शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांच्या वेदनांना बोलतं करावं

By admin | Updated: December 6, 2014 00:51 IST

आंतरराष्ट्रीय शेतकरी परिसंवाद: आत्महत्यांची दाहकता व्यथित करून गेली.

अकोला: शेती केवळ व्यवसाय नाही, तर ती जीवनपद्धती आहे. माती, बी-बियाणे, खते यासह तंत्रज्ञानावर लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र केवळ तंत्रज्ञानाने शेतकर्‍यांचे प्रश्न सुटू शकणार नाहीत. कारण युरोप खंडातील प्रगत देशांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान असतानादेखील तेथेही शेतकर्‍यांच्या आत्महत्येचा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्यांची एक मानवी प्रश्न म्हणून संवेदनशीलतेने उकल करण्याची गरज कृषी विद्यापीठात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय कृषी संवादातील शुक्रवार रोजी झालेल्या तिसर्‍या परिसंवादात तज्ज्ञांनी व्यक्त केली. या परिसंवादात ह्यसमस्याग्रस्त शेतकर्‍यांसाठी सामाजिक साखळीह्ण या विषयावर कोलिन आणि मोनिका हॉवर्थ, इंग्लंड येथील वृद्ध शेतकरी दाम्पत्याने त्यांचे अनुभव मांडले. शेतकर्‍यांच्या आत्महत्येच्या प्रश्न केवळ भारतात नसून, जगभरात भेडसावत असल्याचे वास्तव त्यांनी मांडले. आर्थिक विवंचनेतून त्यांच्या ३२ वर्षीय मुलाने १२ वर्षांपूवी आत्महत्या केली असल्याचे सांगितले. मुलाच्या आत्महत्येची वेदना आणि जखमा आजही ओल्याच आहेत; मात्र त्या वेदना परिस्थितीशी झगडण्याचे बळ देऊन गेल्याचे त्या म्हणाल्या. आज शेतकर्‍यांना बळ आणि मानसिक आधार देणारी संस्था त्या चालवित असल्याचे त्यांनी सांगितले. आज जीवनाची गणिते अर्थकेंद्रित झाली असल्याचे सांगून त्यांनी एका शेतकरी आत्महत्येमुळे होणार्‍या हानीचे गणित मांडले. त्यांच्या आकलनानुसार एका आत्महत्येमुळे कुटुंबाचे, राज्याचे पर्यायाने देशाचे १४ कोटी रुपये नुकसान होत असल्याचा त्यांनी अंदाज मांडला. त्यासोबत कुटुंबीयांना होणार्‍या वेदना, मित्र आणि सहकार्‍यांच्या होणारी पीडा शब्दातीत असतात. आत्महत्या करणार्‍या दर चारपैकी एका व्यक्तीस गंभीर मानसिक विकार असून, इंग्लंडमध्ये होणार्‍या आत्महत्येमध्ये शेतकर्‍यांच्या आत्महत्येची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे तेथील सरकारने शेतीचा सर्वात धोकादायक व्यवसायात समावेश केला असल्याचे त्यांनी नमूद केले. इंग्लंडमध्ये आत्महत्या हा गुन्हा नाही. त्यामुळे आत्महत्याग्रस्त कुटुंबाची अवहेलना होत नसल्याचे त्या म्हणाल्या. वेदनेची पीडा जाणवल्याशिवाय त्या वेदनेतून बाहेर पडण्याचा मार्गदेखील मिळणार नाही. त्यामुळे शेतकर्‍यांची वेदना जाणावी जेणेकरून त्यांच्या समस्येचे खरे आणि दुरगामी निदान शक्य होऊ शकेल, असे परिसंवादाचे अध्यक्ष क्लाऊड बॉडीन यांनी स्पष्ट केले. डॉ. एस. एस. वंजारी, मुस्ताफिना फेरुझा व इनिशिएटिव्ह फॉर चेंज संस्थेचे अभय शाह यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. या परिसंवादात डॉ. संजय भोयर, युगांडा येथील प्रगतिशील शेतकरी फरिदा किकोमेको, सुनंदा सलोदकर आणि ललित बहाले यांनी सहभाग नोंदविला.