शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

धक्कादायक: एकट्या एप्रिलमध्येच कोरोनाचे २२५ बळी, १२ हजारांवर पॉझिटिव्ह !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:17 IST

जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर पहिल्यांदाच अशी स्थिती जिल्ह्यात पाहावयास मिळाली, मात्र तरीदेखील अकोलेकरांना याचे गांभीर्य दिसत नसल्याची स्थिती आहे. ...

जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर पहिल्यांदाच अशी स्थिती जिल्ह्यात पाहावयास मिळाली, मात्र तरीदेखील अकोलेकरांना याचे गांभीर्य दिसत नसल्याची स्थिती आहे. गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात कोरोना महामारीचे संकट ठाण मांडून आहे. मध्यंतरी कोरोनाचा प्रभाव काही प्रमाणात कमी झाला ; मात्र फेब्रुवारी महिन्यापासून सक्रिय झालेल्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या शेकडोंनी वाढत आहे. एप्रिल महिन्यातील स्थिती पाहता प्रतिदिवस सरासरी ३७० पेक्षा जास्त रुग्ण आढळल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. दरम्यान, सद्य स्थितीत जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांत खाटांची कमतरता भासत असून खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचीही टंचाई दिसून येत आहे. शिवाय खासगीत रुग्णांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असल्याने सर्वसामान्य रुग्णांची धाव ही सर्वोपचार रुग्णालयाकडे आहे. परिणामी आरोग्य सेवेवर ताण येत आहे. कोविड फैलावाची स्थिती अशीच कायम राहिल्यास खाटा, ऑक्सिजन आणि इतर साधनसामग्रीची टंचाई भासून परिस्थिती आणखी हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून संसर्ग रोखण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे.

आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू एप्रिल महिन्यात

गतवर्षी सप्टेंबर महिन्यात कोरोनामुळे जिल्ह्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. कोरोनामुळे आतापर्यंत सर्वाधिक ८४ मृत्यू सप्टेंबर महिन्यात झाले होते, मात्र मार्च महिन्यात हे रेकॉर्ड मोडले गेले. एकट्या एप्रिल महिन्यात २२५ रुग्णांना जीव गमवावा लागला. ही परिस्थिती आतापर्यंतची सर्वाधिक गंभीर परिस्थिती असल्याचे दिसून येते.

असा आहे कोरोनाचा आलेख

महिना- रुग्ण - मृत्यू

एप्रिल - २८ - ०३

मे - ५५३ - २९

जून - ९६९ - ४७

जुलै - १०८७ - ३४

ऑगस्ट - १४०० - ४७

सप्टेंबर - ३४६८ - ८४

ऑक्टोबर - ८९३ - ४५

नोव्हेंबर - १०३३ - १२

डिसेंबर - १०५८ - २९

जानेवारी - ११३५ - १४

फेब्रुवारी - ४५२७ - ३१

मार्च - ११५५५ - ८६

एप्रिल - १२,१२४ - २२५

१२ हजारांवर रुग्णांनी केली कोरोनावर मात

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक १२ हजार १२४ रुग्ण एप्रिल महिन्यात आढळून आले, मात्र त्यापेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात देखील केली. एप्रिल महिन्यात तब्बल १२ हजार २३८ रुग्णांनी कोरोनावर मात केली असली, तरी दररोज येणारे अनेक पॉझिटिव्ह रुग्ण आणि मृत्यूचा वाढता आकडा चिंता वाढविणारा ठरत आहे.