शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

शेकडो हेक्टरवरील सोयाबीन पेरणी उलटली!

By admin | Updated: July 27, 2014 23:03 IST

अकोला जिल्ह्यातील शेकडो हेक्टरवरील पेरलेले सोयाबीनचे महागडे बियाणे उगवलेच नसल्याने दुबार पेरणीचे संकट.

अकोला : जिल्ह्यातील शेकडो हेक्टरवरील महाबीज व इतर खासगी कंपन्यांचे पेरलेले सोयाबीनचे महागडे बियाणे उगवलेच नसल्याच्या शेतकर्‍यांच्या तक्रारीचा ओघ वाढला असून, दुबार पेरणीचे संकट ओढवल्याने शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत सापडला आहे.यावर्षी पेरणीसाठी आवश्यक असलेला पाऊ स झाल्यानंतर शेतकर्‍यांनी सोयाबीन पेरणी केली आहे. आजमितीस जिल्ह्यात जवळपास दीड लाख हेक्टर क्षेत्रावर शे तकर्‍यांनी सोयाबीनची पेरणी केली आहे. १५ व २३ जुलै रोजी पडलेल्या दमदार पावसामुळे शेतकर्‍यांनी पेरणीचा वेग वाढवल्याने गुरुवारपर्यंत ६५ टक्के क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या आहेत. हा पाऊस सोयाबीन पिकाला पोषक ठरणार असल्याचे सांगण्यात येत होते. तथापि, पोषक ठरण्याऐवजी शेकडो हेक्टरवरील सोयाबीन उगवलेच नाही. गेल्यावर्षी अतवृष्टीने सोयाबीन पिकाचे नुकसान झाले, तर यावर्षी पेरलेले सोयाबीन उगवले नसल्याने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. यात सर्वाधिक महाबीजच्या बियाण्यांचा समावेश असून, खासगी कंपन्यांचे बियाणे काही ठिकाणी उगवले नसल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. अकोला तालुक्यात कौलखेड जहागीर, रामगाव, खडकी, बोंदरखेड, चांचोडी आदी अनेक गावच्या शेतकर्‍यांचे सोयाबीन उगवले नाही. या संदर्भात कौलखेड व रामगावच्या शे तकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रारी केल्या आहेत.गेल्या वर्षी झालेली अतवृष्टी आणि त्यानंतर रब्बी हंगामात गारपिटीमुळे झालेल्या पीक नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला असताना यावर्षीच्या खरीप पेरणीत पेरलेले सोयाबीनचे महागडे बियाणे पेरल्यानंतर उगवले नसल्याने शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. त्यामुळे यासंदर्भात चौकशी करून, शे तकर्‍यांना पेरणीकरिता सोयाबीन बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी कौलखेड जहागीर व रामगाव येथील शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या तक्रारीत केली आहे. गतवर्षी शेतकर्‍यांनी पीक विमा काढला असता आणि आणेवारी पन्नास टक् क्यांपेक्षा कमी असताना विमा कंपनीकडून संबंधित शेतकर्‍यांना पीक विम्याची र क्कम दिली नाही. याबाबत चौकशी करून शेतकर्‍यांना तातडीने विम्याची रक्कम देण्यात यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी जिल्ह्यातून प्राप्त झाल्याचे महाबीज येथील जिल्हा व्यवस्थापक अरुण कलोरे नमूद करून ७0 ते ८0 बियाणे गोण्याचा समावेश असल्याचे म्हटले आहे. या संदर्भात बियाणे तक्रार निवारण समिती शेतावर भेटी देत असून, महाबीजची समितीसुद्धा तपासणी करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.