शहरं
Join us  
Trending Stories
1
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
2
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
3
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
4
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
5
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
7
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
8
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
9
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
10
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
11
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
12
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
13
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
14
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
15
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
16
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
17
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
18
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
19
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
20
श्वेता तिवारीला एक्स पतीने कारमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं रंगेहाथ, राजा चौधरीचा खुलासा

शिक्षकांना परीक्षेची धडकी

By admin | Updated: April 27, 2015 01:40 IST

निकाल चांगले लागावे म्हणून पुन्हा घ्यावे लागणार परिश्रम.

विवेक चांदूरकर/अकोला: पहिली ते आठवीपर्यंतच्या ढकलगाडी शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असले, तरी शिक्षक मात्र आनंदात होते. २0१५-१६ च्या सत्रापासून विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार असल्याचे सुतोवाच मंत्र्यांनी करताच शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून, शिक्षकांना धडकी भरली आहे. शाळांचा निकाल चांगला लागण्याकरिता आता शिक्षकांना परिश्रम घ्यावे लागणार आहेत. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नुकतीच पुढील वर्षांपासून विद्यार्थ्यांची पूर्वीप्रमाणेच परीक्षा होणार असल्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयावर सर्वत्र चर्चा व्हायला लागली आहे. शासनाच्या या नव्या निर्णयामुळे गुणवत्ता नसताना वरच्या श्रेणीत ढकलगाडी करणार्‍या गुरुजींना चाप बसणार आहे. शिक्षण प्रशासनाला परीक्षा घेऊन गुणवत्ता निश्‍चित करावी लागणार आहे. परीक्षा व्यवस्था शिक्षण प्रशासनाच्या नियंत्रणाखाली होणार असल्याने गुणवत्तेचा आलेख नेमका समोर येणार आहे. पुढील वर्षीपासून विद्यार्थ्यांना तीन परीक्षा द्याव्या लागणार आहेत. यामध्ये पहिली परीक्षा प्रवेश घेताना, दुसरी परीक्षा दिवाळीमध्ये तर तिसरी परीक्षा उन्हाळ्यात होणार आहे. मोफत आणि हक्काचे शिक्षण कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतर पारंपरिक शिक्षणाच्या ढाच्यामध्ये बदल झाले. कायद्यातील निकषांच्या आधारे सन २00९ पासून एक ते आठपर्यंत सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीची अंमलबजावणी सुरू केली. यामध्ये वार्षिक परीक्षेत नापास झाल्यानंतर पुन्हा त्याच वर्गात बसविणे बंद केले. विद्यार्थी कसा शिकतो, त्याला काय चांगले येते, कोठे अडचण आहे, आकलन, उपाययोजना, विचारशीलता, सर्जनशीलता या पातळ्यांवर मूल्यमापन करण्यात येत आहे. शाळा पातळीवरच प्रश्नपत्रिका तयार करून दैनंदिन नोंदवहीतील प्रगती व परीक्षेतील गुण यानुसार संबंधित विद्यार्थी कोणत्या श्रेणीत आहे, हे निश्‍चित केले जाते. अ, ब, क, ड आणि इ अशा श्रेणी आहेत. ड आणि इ श्रेणींमधील विद्यार्थ्यांना मागास समजल्या जाते. दरम्यान माध्यमिक शिक्षण अधिकारी अशोक सोनोने यांनी शिक्षणमंत्र्यांनी पुढील वर्षीपासून प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचे सुतोवाच केले असल्याचे स्पष्ट केले. मात्र, अद्याप आमच्यापर्यंत तसे काही आदेश आले नसल्याचे सांगीतले.