शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
8
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
9
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
10
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
11
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
12
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
13
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
14
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
17
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
18
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
19
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
20
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

पातूर तालुक्यात वर्षभरात २८ शेतक-यांच्या आत्महत्या

By admin | Updated: December 26, 2014 01:05 IST

फक्त ११ शेतकरी आत्महत्या मदतीस पात्र : सन २00२ पासून १८३ शेतकरी आत्महत्येच्या घटना.

संजय गोतरकर / पातूर (अकोला )पातूर तालुक्यातील शेतकर्‍यांवर निसर्गाच्या अवकृपेने सतत होणारी नापिकी, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव न मिळणे, सावकार व बँकांची कर्जफेड न होणे यामुळे तालुक्यात दरवर्षी शेतकरी आत्महत्या होत आहेत. यावर्षी आतापर्यंत तालुक्यातील २८ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी ११ शेतकरी आत्महत्या शासनाच्या मदतीच्या निकषावर पात्र ठरल्या आहेत. तब्बल १७ आत्महत्या शासनाच्या मदतीच्या निकषांवर अपात्र ठरल्याने, मृत शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत मिळालेली नाही. निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी अतवृष्टी, तर कधी अत्यल्प पावसामुळे शेतकर्‍यांचे नियोजन कोलमडले आहे. परिणामी, कोरडवाहू शेती ही आर्थिक जुगार ठरत आहे. तालुक्यात कोरडवाहू शेतकरी प्रामुख्याने सोयाबीनचे पीक घेतो. यावर्षी अल्प पावसामुळे पिकाचा उतारा फारच अल्प आला आहे. एकरी अर्धा ते दीड क्विंटल असे उत्पादन झाल्याने आता करावे तरी काय, असा त्यांच्यापुढे प्रश्न आहे. पातूर तालुक्यात सन २00२ ते २00१३ दरम्यान १५५ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. यामध्ये ६८ शेतकर्‍यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळाली, तर ८७ प्रकरणे अपात्र ठरली. यावर्षी आतापर्यंत तालुक्यात २८ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये २१ पुरुष व सात महिला शेतकर्‍यांचा समावेश आहे. यापैकी ११ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे शासनाच्या मदतीस पात्र, तर १७ प्रकरणे अपात्र ठरली आहेत.