
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
17
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
18
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
19
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
20
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार

शिक्षकांना परीक्षेची धडकी

By admin | Updated: April 27, 2015 01:40 IST

निकाल चांगले लागावे म्हणून पुन्हा घ्यावे लागणार परिश्रम.

विवेक चांदूरकर/अकोला: पहिली ते आठवीपर्यंतच्या ढकलगाडी शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असले, तरी शिक्षक मात्र आनंदात होते. २0१५-१६ च्या सत्रापासून विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार असल्याचे सुतोवाच मंत्र्यांनी करताच शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून, शिक्षकांना धडकी भरली आहे. शाळांचा निकाल चांगला लागण्याकरिता आता शिक्षकांना परिश्रम घ्यावे लागणार आहेत. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नुकतीच पुढील वर्षांपासून विद्यार्थ्यांची पूर्वीप्रमाणेच परीक्षा होणार असल्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयावर सर्वत्र चर्चा व्हायला लागली आहे. शासनाच्या या नव्या निर्णयामुळे गुणवत्ता नसताना वरच्या श्रेणीत ढकलगाडी करणार्‍या गुरुजींना चाप बसणार आहे. शिक्षण प्रशासनाला परीक्षा घेऊन गुणवत्ता निश्‍चित करावी लागणार आहे. परीक्षा व्यवस्था शिक्षण प्रशासनाच्या नियंत्रणाखाली होणार असल्याने गुणवत्तेचा आलेख नेमका समोर येणार आहे. पुढील वर्षीपासून विद्यार्थ्यांना तीन परीक्षा द्याव्या लागणार आहेत. यामध्ये पहिली परीक्षा प्रवेश घेताना, दुसरी परीक्षा दिवाळीमध्ये तर तिसरी परीक्षा उन्हाळ्यात होणार आहे. मोफत आणि हक्काचे शिक्षण कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतर पारंपरिक शिक्षणाच्या ढाच्यामध्ये बदल झाले. कायद्यातील निकषांच्या आधारे सन २00९ पासून एक ते आठपर्यंत सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीची अंमलबजावणी सुरू केली. यामध्ये वार्षिक परीक्षेत नापास झाल्यानंतर पुन्हा त्याच वर्गात बसविणे बंद केले. विद्यार्थी कसा शिकतो, त्याला काय चांगले येते, कोठे अडचण आहे, आकलन, उपाययोजना, विचारशीलता, सर्जनशीलता या पातळ्यांवर मूल्यमापन करण्यात येत आहे. शाळा पातळीवरच प्रश्नपत्रिका तयार करून दैनंदिन नोंदवहीतील प्रगती व परीक्षेतील गुण यानुसार संबंधित विद्यार्थी कोणत्या श्रेणीत आहे, हे निश्‍चित केले जाते. अ, ब, क, ड आणि इ अशा श्रेणी आहेत. ड आणि इ श्रेणींमधील विद्यार्थ्यांना मागास समजल्या जाते. दरम्यान माध्यमिक शिक्षण अधिकारी अशोक सोनोने यांनी शिक्षणमंत्र्यांनी पुढील वर्षीपासून प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचे सुतोवाच केले असल्याचे स्पष्ट केले. मात्र, अद्याप आमच्यापर्यंत तसे काही आदेश आले नसल्याचे सांगीतले.