शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
4
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
5
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
6
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
7
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
8
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
9
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
10
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
11
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
12
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
13
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
14
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
15
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
16
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
17
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
18
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
19
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
20
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर

कर्मचारी लावले कामाला; जन्म, मृत्यू नाेंदणी विभाग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:21 IST

नागरिकांचा बेजबाबदारपणा व प्रशासकीय यंत्रणांच्या अनास्थेमुळे शहरात पुन्हा एकदा काेराेनाच्या संसर्गाने डाेकेवर काढले आहे. शहराच्या प्रत्येक भागात काेराेनाबाधित रुग्णांची ...

नागरिकांचा बेजबाबदारपणा व प्रशासकीय यंत्रणांच्या अनास्थेमुळे शहरात पुन्हा एकदा काेराेनाच्या संसर्गाने डाेकेवर काढले आहे. शहराच्या प्रत्येक भागात काेराेनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालल्याचे दिसत आहे. वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासनाने घराेघरी सर्वेक्षण करून नागरिकांच्या आराेग्य तपासणीचा निर्णय घेतला. त्यासाठी ३०७ द्विसदस्यीय पथकांचे गठन करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त मनपाचे शिक्षक, आशा वर्कर यांनाही कामाला लावण्यात आले. कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश देताना अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या काही विभागातील कर्मचाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पहिल्यांदाच जन्म, मृत्यू नाेंदणी विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याने हा विभाग बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर ओढवली आहे. अशा स्थितीत नवजात बाळाची नाेंदणी असाे वा मृत्यू झालेल्या नागरिकांचे प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया खाेळंबली आहे. यामुळे गरजू नागरिकांची कुचंबणा हाेत असल्याने प्रशासनाने हा विभाग तातडीने खुला करण्याची मागणी निवेदनाद्वारे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी पराग गवई यांनी प्रशासनाकडे केली आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांचे नुकसान

शासनाने प्रत्येक शाळेत एकूण विद्यार्थ्यांच्या २५ टक्के जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव केल्या आहेत. काही शाळांनी चालू शैक्षणिक सत्रासाठी आरटीईअंतर्गत प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ केला आहे. चिमुकल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता मनपा प्रशासनाने तातडीने जन्म, मृत्यू विभाग सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.