शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

वऱ्हाडात केवळ ५० टक्के क्षेत्रावर पेरणी!

By admin | Updated: July 5, 2017 01:40 IST

अकोला, अमरावती जिल्ह्यांतील पेरण्या खोळंबल्या : शेतकऱ्यांना सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा

राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पावसाने दडी मारल्याने विदर्भातील पेरण्या खोळंबल्या आहेत. पश्चिम विदर्भात १५ लाख १३ हजार ५०० हेक्टरवर (५० टक्के) पेरण्या झाल्या असून, अकोला आणि अमरावती जिल्ह्यांतील पेरणीची टक्केवारी सर्वात कमी आहे. येत्या दोन, तीन दिवसांत पाऊस न आल्यास शेतकऱ्यांना नियमित खरीप पिकांमध्ये फेरपालट करावी लागणार आहे.मागील अनेक वर्षांपासून पावसाच्या अनिश्चिततेचा परिणाम शेत उत्पादनावर होत आहे. यावर्षी भारतीय हवामानशास्त्र विभागाने पूरक पावसाचे भाकीत केले होते; पण त्याप्रमाणे पाऊस न झाल्याने शेतकरी मात्र सैरभैर झाला आहे. पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ व अमरावती या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्याला पावसाच्या अनिश्चिततेचा सातत्याने सामना करावा लागत आहे. तो यावर्षीही समोर आहे. अशी सर्वच बाजूंनी संकटे असताना शेतकऱ्यांनी यावर्षी कृषी निविष्ठांची खरेदी केली; पण आभाळाकडे बघण्यावाचून त्यांच्यासमोर सध्या दुसरा पर्याय नसल्याचे चित्र आहे.पाच जिल्ह्यांतील ३२ लाख ७५ हजार हेक्टरपैकी तीन दिवसांपूर्वी ४८ टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात केवळ १३ टक्के तर अकोला जिल्ह्यात २५ टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. अकोला जिल्ह्याच्या ४ लाख ८६ हजार ६०० हेक्टर क्षेत्रापैकी १ लाख २० हजार ७०० हेक्टरवर पेरणी झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यात ४ लाख ३० हजार ३०० हेक्टर (५७ टक्के), वाशिम जिल्ह्यात २ लाख ८६ हजार ६०० हेक्टर (६९ टक्के) तर यवतमाळ जिल्ह्यात ६ लाख २८ हजार ३०० हेक्टरवर (७० टक्के) पेरणी झाली आहे.पेरणी झालेले पीकपाच जिल्ह्यात कापूस ५ लाख २६ हजार ९०० हेक्टरवर पेरणी झाली आहे. सोयाबीन ७ लाख ५ हजार ७०० हेक्टर, तूर २ लाख ५ हजार ७०० हेक्टर, मूग ४१ हजार, उडीद ४६ हजार तर ज्वारी १,९०० हेक्टरवर पेरणी झाली आहे. यावर्षी कृषी विभागाने खरीप हंगाम पेरणीचे नियोजन करताना मूग व उडीद या पिकात वाढ केली होती; परंतु एक महिना होऊनही सार्वत्रिक पाऊस नसल्याने मूग, उडिदाच्या क्षेत्रात घसरण झाली आहे.