शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

शेतक-यांच्या वेदनांना बोलतं करावं

By admin | Updated: December 6, 2014 00:51 IST

आंतरराष्ट्रीय शेतकरी परिसंवाद: आत्महत्यांची दाहकता व्यथित करून गेली.

अकोला: शेती केवळ व्यवसाय नाही, तर ती जीवनपद्धती आहे. माती, बी-बियाणे, खते यासह तंत्रज्ञानावर लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र केवळ तंत्रज्ञानाने शेतकर्‍यांचे प्रश्न सुटू शकणार नाहीत. कारण युरोप खंडातील प्रगत देशांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान असतानादेखील तेथेही शेतकर्‍यांच्या आत्महत्येचा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्यांची एक मानवी प्रश्न म्हणून संवेदनशीलतेने उकल करण्याची गरज कृषी विद्यापीठात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय कृषी संवादातील शुक्रवार रोजी झालेल्या तिसर्‍या परिसंवादात तज्ज्ञांनी व्यक्त केली. या परिसंवादात ह्यसमस्याग्रस्त शेतकर्‍यांसाठी सामाजिक साखळीह्ण या विषयावर कोलिन आणि मोनिका हॉवर्थ, इंग्लंड येथील वृद्ध शेतकरी दाम्पत्याने त्यांचे अनुभव मांडले. शेतकर्‍यांच्या आत्महत्येच्या प्रश्न केवळ भारतात नसून, जगभरात भेडसावत असल्याचे वास्तव त्यांनी मांडले. आर्थिक विवंचनेतून त्यांच्या ३२ वर्षीय मुलाने १२ वर्षांपूवी आत्महत्या केली असल्याचे सांगितले. मुलाच्या आत्महत्येची वेदना आणि जखमा आजही ओल्याच आहेत; मात्र त्या वेदना परिस्थितीशी झगडण्याचे बळ देऊन गेल्याचे त्या म्हणाल्या. आज शेतकर्‍यांना बळ आणि मानसिक आधार देणारी संस्था त्या चालवित असल्याचे त्यांनी सांगितले. आज जीवनाची गणिते अर्थकेंद्रित झाली असल्याचे सांगून त्यांनी एका शेतकरी आत्महत्येमुळे होणार्‍या हानीचे गणित मांडले. त्यांच्या आकलनानुसार एका आत्महत्येमुळे कुटुंबाचे, राज्याचे पर्यायाने देशाचे १४ कोटी रुपये नुकसान होत असल्याचा त्यांनी अंदाज मांडला. त्यासोबत कुटुंबीयांना होणार्‍या वेदना, मित्र आणि सहकार्‍यांच्या होणारी पीडा शब्दातीत असतात. आत्महत्या करणार्‍या दर चारपैकी एका व्यक्तीस गंभीर मानसिक विकार असून, इंग्लंडमध्ये होणार्‍या आत्महत्येमध्ये शेतकर्‍यांच्या आत्महत्येची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे तेथील सरकारने शेतीचा सर्वात धोकादायक व्यवसायात समावेश केला असल्याचे त्यांनी नमूद केले. इंग्लंडमध्ये आत्महत्या हा गुन्हा नाही. त्यामुळे आत्महत्याग्रस्त कुटुंबाची अवहेलना होत नसल्याचे त्या म्हणाल्या. वेदनेची पीडा जाणवल्याशिवाय त्या वेदनेतून बाहेर पडण्याचा मार्गदेखील मिळणार नाही. त्यामुळे शेतकर्‍यांची वेदना जाणावी जेणेकरून त्यांच्या समस्येचे खरे आणि दुरगामी निदान शक्य होऊ शकेल, असे परिसंवादाचे अध्यक्ष क्लाऊड बॉडीन यांनी स्पष्ट केले. डॉ. एस. एस. वंजारी, मुस्ताफिना फेरुझा व इनिशिएटिव्ह फॉर चेंज संस्थेचे अभय शाह यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. या परिसंवादात डॉ. संजय भोयर, युगांडा येथील प्रगतिशील शेतकरी फरिदा किकोमेको, सुनंदा सलोदकर आणि ललित बहाले यांनी सहभाग नोंदविला.