शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीच्या बैठकांचे सत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:20 IST

फेब्रुवारी २०१७ मध्ये पार पडलेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप सर्वात माेठा पक्ष म्हणून उदयास आला. भाजपचे ८० पैकी तब्बल ...

फेब्रुवारी २०१७ मध्ये पार पडलेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप सर्वात माेठा पक्ष म्हणून उदयास आला. भाजपचे ८० पैकी तब्बल ४८ नगरसेवक विजयी झाले हाेते. मनपात विराेधी पक्षाच्या भूमिकेत असणाऱ्या काॅंग्रेसचे १३ नगरसेवक असून त्यानंतर शिवसेनेचे आठ व राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पाच नगरसेवक आहेत. २०१२ मधील निवडणुकीतही राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पाच नगरसेवक विजयी झाले हाेते. शहरात ठराविक प्रभागातूनच राष्ट्रवादीचे नगरसेवक विजयी हाेत असल्यामुळे पक्ष संघटनेचा विस्तार करण्याची गरज असल्याचे मत राजकीय वर्तुळातून व्यक्त केले जाते. दरम्यान, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे सांभाळणाऱ्या विजय देशमुख यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते शहराची सूत्रे स्वीकारतील,असा कयास लावला जात हाेता. शहरात पक्षाची अत्यंत केविलवाणी स्थिती लक्षात घेता पक्षश्रेष्ठींनी महानगराध्यक्षपदाची जबाबदारी विजय देशमुख यांच्याकडे साेपवली. तत्पूर्वी महापालिकेच्या राजकारणात माेलाची भूमिका बजावण्याचे निर्देश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिल्यानंतर देशमुख यांनी शहरात पक्ष बांधणीला सुरूवात केल्याचे दिसत आहे. भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या अकाेला पश्चिम विधानसभा मतदार संघात महानगराध्यक्ष देशमुख यांनी तरूणांच्या बैठकांचे सत्र सुरु केले आहे. बैठका,कार्यकर्ता मेळाव्यांच्या माध्यमातून आगामी मनपा निवडणुकीची पेरणी केली जात असल्याची दखल भाजपमधून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या पदाधिकाऱ्यांनी घेतल्याची माहिती आहे.

काॅंंग्रेसने घेतली धास्ती

२०१४ मधील विधानसभा निवडणुकीत अकाेला पश्चिम मतदार संघातून राष्ट्रवादीने बलाढ्य भाजपसाेबत दाेन हात केले हाेते. त्यावेळी राष्ट्रवादीच्या पारड्यांत २५हजारपेक्षा अधिक मतांचे मतदान हाेते. २०१९ मध्ये हा मतदार संघ पुन्हा काॅंंग्रेसच्या वाटेला गेला. त्यावेळी पार पडलेल्या निवडणुकीत भाजप उमेदवाराचा अवघ्या २ हजार ३०० मतांच्या फरकाने विजय हाेऊन काॅंग्रेस उमेदवाराला ७२ हजारपेक्षा अधिक मते मिळाली हाेती. मनपा निवडणुकीच्या माध्यमातून पक्ष विस्तार करणाऱ्या राष्ट्रवादीच्या खेळीची सर्वाधिक धास्ती काॅंंग्रेसने घेतल्याची चर्चा आहे.