शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २० जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:30 IST

अकोट : कोरोना साथरोगाने अकोट तालुक्यात थैमान घातले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २ मेपर्यंत २० जणांचा बळी गेला आहे. ...

अकोट : कोरोना साथरोगाने अकोट तालुक्यात थैमान घातले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २ मेपर्यंत २० जणांचा बळी गेला आहे. ३१७ रुग्ण उपचार घेत आहेत. विशेष म्हणजे अकोट ग्रामीण रुग्णालयात गत ६ दिवसांपासून लसीकरण ठप्प पडले आहे. नियोजनाअभावी लसीकरणासाठी लागलेल्या रांगेतील अनेक रुग्ण सध्या ऑक्सिजनवर उपचार घेत असल्याची धक्कादायक माहिती आहे.

अकोला जिल्ह्यात अकोट तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. पहिल्या लाटेत कोरोनामुळे ३८ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे अकोट तालुका व शहरात लसीकरणावर शासनाने भर दिला आहे. दरम्यान, गत सहा दिवसांपासून अकोट ग्रामीण रुग्णालयात लसीकरण ठप्प पडले आहे. शहरातील दोन लसीकरण केंद्रसुध्दा मनुष्यबळाअभावी बंद आहेत. दुसऱ्या लाटेतील २० जणांच्या झालेल्या मृत्यूचे प्रमाण पाहता, लसीकरण करण्याकरिता नागरिकांनी गर्दी केली आहे. परंतु ग्रामीण रुग्णालयामध्ये पुरेशी व्यवस्था असतानाही नियोजनाअभावी रांगा लागत आहेत. सद्यस्थितीतही दररोज रुग्ण ग्रामीण रुग्णालयात चकरा मारत आहेत. तालुक्यात सध्या ३१७ रुग्ण उपचार घेत आहेत. यामधे काही रुग्ण लस घेण्याकरिता ग्रामीण रुग्णालयात गेले होते. या ठिकाणी कुठलेही सुरक्षित अंतर नसल्याने लांबलचक रांगा लागल्या होत्या. अखेर लस तर मिळालीच नाही. परंतु काही रुग्ण सध्या ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. पहिल्या व दुसऱ्या लाटेत आतापर्यंत तालुक्यातील ५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालुक्यात कोरोना लसीकरणावर भर देणे अत्यावश्यक झाले आहे. परंतु या गंभीर बाबीकडे लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामीण रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा रामभरोसे सुरू आहे. विशेष म्हणजे कोरोना प्रादुर्भाव वाढू नये याकरिता शासनाने दिलेल्या नियमानुसार जिल्हाधिकारी यांनी आदेश पारित केले आहेत. परंतु स्थानिक पातळीवर हा आदेश गंभीरतेने घेतला जात नसल्याने कोरोना रुग्णसंख्येत पडणारी भर चिंताजनक आहे. अशातच लसीचा पुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.

एका मिनिटाच्या लसीसाठी चार तास रांगेत

ग्रामीण रुग्णालयात लसीचा पुरवठा झाल्यानंतर नियोजन नसल्याने लस घेण्याकरिता आलेल्या नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे अनेकजण आजारीही पडले आहेत. या ठिकाणी केवळ एक संगणक लावण्यात आले आहे. या संगणकावर पडताळणीकरिता चार तास लागत आहे. तर लस घेण्याकरिता मात्र एक मिनिट लागत आहे. त्यामुळे लसीचा पुरवठा झाल्यानंतर शासनाच्या नियमाचे उल्लंघन होऊ नये याकरिता संगणक वाढवून या ठिकाणी महिला व पुरुषांकरिता वेगळी व्यवस्था तसेच शहरात बंद केलेले लसीकरण केंद्र सुरू करणे आवश्यक आहे.