शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

श्रीधर स्वामी महाराज अनंतात विलीन

By admin | Updated: May 16, 2017 01:29 IST

पंचगव्हाण येथे हजारो भक्तांच्या उपस्थितीत साश्रू नयनांनी दिला निरोप

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा / पंचगव्हाण (जि. अकोला) : तालुक्यातील पंचगव्हाण येथील विद्यावाचस्पती श्रीधर स्वामी महाराज यांचे १४ मेच्या रात्री ११.४५ वाजता वयाच्या ८६ व्या वर्षी अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवास १५ मे रोजी सायंकाळी ६ वाजता त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव अनिल अग्रवाल यांनी मुखाग्नी दिला. यावेळी हजारो भक्तांनी साश्रू नयनांनी त्यांना निरोप दिला. विद्यावाचस्पती श्रीधर स्वामी महाराज यांचा जन्म तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण येथे ८ फेब्रुवारी १९३१ रोजी झाला होता. किसनलाल अग्रवाल व ताराबाई अग्रवाल हे त्यांचे आई-वडील होते. त्यांचे बालपण पंचगव्हाणमध्ये गेले. अकोल्यातील सीताबाई आर्टस कॉलेजमधून बी.ए. व नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजमधून इंग्रजी विषयात एम.ए. केले. त्यानंतर बनारस विद्यापीठात संस्कृत विषयात एम.ए.केले. त्यांना चारही वेद मुखोद्गत होते. त्यांनी देश-विदेशात धर्मप्रचार व प्रसार करीत धर्मजागृतीचे कार्य केले. अमेरिकेत युनोद्वारे वर्ष २००० मध्ये जगात शांतता नांदावी याकरिता आयोजित जागतिक परिषदेत त्यांनी देशाचे नेतृत्व केले होते. वयोमानाने त्यांची प्रकृती ठीक राहत नव्हती. १४ मेच्या रात्री ११.४५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची अंत्ययात्रा १५ मे रोजी दुपारी ४ वाजता पंचगव्हाण येथील त्यांच्या निवासस्थानापासून टाळ, मृदंगाच्या गजरात व ‘जय जय रामकृष्ण हरि’च्या नामघोषात निघाली. त्यांच्या शेतात हजारो भक्तांच्या उपस्थितीत त्यांच्यावर दाहसंस्कार करण्यात आले. पंचक्रोशीतील भाविकासंह मान्यवर उपस्थित होते.