शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

मोफत धान्य वाटपात ‘ई पाॅस’वर लागणार दुकानदारांचा अंगठा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:17 IST

अकोला : कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांच्या कालावधीत गरीब रेशन कार्डधारकांना महाराष्ट्र दिनापासून (१ ...

अकोला : कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांच्या कालावधीत गरीब रेशन कार्डधारकांना महाराष्ट्र दिनापासून (१ मे) मोफत धान्याचे वाटप सुरू होणार आहे. त्यामध्ये कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून ‘ई पाॅस’मशीनवर रेशन कार्डधारकांऐवजी रास्तभाव धान्य दुकानदारांचा अंगठा लागणार असल्याचे निर्देश शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत शुक्रवारी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यामुळे मोफत धान्यासाठी रेशन कार्डधारकांना ‘ई पाॅस’ मशीनवर अंगठा लावण्याची गरज राहणार नाही.

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले असून, कडक निर्बंधांच्या कालावधीत गरीब रेशन कार्डधारकांना मोफत धान्य देण्याची घोषणा शासनामार्फत करण्यात आली आहे. त्यानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत गरीब रेशन कार्डधारकांना मोफत धान्याचे वितरण १ मेपासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्राधान्य गटातील रेशन कार्डधारकांना प्रति व्यक्ती तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ तसेच अंत्योदय अन्न योजनेंतर्गत रेशन कार्डधारकांना प्रति कुटुंब २० किलो गहू व १५ किलो तांदूळ आणि प्राधान्य गट व अंत्योदय योजनेतील रेशन कार्डधारकांना प्रति कार्ड एक किलो प्रमाणे हरभरा किंवा तूर यापैकी एका डाळ असे मोफत धान्याचे वितरण करण्यात येणार आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा कहर लक्षात घेता, मोफत धान्य वाटप करताना कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी ‘ई पाॅस’ मशीनवर रेशन कार्डधारकांऐवजी रास्तभाव दुकानदारांचा अंगठा लावून मोफत धान्य वाटप करण्याचे निर्देश शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाला ३० एप्रिल रोजी प्राप्त झाले. त्यानुसार जिल्ह्यात प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील १२ लाख ७६ हजार रेशन कार्डधारकांना मोफत धान्याचे वाटप करताना ‘ई पाॅस’ मशीनवर रेशन कार्डधारकांना अंगठा लावण्याची गरज राहणार नसून, ‘ई पाॅस’ मशीनवर संबंधित रास्तभाव धान्य दुकानदारांचा अंगठा लावून मोफत धान्याचे वितरण करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील लाभार्थी रेशन कार्डधारक

बीपीएल : ७०,९३९

अंत्योदय : ४४,८४७

केशरी : १,०६,८१७

जिल्ह्यात १ मेपासून प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील रेशन कार्डधारकांना रास्तभाव धान्य दुकानांमधून मोफत धान्याचे वाटप सुरू करण्यात येणार आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी धान्य वाटप करताना ‘ई पाॅस’ मशीनवर रेशन कार्डधारकांऐवजी रास्तभाव धान्य दुकानदारांचा अंगठा लावून लाभार्थी रेशन कार्डधारकांना मोफत धान्य वाटप करण्याचे निर्देश शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून शुक्रवारी प्राप्त झाले. त्यानुसार ‘ई पाॅस ’मशीनवर रास्तभाव धान्य दुकानदारांचा अंगठा लावून रेशन कार्डधारकांना मोफत धान्याचे वाटप करण्यात येणार आहे.

-बी. यू. काळे

जिल्हा पुरवठा अधिकारी