शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची होरपळ !

By admin | Updated: September 7, 2015 00:04 IST

मेहकर तालुक्यातील आश्रम शाळा दुर्लक्षीत; शैक्षणिक साहित्यापासून विद्यार्थी वंचीत.

मेहकर (जि. बुलडाणा) : आदिवासी विकास विभागाअंतर्गत राज्यात ५४७ आश्रमशाळा असून यामध्ये १ लाख ८७ हजार विद्यार्थी निवासी राहून शिक्षण घेत आहे. बहुतांश आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक सत्राचे शैक्षणिक साहित्य अद्यापपर्यंत मिळाले नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. राज्य शासनाने १९७२ मध्ये आदिवासी विकास विभागाने आदिवासी अपर आयुक्त कार्यालयांतर्गत नाशिक विभागात २२२, ठाण्यात १२३, अमरावतीत १00 आणि नागपूर येथे १0२ अशा एकूण ५४७ आदिवासी मुलांच्या आश्रमशाळा सुरू केल्या. आज रोजी राज्यभरातील आदिवासी आश्रम शाळांमध्ये १ लाख ८७ हजार विद्यार्थी निवासी राहून शिक्षण घेत आहेत. त्यांना प्रत्येक शैक्षणिक वर्षात भाजीपाला, अन्नधान्य, शालेय साहित्य, बूट, गणवेश आदी सुविधा दिल्या जातात; मात्र नवीन शैक्षणिक सत्र २0१५-१६ चालू होवून तीन महिण्याचा काळ लोटला, तरीही आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, कंपासपेटी, रंगपेटी, पाटी, पेन्सिल, फुटपट्ट्या, गणवेशासाठी कापड, बूट मिळालेले नाहीत. धान्य, शालेय साहित्य, गणवेश आणि बूट यांची खरेदीची निविदा प्रक्रिया ३१ मेपयर्ंत पूर्ण होणे अपेक्षित आहे; मात्र आदिवासी विकास विभागातील नियोजनाअभावी या सर्व निविदा प्रक्रिया खोळंबल्या आहेत. त्याचा नाहक त्रास स्थानिक प्रशासन आणि आदिवासी विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. तसेच राज्यातील आदिवासी विकास विभागातील आश्रमशाळांची शिक्षकांची अनेक पदे रिक्त असल्याने बर्‍याच आश्रमशाळांत शिक्षकच नसल्याचे वास्तव आहे. दुर्लक्षीत आदिवासी आश्रम शाळांमध्ये अपुर्‍या शैक्षणिक सुविधा, तुटपुंजे शिक्षक, अधिकारी आणि कर्मचारी वर्गांचा अभाव असल्याने विद्याथ्याच्या समस्या वाढल्या आहेत.

विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

       आदिवासी विद्यार्थ्यांंचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी पुरवठा करण्यात येणारी दूध, केळी, अंडी, सफरचंद जवळपास १ ऑगस्टपासून बंद आहे. प्रशासनाचे आदेश असतानाही अनेक आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना पाहिजे तेवढा पोषक आहार मिळत नसल्याने विद्यार्थ्यांंचे आरोग्य धोक्यात आले आहे.