शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

सोयाबीन बियाणे निकृष्ट

By admin | Updated: July 26, 2014 21:01 IST

अनेक ठिकाणी बीजे अंकुरली नाही

बाभुळगाव जहागीर: गतवर्षीच्या अतवृष्टीमुळे सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता कमी झाल्याचे स्पष्ट होत असून, यंदा पेरण्यात आलेले सोयाबीन बियाणे पूर्णपणे उगवलेच नसल्याचे बाभुळगाव जहागीरसह परिसरातील अनेक शेतकर्‍यांनी सांगितले आहे. अकोला तालुक्यात शेतजमिनीचे क्षेत्र तब्बल ९६ हजार हेक्टर आहे. त्यावर सोयाबीनची सर्वाधिक पेरणी करण्यात आली आहे. पावसाला बराच विलंब झाल्याने मूग, उडीद, ज्वारी, तूर, आदी पिक ांची वेळ निघून गेली. शेतकर्‍यांसमोर सोयाबीन किंवा कपाशीची पेरणी करण्याशिवाय पर्याय उरला नाही. गेल्या आठवड्यात बर्‍यापैकी पाऊस पडल्याने बाभुळगाव परिसरातील अनेक शेतकर्‍यांनी सोयाबीनची पेरणी केली; परंतु ५ ते ६ दिवस उलटले तरी अनेक ठिकाणी सोयाबीनची बीजे पूर्णपणे अंकुरलीच नाही. त्यामुळे त्या सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता कमी असल्याचे स्पष्ट झाले. बाभुळगाव परिसरातील अनेक शेतकर्‍यांनी नामांकित कंपनीचे सोयाबीन बियाणे विकत घेतले. तब्बल अडीच हजार रुपये प्रती बॅग अशा दराने खरेदी केलेले हे बियाणे उगवलेच नसल्यामुळे शेतकरी अधिकच संकटात सापडला आहे. आता या सर्व शेतक र्‍यांवर दुबार पेरणीची वेळ आली असून, बियाणे खरेदी करण्यासाठी पैसे आणावे कोठून आणि बियाणे खरेदी करावे तरी कोणते, हे प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाले आहेत. दरम्यान, गतवर्षीच्या अतवृष्टीमुळे सोयाबीन बियाण्यांचा दर्जा खालावला असून, शेतकर्‍यांनी बियाण्यांची उगवण क्षमता तपासूनच पेरणी करावी, असा सल्ला कृ षी विभागाकडून देण्यात आला होता. तो खरा ठरल्याचे दिसत आहे.