शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
2
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
3
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
4
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
5
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
7
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
9
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
10
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
11
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
12
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
13
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
14
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
15
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
16
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
17
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
18
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
19
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
20
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट

राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कात मिळणार सवलत?

By admin | Updated: December 25, 2014 23:35 IST

कृषी विद्यापीठाच्या हजारो विद्यार्थ्यांना मिळेल लाभ.

राजरत्न सिरसाट/अकोला: राज्यात उद्भवलेली दुष्काळस्थिती बघता, राज्यशासनाने दुष्काळी भागातील विविध, शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला असून, तसे आदेश संबधीत शिक्षण संस्था, महाविद्यालयांना पाठविले आहेत. कृषी विद्यापीठात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क आकारले जाते, त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कात सलवत मिळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास या निर्णयाचा लाभ डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या हजारो विद्यार्थ्यांना मिळणार आहे.विदर्भातील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आजमितीस पीएचडी, पदव्यूत्तर, पदवी आणि पदविका अभ्यासक्रमासाठी ५,६१५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यात कृषी, कृषी जैवतंज्ञान आणि कृषी अभियांत्रिकी मिळून ५0 विद्यार्थी पीएचडी करीत आहेत. तीन वर्षाच्या या अभ्यासक्रमासाठी या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षासाठी प्रत्येकी ११ हजार ८६ रू पये शिक्षण शुल्क भरावे लागते, तर दुसर्‍या वर्षी ७, ३00 आणि वसतीगृहाचा खर्च मिळून या विद्यार्थ्यांना १४,६८६ रू पये खर्च येतो. कृषीच्या विविध शाखेच्या अभ्यासक्रमाला ४0५ विद्यार्थी आहेत. यातील कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रथम आणि व्दितीय वर्षासाठी प्रत्येकी ४ हजार रू पये शिक्षण शुल्क आहे. कृषी व्यवसाय व्यवस्थापन आणि कृषी जैवतंज्ञत्रान या पदव्यूत्तर शाखेच्या दोन अभ्यासक्रमासाठी या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षाला ५८,५८६ तर व्दितीय वर्षाला २३,३00 रू पये शिक्षण शुल्क भरावे लागतात. कृषी अभ्यासक्रमाच्या २३ खाजगी महाविद्यालयातून विविध शाखेत शिक्षण घेणारे १,३८0 विद्यार्थी असून, कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या ५७ आणि कृषी विद्यापीठाच्या ६ मिळून ६३ कृषी तंत्रज्ञान शाळा आहेत. या शाळामध्ये ३,७८0 विद्यार्थी पदविका अभ्यासक्रमाला आहेत. राज्यातील दुष्काळीस्थिीती बघता, यासर्व विद्यार्थ्यांंना शासनाने शिक्षण शुल्काची सवलत जाहीर केली आहे. या संबधीचे पत्र डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासह नाशिक व अमरावती विभागाला प्राप्त झाल्याची माहिती आहे. डॉ. पंदेकृविचे कृषी अधिष्ठाता डॉ. व्ही.एम.भाले यांनी शासनाचे पत्र प्राप्त झाले असल्याचे सांगून शिक्षण की परीक्षा शुल्क माफ करणार याबाबत आताच काही सांगता येणार नसल्याचे सांगीतले. कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्कच घेतले जात असल्याने शासनाला शिक्षण शुल्क सवलतीचा लाभ विद्यार्थ्यांंना द्यावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.