शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २० जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:30 IST

अकोट : कोरोना साथरोगाने अकोट तालुक्यात थैमान घातले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २ मेपर्यंत २० जणांचा बळी गेला आहे. ...

अकोट : कोरोना साथरोगाने अकोट तालुक्यात थैमान घातले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २ मेपर्यंत २० जणांचा बळी गेला आहे. ३१७ रुग्ण उपचार घेत आहेत. विशेष म्हणजे अकोट ग्रामीण रुग्णालयात गत ६ दिवसांपासून लसीकरण ठप्प पडले आहे. नियोजनाअभावी लसीकरणासाठी लागलेल्या रांगेतील अनेक रुग्ण सध्या ऑक्सिजनवर उपचार घेत असल्याची धक्कादायक माहिती आहे.

अकोला जिल्ह्यात अकोट तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. पहिल्या लाटेत कोरोनामुळे ३८ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे अकोट तालुका व शहरात लसीकरणावर शासनाने भर दिला आहे. दरम्यान, गत सहा दिवसांपासून अकोट ग्रामीण रुग्णालयात लसीकरण ठप्प पडले आहे. शहरातील दोन लसीकरण केंद्रसुध्दा मनुष्यबळाअभावी बंद आहेत. दुसऱ्या लाटेतील २० जणांच्या झालेल्या मृत्यूचे प्रमाण पाहता, लसीकरण करण्याकरिता नागरिकांनी गर्दी केली आहे. परंतु ग्रामीण रुग्णालयामध्ये पुरेशी व्यवस्था असतानाही नियोजनाअभावी रांगा लागत आहेत. सद्यस्थितीतही दररोज रुग्ण ग्रामीण रुग्णालयात चकरा मारत आहेत. तालुक्यात सध्या ३१७ रुग्ण उपचार घेत आहेत. यामधे काही रुग्ण लस घेण्याकरिता ग्रामीण रुग्णालयात गेले होते. या ठिकाणी कुठलेही सुरक्षित अंतर नसल्याने लांबलचक रांगा लागल्या होत्या. अखेर लस तर मिळालीच नाही. परंतु काही रुग्ण सध्या ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. पहिल्या व दुसऱ्या लाटेत आतापर्यंत तालुक्यातील ५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालुक्यात कोरोना लसीकरणावर भर देणे अत्यावश्यक झाले आहे. परंतु या गंभीर बाबीकडे लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामीण रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा रामभरोसे सुरू आहे. विशेष म्हणजे कोरोना प्रादुर्भाव वाढू नये याकरिता शासनाने दिलेल्या नियमानुसार जिल्हाधिकारी यांनी आदेश पारित केले आहेत. परंतु स्थानिक पातळीवर हा आदेश गंभीरतेने घेतला जात नसल्याने कोरोना रुग्णसंख्येत पडणारी भर चिंताजनक आहे. अशातच लसीचा पुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.

एका मिनिटाच्या लसीसाठी चार तास रांगेत

ग्रामीण रुग्णालयात लसीचा पुरवठा झाल्यानंतर नियोजन नसल्याने लस घेण्याकरिता आलेल्या नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे अनेकजण आजारीही पडले आहेत. या ठिकाणी केवळ एक संगणक लावण्यात आले आहे. या संगणकावर पडताळणीकरिता चार तास लागत आहे. तर लस घेण्याकरिता मात्र एक मिनिट लागत आहे. त्यामुळे लसीचा पुरवठा झाल्यानंतर शासनाच्या नियमाचे उल्लंघन होऊ नये याकरिता संगणक वाढवून या ठिकाणी महिला व पुरुषांकरिता वेगळी व्यवस्था तसेच शहरात बंद केलेले लसीकरण केंद्र सुरू करणे आवश्यक आहे.