अकोला : जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सन २0१७-१७ या वर्षात जिल्हय़ातील गावांची निवड करण्यासाठी गावांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी संबंधित यंत्रणांना दिले. जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत दरवर्षी निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये ह्यजलयुक्त शिवारह्णची कामे करण्यात येतात. त्यानुषंगाने सन २0१७-१८ या वर्षात जिल्हय़ातील गावांची निवड करून गावनिहाय जलयुक्त शिवार कामांचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने या वर्षात जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत निवड करावयाच्या गावांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश गुरुवारी जिल्हाधिकार्यांनी संबंधित यंत्रणा अधिकार्यांच्या बैठकीत दिले. यावेळी कृषी विभाग, जिल्हा परिषद लघू सिंचन विभाग, जिल्हय़ातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी संबंधित अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकार्यांच्या निर्देशानुसार जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत निवड करावयाच्या गावांचे प्रस्ताव लवकरच सादर करण्यात येणार आहे. या प्रस्तावानुसार पात्र गावांच्या निवड प्रक्रियेनंतर गावनिहाय ह्यजलयुक्त शिवारह्णच्या कामांचा जिल्हा आराखडा तयार करण्यात येणार आहे.
‘जलयुक्त शिवार’साठी गाव निवडीचे प्रस्ताव सादर करा!
By admin | Updated: April 9, 2017 01:29 IST