शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
5
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
6
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
7
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
8
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
9
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
10
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
11
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
12
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
13
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
14
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
15
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
16
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
17
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
18
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
19
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
20
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले

शेतक-यांच्या वेदनांना बोलतं करावं

By admin | Updated: December 6, 2014 00:51 IST

आंतरराष्ट्रीय शेतकरी परिसंवाद: आत्महत्यांची दाहकता व्यथित करून गेली.

अकोला: शेती केवळ व्यवसाय नाही, तर ती जीवनपद्धती आहे. माती, बी-बियाणे, खते यासह तंत्रज्ञानावर लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र केवळ तंत्रज्ञानाने शेतकर्‍यांचे प्रश्न सुटू शकणार नाहीत. कारण युरोप खंडातील प्रगत देशांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान असतानादेखील तेथेही शेतकर्‍यांच्या आत्महत्येचा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्यांची एक मानवी प्रश्न म्हणून संवेदनशीलतेने उकल करण्याची गरज कृषी विद्यापीठात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय कृषी संवादातील शुक्रवार रोजी झालेल्या तिसर्‍या परिसंवादात तज्ज्ञांनी व्यक्त केली. या परिसंवादात ह्यसमस्याग्रस्त शेतकर्‍यांसाठी सामाजिक साखळीह्ण या विषयावर कोलिन आणि मोनिका हॉवर्थ, इंग्लंड येथील वृद्ध शेतकरी दाम्पत्याने त्यांचे अनुभव मांडले. शेतकर्‍यांच्या आत्महत्येच्या प्रश्न केवळ भारतात नसून, जगभरात भेडसावत असल्याचे वास्तव त्यांनी मांडले. आर्थिक विवंचनेतून त्यांच्या ३२ वर्षीय मुलाने १२ वर्षांपूवी आत्महत्या केली असल्याचे सांगितले. मुलाच्या आत्महत्येची वेदना आणि जखमा आजही ओल्याच आहेत; मात्र त्या वेदना परिस्थितीशी झगडण्याचे बळ देऊन गेल्याचे त्या म्हणाल्या. आज शेतकर्‍यांना बळ आणि मानसिक आधार देणारी संस्था त्या चालवित असल्याचे त्यांनी सांगितले. आज जीवनाची गणिते अर्थकेंद्रित झाली असल्याचे सांगून त्यांनी एका शेतकरी आत्महत्येमुळे होणार्‍या हानीचे गणित मांडले. त्यांच्या आकलनानुसार एका आत्महत्येमुळे कुटुंबाचे, राज्याचे पर्यायाने देशाचे १४ कोटी रुपये नुकसान होत असल्याचा त्यांनी अंदाज मांडला. त्यासोबत कुटुंबीयांना होणार्‍या वेदना, मित्र आणि सहकार्‍यांच्या होणारी पीडा शब्दातीत असतात. आत्महत्या करणार्‍या दर चारपैकी एका व्यक्तीस गंभीर मानसिक विकार असून, इंग्लंडमध्ये होणार्‍या आत्महत्येमध्ये शेतकर्‍यांच्या आत्महत्येची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे तेथील सरकारने शेतीचा सर्वात धोकादायक व्यवसायात समावेश केला असल्याचे त्यांनी नमूद केले. इंग्लंडमध्ये आत्महत्या हा गुन्हा नाही. त्यामुळे आत्महत्याग्रस्त कुटुंबाची अवहेलना होत नसल्याचे त्या म्हणाल्या. वेदनेची पीडा जाणवल्याशिवाय त्या वेदनेतून बाहेर पडण्याचा मार्गदेखील मिळणार नाही. त्यामुळे शेतकर्‍यांची वेदना जाणावी जेणेकरून त्यांच्या समस्येचे खरे आणि दुरगामी निदान शक्य होऊ शकेल, असे परिसंवादाचे अध्यक्ष क्लाऊड बॉडीन यांनी स्पष्ट केले. डॉ. एस. एस. वंजारी, मुस्ताफिना फेरुझा व इनिशिएटिव्ह फॉर चेंज संस्थेचे अभय शाह यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. या परिसंवादात डॉ. संजय भोयर, युगांडा येथील प्रगतिशील शेतकरी फरिदा किकोमेको, सुनंदा सलोदकर आणि ललित बहाले यांनी सहभाग नोंदविला.