शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २० जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:30 IST

अकोट : कोरोना साथरोगाने अकोट तालुक्यात थैमान घातले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २ मेपर्यंत २० जणांचा बळी गेला आहे. ...

अकोट : कोरोना साथरोगाने अकोट तालुक्यात थैमान घातले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २ मेपर्यंत २० जणांचा बळी गेला आहे. ३१७ रुग्ण उपचार घेत आहेत. विशेष म्हणजे अकोट ग्रामीण रुग्णालयात गत ६ दिवसांपासून लसीकरण ठप्प पडले आहे. नियोजनाअभावी लसीकरणासाठी लागलेल्या रांगेतील अनेक रुग्ण सध्या ऑक्सिजनवर उपचार घेत असल्याची धक्कादायक माहिती आहे.

अकोला जिल्ह्यात अकोट तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. पहिल्या लाटेत कोरोनामुळे ३८ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे अकोट तालुका व शहरात लसीकरणावर शासनाने भर दिला आहे. दरम्यान, गत सहा दिवसांपासून अकोट ग्रामीण रुग्णालयात लसीकरण ठप्प पडले आहे. शहरातील दोन लसीकरण केंद्रसुध्दा मनुष्यबळाअभावी बंद आहेत. दुसऱ्या लाटेतील २० जणांच्या झालेल्या मृत्यूचे प्रमाण पाहता, लसीकरण करण्याकरिता नागरिकांनी गर्दी केली आहे. परंतु ग्रामीण रुग्णालयामध्ये पुरेशी व्यवस्था असतानाही नियोजनाअभावी रांगा लागत आहेत. सद्यस्थितीतही दररोज रुग्ण ग्रामीण रुग्णालयात चकरा मारत आहेत. तालुक्यात सध्या ३१७ रुग्ण उपचार घेत आहेत. यामधे काही रुग्ण लस घेण्याकरिता ग्रामीण रुग्णालयात गेले होते. या ठिकाणी कुठलेही सुरक्षित अंतर नसल्याने लांबलचक रांगा लागल्या होत्या. अखेर लस तर मिळालीच नाही. परंतु काही रुग्ण सध्या ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. पहिल्या व दुसऱ्या लाटेत आतापर्यंत तालुक्यातील ५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालुक्यात कोरोना लसीकरणावर भर देणे अत्यावश्यक झाले आहे. परंतु या गंभीर बाबीकडे लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामीण रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा रामभरोसे सुरू आहे. विशेष म्हणजे कोरोना प्रादुर्भाव वाढू नये याकरिता शासनाने दिलेल्या नियमानुसार जिल्हाधिकारी यांनी आदेश पारित केले आहेत. परंतु स्थानिक पातळीवर हा आदेश गंभीरतेने घेतला जात नसल्याने कोरोना रुग्णसंख्येत पडणारी भर चिंताजनक आहे. अशातच लसीचा पुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.

एका मिनिटाच्या लसीसाठी चार तास रांगेत

ग्रामीण रुग्णालयात लसीचा पुरवठा झाल्यानंतर नियोजन नसल्याने लस घेण्याकरिता आलेल्या नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे अनेकजण आजारीही पडले आहेत. या ठिकाणी केवळ एक संगणक लावण्यात आले आहे. या संगणकावर पडताळणीकरिता चार तास लागत आहे. तर लस घेण्याकरिता मात्र एक मिनिट लागत आहे. त्यामुळे लसीचा पुरवठा झाल्यानंतर शासनाच्या नियमाचे उल्लंघन होऊ नये याकरिता संगणक वाढवून या ठिकाणी महिला व पुरुषांकरिता वेगळी व्यवस्था तसेच शहरात बंद केलेले लसीकरण केंद्र सुरू करणे आवश्यक आहे.