शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

विहिरीची योजना खारपाणपट्ट्यासाठी वांझोटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 13:43 IST

अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकºयांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना खारपाणपट्ट्यातील शेतकºयांसाठी वांझोटी ठरणार आहे.

ठळक मुद्देतीन जिल्ह्यांसाठी लाभाचे स्वरूप बदलण्याची मागणी

अकोला : अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकºयांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना खारपाणपट्ट्यातील शेतकºयांसाठी वांझोटी ठरणार आहे. या भागासाठी योजनेतून दिल्या जाणाºया लाभाचे स्वरूप बदलावे, या मागणीचा ठराव कृषी समितीच्या सभेत सोमवारी घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सभापती माधुरी गावंडे होत्या.विशेष घटक योजनेचे नाव बदलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना असे करण्यात आले. त्यामध्ये शेतकºयांना दिल्या जाणाºया लाभाचे स्वरूपही बदलले आहे. योजनेतून शेतकºयांना प्राधान्याने विहिरीचा लाभ मिळणार आहे. त्यामध्ये नवीन विहीर, त्यासोबत वीज जोडणी, पंप संच, सूक्ष्म सिंचनासाठी २०१७-१८ पासून शेतकºयांची निवड केली जाणार आहे. योजनेतून विहिरीसाठीच लाभ दिला जाईल. अकोला, बाळापूर, तेल्हारा, अकोट व मूर्तिजापूर या तालुक्यांतील शेकडो गावांमध्ये विहिरी खोदण्यास भूजल सर्वेक्षण यंत्रणेकडून उद्दिष्टही दिले जात नाही, तसेच विहिरीतून सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल, असे प्रमाणपत्रही दिले जात नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये विहिरींसाठी लाभार्थी मिळणे शक्य नाही. तोच प्रकार अमरावती, बुलडाणा जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये घडणार आहे. त्यामुळे १६ तालुक्यातील लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार आहेत. विहिरींऐवजी लाभाचे स्वरूप बदलावे, या मागणीचा ठराव सदस्य शोभा शेळके यांनी मांडला. तो शासनाकडे पाठवला जाणार आहे.सोबतच कीटकनाशकांमुळे विषबाधेमुळे शासकीय रुग्णालयात उपचार झालेल्यांनाच मदतीचे प्रस्ताव सादर करण्यात आले. खासगी रुग्णालयात उपचार घेणाºयांचा शोध घेऊन त्यांचेही प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचेही यावेळी ठरले. लाभार्थी याद्यांना लवकरच अंतिम मंजुरी दिली जाईल, त्यासाठी तातडीने याद्या सादर करण्याचे संबंधिताना बजावण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेसाठी येत्या ३० आॅक्टोबरपर्यंत आॅनलाइन अर्ज स्वीकारले जाणार आहेत, अशी माहिती सभेत देण्यात आली. यावेळी सदस्य रमण जैन, विलास इंगळे, सदस्य गावंडे, माधुरी कपले, कृषी विकास अधिकारी एच.जी.ममदे उपस्थित होते.