शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

तेल्हारा तालुक्यात जलयुक्तच्या कामांसाठी १६ गावांची निवड

By admin | Updated: May 16, 2017 01:56 IST

सन २०१६-१७ ची ४१ कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : जलसिंचनात मोठ्या प्रमाणात वाढ व्हावी म्हणून तालुक्यात मागील वर्षी जलयुक्तची मोठ्या प्रमाणात कामे झाली. सन २०१६-१७ ची ४१ कामे तालुक्यात चालू असून, सन २०१७-१८ करिता १६ गावांची निवड करण्यात आली. राज्य शासन प्रत्येक गावात पाण्याच्या पातळीत वाढ व्हावी, यासाठी मागील पाच वर्षांपासून कृ षी विभाग, जलसंधारण उपविभाग अकोट, लघुसिंचन विभागामार्फत तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात मंजूर झाली होती. यामध्ये सन २०१५-१६ मध्ये तालुक्यातील ३८ गावांची निवड होऊन ७५१ कामे मंजूर होऊन त्यामधील ६८० कामे पूर्ण झाली होती. उर्वरित ७१ कामे सन २०१६-१७ मध्ये पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. यामध्ये खोलीकरण करणे, गाळ काढणे व बंधाऱ्यांची कामे आहेत. सन २०१७-१८ मध्ये तालुक्यातील १६ गावांचीच सदर कामांसाठी निवड करण्यात आली. यामध्ये सांगवी, खापरखेडा, अटकळी, खेलसटवाजी, खेलदेशपांडे, तळेगाव बु., मालठाणा बु., मालपुरा, पिवंदळ बु., शिवाजी नगर, उकळी बु., तुदगाव, तळेगाव पातुर्डा व अन्य गावांची निवड करण्यात येऊन सदर गावात शिवारफेरी काढून १५ मेपर्यंत आराखडे सादर करायची आहेत. तसा सर्व्हे कृ षी विभागाकडून चालू असला, तरी मागील वर्षाच्या तुलनेत जलयुक्तच्या कामासाठी तब्बल २२ गावांची निवड करण्यात आली. शासनाने जलयुक्तच्या कामासाठी अजूनही इतर गावांची निवड केल्यास पाण्याच्या पातळीत वाढ होऊन जलसिंचनामध्ये वाढ होईल. मागील तीन वर्षांमध्ये झालेल्या कामांमुळे बऱ्याच गावांतील पाण्याची पातळी वाढलेली दिसत आहे. सन २०१७-१८ मध्ये जलयुक्तच्या कामासाठी १६ गावांची निवड करण्यात येऊन १५ मेपर्यंत शिवारफेरी काढून वरिष्ठांकडे मंजुरीसाठी पाठविले जातील.- सागर इंगोले, तालुका कृ षी अधिकारी, तेल्हारा.