शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेचे विशेष नियोजन

By admin | Updated: December 4, 2015 02:34 IST

४ व ५ डिसेंबर रोजी नागपूर-मुंबई दरम्यान धावणार तीन विशेष गाड्या

अकोला: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईला जाणार्‍या प्रवाशांच्या सुविधेकरिता मध्य रेल्वे प्रशासनाने ४ व ५ डिसेंबर रोजी नागपूर ते छत्रपती शिवाजी टर्मिनस (मुंबई) दरम्यान तीन विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त (६ डिसेंबर) मुंबईला जाणार्‍या भाविकांच्या सुविधेकरिता दरवर्षी मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने विशेष गाड्या सोडल्या जातात. या काळात मध्य रेल्वे मार्गावर भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने ४ व ५ डिसेंबर रोजी नागपूर ते छत्रपती शिवाजी टर्मिनस (मुंबई) दरम्यान तीन विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी 0१२९२ क्रमांकाची ही पहिली विशेष गाडी ४ डिसेंबर रोजी रात्री ११.५५ वाजता नागपूर रेल्वे स्थानकाहून रवाना होईल व दुसर्‍या दिवशी दुपारी १.३५ वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे पोहोचेल. 0१२९४ क्रमांकाची ही दुसरी विशेष गाडी ५ डिसेंबर रोजी सकाळी ७.५0 वाजता नागपूरहून सुटेल व रात्री १२.१0 वाजता मुंबईला पोहोचेल. तिसरी विशेष गाडी क्रमांक 0१२९६ ही ५ डिसेंबर रोजी दुपारी ३.५५ वाजता नागपूर रेल्वे स्थानकाहून सुटेल आणि ६ डिसेंबर रोजी सकाळी ११.३५ वाजता मुंबईला पोहोचेल. पाच अनारक्षित डब्यांसह १२ सामान्य डबे असलेल्या या विशेष गाड्यांना अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जलंब, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कसारा, कल्याण व दादर या रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.