शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

जात पंचायतीचे आतापर्यंत चार बळी

By admin | Updated: November 22, 2015 02:03 IST

गणेशपूर येथील नागरिकांनी सांगितली व्यथा.

विवेक चांदूरकर / वाशिम : नाथजोगी समाजात यापूर्वीही जातपंचायत भरविण्यात आली असून, अनेकांना दंडही ठोठाविण्यात आला आहे. यामध्ये आतापर्यंत चार जणांचा बळी गेला असल्याचे भयानक वास्तव गणेशपूर येथील नागरिकांनी शुक्रवारी मांडले. यामुळे या गावातील नागरिक दहशतीत आहेत. रिसोड तालुक्यात गणेशपूर येथील सुभाष सावंत यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची पत्नी व वडिलांनी हिंमत दाखवित रिसोड पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांकडेही या प्रकरणाकडे लक्ष देण्याची मागणी केली. त्यामुळे सदर प्रकरण उजेडात आले असून, सर्वत्र गाजत आहे. या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी गणेशपूर येथे लोकमत चमू गेली असता सावंत यांच्या घराजवळ राहणार्‍या लोकांनी त्यांच्या व्यथा मांडल्या. अल्प मिळकतीतून संसाराचा गाडा ओढणार्‍या या लोकांना आणखी जात पंचायतींच्या कठोर निर्णयाचाही सामना करावा लागत आहे. अशा प्रकारच्या जात पंचायती यापूर्वीही अनेकदा भरविण्यात आल्या आहेत. तसेच सुभाष सावंत यांचे वडील आप्पाराणू सावंत यांनी यापूर्वीही त्यांना दंड ठोठावण्यात आल्याचे सांगितले. समाजातील विविध लोकांना नेहमीच दंड ठोठावण्यात येतो, असेही त्यांनी सांगितले. या जातपंचायतीमुळे होत असलेल्या अन्यायाचे या परिसरातील नागरिकांनी कथन केले. समाजातील जातपंचायतीमुळे आतापर्यंंंंत चार जणांचा बळी गेल्याचा आरोप यांनी केला आहे. कोणतीही मान्यता नसताना जातपंचायत भरविलीच कशी जाते व त्याचा आदेश मान्यही कसा केला जातो, असा आरोपही या लोकांनी केला.