शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

महिलांचा छळ प्रतिबंध अधिनियम अडकला लालफीतशाहीत

By admin | Updated: August 25, 2014 03:14 IST

अधिसूचनेअभावी स्थानिक वाद समितीचे गठण रखडले; अकोला येथील महिला महाविद्यालयातील महिला ठरली यंत्रणेचा बळी.

अजय डांगे / अकोलामहिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी सरकार कठोर कायदे, अधिनियम तयार करीत असले; तरी प्रशासकीय पातळीवरून सरकारच्या या प्रयत्नांना खीळ घातली आहे. महिलांची कामाच्या ठिकाणावर होणारी लैंगिक छळवणूक, या अधिनियमांर्तगत अधिसूचनेअभावी एका वर्षापासून स्थानिक वाद समितीचे गठण रखडले आहे. त्यामुळे छळवणुकीच्या तक्रारीचा निपटारा तातडीने कसा होईल, असा प्रश्न पीडित महिलांना पडला आहे. पुरोगामी महाराष्ट्रात महिलांच्या छळवणुकीबाबतच्या अधिनियमनाच्या अंमलबजावणीत हलगर्जी होत असल्याने महिला कार्यकर्त्यांमधून संताप व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील एका महिला महाविद्यालयातील महिलेने केलेल्या तक्रारीच्या निमित्ताने समितीच्या गठणाचा मुद्या उजेडात आला आहे. सार्वजनिक जीवनात काम कारणार्‍या महिलांवर अत्याचार होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे महिलांवर कामाच्या ठिकाणी होणारे अत्याचार रोखण्यासाठी सरकारने ह्यमहिलांची कामाच्या ठिकाणी होणारी लैंगिक छळवणूक (प्रतिबंध, मनाई आणि इलाज) अधिनियम २0१३ह्ण तयार केला. या अधिनियमांतर्गत शासकीय, निमशासकीय, खासगी, नियंत्रित कार्यालये, अस्थापने, उद्योग, राहत्या जागी काम करणार्‍या महिलांना संरक्षण देण्यात आले आहे. महिलांच्या तक्रारीची दखल घेण्यासाठी दोन स्तरांवर समितीचे गठण करण्याची तरतूद या अधिनियमामध्ये करण्यात आली आहे. हा अधिनियम २0१३ मध्ये तयार करण्यात आल्यानंतरही अद्याप स्थानिक वाद समितीचे गठण करण्यासाठी शासन स्तरावरून अधिसूचनाच जारी करण्यात आलेली नाही. त्यामुळे या अधिनियमनाच्या प्रभावी अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.