शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
2
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
3
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
4
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
5
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
6
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
7
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
8
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
9
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
10
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
11
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
12
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
13
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
14
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!
15
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
16
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
17
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
18
"मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
19
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
20
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर

पातूर तालुक्यात वर्षभरात २८ शेतक-यांच्या आत्महत्या

By admin | Updated: December 26, 2014 01:05 IST

फक्त ११ शेतकरी आत्महत्या मदतीस पात्र : सन २00२ पासून १८३ शेतकरी आत्महत्येच्या घटना.

संजय गोतरकर / पातूर (अकोला )पातूर तालुक्यातील शेतकर्‍यांवर निसर्गाच्या अवकृपेने सतत होणारी नापिकी, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव न मिळणे, सावकार व बँकांची कर्जफेड न होणे यामुळे तालुक्यात दरवर्षी शेतकरी आत्महत्या होत आहेत. यावर्षी आतापर्यंत तालुक्यातील २८ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी ११ शेतकरी आत्महत्या शासनाच्या मदतीच्या निकषावर पात्र ठरल्या आहेत. तब्बल १७ आत्महत्या शासनाच्या मदतीच्या निकषांवर अपात्र ठरल्याने, मृत शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत मिळालेली नाही. निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी अतवृष्टी, तर कधी अत्यल्प पावसामुळे शेतकर्‍यांचे नियोजन कोलमडले आहे. परिणामी, कोरडवाहू शेती ही आर्थिक जुगार ठरत आहे. तालुक्यात कोरडवाहू शेतकरी प्रामुख्याने सोयाबीनचे पीक घेतो. यावर्षी अल्प पावसामुळे पिकाचा उतारा फारच अल्प आला आहे. एकरी अर्धा ते दीड क्विंटल असे उत्पादन झाल्याने आता करावे तरी काय, असा त्यांच्यापुढे प्रश्न आहे. पातूर तालुक्यात सन २00२ ते २00१३ दरम्यान १५५ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. यामध्ये ६८ शेतकर्‍यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळाली, तर ८७ प्रकरणे अपात्र ठरली. यावर्षी आतापर्यंत तालुक्यात २८ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये २१ पुरुष व सात महिला शेतकर्‍यांचा समावेश आहे. यापैकी ११ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे शासनाच्या मदतीस पात्र, तर १७ प्रकरणे अपात्र ठरली आहेत.