शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कात मिळणार सवलत?

By admin | Updated: December 25, 2014 23:35 IST

कृषी विद्यापीठाच्या हजारो विद्यार्थ्यांना मिळेल लाभ.

राजरत्न सिरसाट/अकोला: राज्यात उद्भवलेली दुष्काळस्थिती बघता, राज्यशासनाने दुष्काळी भागातील विविध, शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला असून, तसे आदेश संबधीत शिक्षण संस्था, महाविद्यालयांना पाठविले आहेत. कृषी विद्यापीठात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क आकारले जाते, त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कात सलवत मिळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास या निर्णयाचा लाभ डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या हजारो विद्यार्थ्यांना मिळणार आहे.विदर्भातील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आजमितीस पीएचडी, पदव्यूत्तर, पदवी आणि पदविका अभ्यासक्रमासाठी ५,६१५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यात कृषी, कृषी जैवतंज्ञान आणि कृषी अभियांत्रिकी मिळून ५0 विद्यार्थी पीएचडी करीत आहेत. तीन वर्षाच्या या अभ्यासक्रमासाठी या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षासाठी प्रत्येकी ११ हजार ८६ रू पये शिक्षण शुल्क भरावे लागते, तर दुसर्‍या वर्षी ७, ३00 आणि वसतीगृहाचा खर्च मिळून या विद्यार्थ्यांना १४,६८६ रू पये खर्च येतो. कृषीच्या विविध शाखेच्या अभ्यासक्रमाला ४0५ विद्यार्थी आहेत. यातील कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रथम आणि व्दितीय वर्षासाठी प्रत्येकी ४ हजार रू पये शिक्षण शुल्क आहे. कृषी व्यवसाय व्यवस्थापन आणि कृषी जैवतंज्ञत्रान या पदव्यूत्तर शाखेच्या दोन अभ्यासक्रमासाठी या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षाला ५८,५८६ तर व्दितीय वर्षाला २३,३00 रू पये शिक्षण शुल्क भरावे लागतात. कृषी अभ्यासक्रमाच्या २३ खाजगी महाविद्यालयातून विविध शाखेत शिक्षण घेणारे १,३८0 विद्यार्थी असून, कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या ५७ आणि कृषी विद्यापीठाच्या ६ मिळून ६३ कृषी तंत्रज्ञान शाळा आहेत. या शाळामध्ये ३,७८0 विद्यार्थी पदविका अभ्यासक्रमाला आहेत. राज्यातील दुष्काळीस्थिीती बघता, यासर्व विद्यार्थ्यांंना शासनाने शिक्षण शुल्काची सवलत जाहीर केली आहे. या संबधीचे पत्र डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासह नाशिक व अमरावती विभागाला प्राप्त झाल्याची माहिती आहे. डॉ. पंदेकृविचे कृषी अधिष्ठाता डॉ. व्ही.एम.भाले यांनी शासनाचे पत्र प्राप्त झाले असल्याचे सांगून शिक्षण की परीक्षा शुल्क माफ करणार याबाबत आताच काही सांगता येणार नसल्याचे सांगीतले. कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्कच घेतले जात असल्याने शासनाला शिक्षण शुल्क सवलतीचा लाभ विद्यार्थ्यांंना द्यावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.