शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

जात पंचायतीचे आतापर्यंत चार बळी

By admin | Updated: November 22, 2015 02:03 IST

गणेशपूर येथील नागरिकांनी सांगितली व्यथा.

विवेक चांदूरकर / वाशिम : नाथजोगी समाजात यापूर्वीही जातपंचायत भरविण्यात आली असून, अनेकांना दंडही ठोठाविण्यात आला आहे. यामध्ये आतापर्यंत चार जणांचा बळी गेला असल्याचे भयानक वास्तव गणेशपूर येथील नागरिकांनी शुक्रवारी मांडले. यामुळे या गावातील नागरिक दहशतीत आहेत. रिसोड तालुक्यात गणेशपूर येथील सुभाष सावंत यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची पत्नी व वडिलांनी हिंमत दाखवित रिसोड पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांकडेही या प्रकरणाकडे लक्ष देण्याची मागणी केली. त्यामुळे सदर प्रकरण उजेडात आले असून, सर्वत्र गाजत आहे. या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी गणेशपूर येथे लोकमत चमू गेली असता सावंत यांच्या घराजवळ राहणार्‍या लोकांनी त्यांच्या व्यथा मांडल्या. अल्प मिळकतीतून संसाराचा गाडा ओढणार्‍या या लोकांना आणखी जात पंचायतींच्या कठोर निर्णयाचाही सामना करावा लागत आहे. अशा प्रकारच्या जात पंचायती यापूर्वीही अनेकदा भरविण्यात आल्या आहेत. तसेच सुभाष सावंत यांचे वडील आप्पाराणू सावंत यांनी यापूर्वीही त्यांना दंड ठोठावण्यात आल्याचे सांगितले. समाजातील विविध लोकांना नेहमीच दंड ठोठावण्यात येतो, असेही त्यांनी सांगितले. या जातपंचायतीमुळे होत असलेल्या अन्यायाचे या परिसरातील नागरिकांनी कथन केले. समाजातील जातपंचायतीमुळे आतापर्यंंंंत चार जणांचा बळी गेल्याचा आरोप यांनी केला आहे. कोणतीही मान्यता नसताना जातपंचायत भरविलीच कशी जाते व त्याचा आदेश मान्यही कसा केला जातो, असा आरोपही या लोकांनी केला.