शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

धर्माचे अध:पतन रोखण्यासाठी समाजाचे योगदान महत्त्वाचे!

By admin | Updated: February 2, 2015 01:53 IST

गोविंददेव गिरी महाराजांचे प्रतिपादन; अकोला येथे उत्साहात पार पडले विश्‍व हिंदू संमेलन.

अकोला : भारतात जन्माला आला म्हणून भारतीय, वेदांचा अभ्यास करणारा वैदिक, तर ज्याचा अंत नाही अशा धर्माला मानणारा सनातनी, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि इतर मिळून जो निर्माण होतो, तो हिंदू समजला जातो. हिंदू धर्माला कमी लेखणार्‍यांना धडा शिकविण्यासाठी प्रभू श्रीरामाने अवतार घेतला होता. र्मयादापुरुषोत्तम श्रीरामाने धनुष्य हाती घेऊन दुष्टांचा संहार केला. सज्जनतेचे मूर्तिमंत स्वरूप असलेल्या श्रीरामासमान प्रत्येकाने सज्जन व्हावे, असे प्रतिपादन आचार्य गोविंददेव गिरी महाराज यांनी केले. विश्‍व हिंदू परिषदेचा सुवर्ण जयंतीनिमित्त रविवार, १ फेब्रुवारी रोजी दुपारी तापडिया नगरातील भारत विद्यालयाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रांगणात पार पडलेल्या विश्‍व हिंदू संमेलनात आचार्य बोलत हो ते. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने वचन दिले आहे की, जेव्हा जेव्हा धर्माचे अध:पतन होईल, तेव्हा मी अवतार घेईल. आता ती वेळ समीप आली असून, लवकरच भगवंताला धर्माच्या रक्षणासाठी अवतार घ्यावा लागेल. त्यासाठी आपलेदेखील योगदान तितकेच महत्त्वाचे ठरते. हे योगदान विश्‍व हिंदू परिषदेच्या माध्यमातून युवा वर्गाकडून मिळत आहे. संतांच्या विचार विर्मशानंतरच विश्‍व हिंदू परिषदेची स्थापना करण्यात आली. उन्नती आणि शांती प्रदान करणारा तसेच सर्वांना सोबत घेऊन चालणारा हा धर्मच अस तो, असे त्यांनी यावेळी सांगितले. संमेलनाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुधांशू महाराजदेखील यावेळी उ पस्थित होते. सेंद्रिय शेती तज्ज्ञ मधुकर सराफ, विहिंपचे केंद्रीय मंत्री प्रशांत हरताळकर, प्रांत सहप्रमुख मा तृशक्ती अंजलीताई देशकर तसेच हभप ज्ञानेश्‍वर महाराज वाघ यांनी विचार मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कैलाश अग्रवाल होते. उद्घाटक म्हणून डॉ. अविनाश पाटील होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जैन मुनी अजितशेखर सुरीश्‍वर महाराज, खासदार संजय धोत्रे, आमदारत्रयी गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर व हरीश पिंपळे, महापौर उज्ज्वलाताई देशमुख, उपमहापौर विनोद मापारी, सनत गुप्ता, ममता चिंचवडकर, राहूल राठी आदी उपस्थित होते. ह्यहिंदू संवेदनाह्ण या पुस्तकाचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. संचालन प्रकाश घोघलिया, प्रकाश लोढिया आणि प्रमोद राठी यांनी केले. कार्यक्रमासाठी विश्‍व हिंदू परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.