शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

शाळा सुरू, बसेस बंद; विद्यार्थ्यांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:32 IST

कोरोना आजाराच्या पृष्ठभूमीवर संसर्ग होऊ नये म्हणून गतवर्षी मार्च महिन्यापासून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शाळा बंद करण्यात आल्या होत्या. शासनाने गत ...

कोरोना आजाराच्या पृष्ठभूमीवर संसर्ग होऊ नये म्हणून गतवर्षी मार्च महिन्यापासून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शाळा बंद करण्यात आल्या होत्या. शासनाने गत २३ नोव्हेंबरपासून आठवी ते बारावीचे वर्ग व आता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू केले. शाळा सुरू झाल्या; परंतु अद्यापही ग्रामीण भागातील एसटी महामंडळाच्या बस सुरू झाल्या नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी त्रास सहन लागत आहे.

बोरगाव मंजू गावात शाळा, महाविद्यालय, अभ्यासिका आदी शैक्षणिक संस्था आहेत. मध्यवर्ती ठिकाण असल्याने परिसरातील कानशिवणी, काटेपूर्णा, पळसो बढे, वाशिंबा आदी ग्रामीण भागातील विद्यार्थी बोरगाव मंजू शहरात शिक्षणासाठी येतात. परंतु ग्रामीण भागातील बसगाड्या सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांना बोरगाव मंजूसह अकोला शहरात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. शिवाय मोठ्या प्रमाणावर शेतकरी व शेतमजूर यांनाही वेळ मिळत नाही. शिवाय स्वत:ची वाहनेसुद्धा नसल्याने आपल्या पाल्याला शाळेत पाठवावे, असे हा प्रश्न पडला आहे.

दरम्यान, अकोला आगारातून पूर्वी यळवण मार्गे कानशिवणी, पळसो बढे, मूर्तिजापूर, पळसो बढे मार्गे बोरगाव मंजू अकोला, मूर्तिजापूर, कानशिवणी, दुधलम मार्गे कवळा अशा बस फेरी सुरू होत्या; परंतु टाळेबंदी काळात सदर बस सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बंद केल्या होत्या. परंतु शासनाने पुन्हा शाळा सुरू केल्या; परंतु बस मात्र ग्रामीण भागातील जाणे बंद असल्याने, विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. संबंधित विभागाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून बस सुरू कराव्यात, अशी विद्यार्थ्यांसह पालकांची मागणी आहे.

फोटो: एसटी व विद्यार्थी

बोरगाव मंजू येथे थांबा देण्याची मागणी

बोरगाव मंजू येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जवळ बसला थांबा द्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालक व शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य भरत बोरे यांनी विभाग नियंत्रकांकडे केली आहे. दरम्यान, येथे बस थांबा नसल्याने जुन्या बस थांब्यावरून परत १ किलोमीटर अंतरावरील रेणुका नगर, लक्ष्मीनगर, दिलासा रुग्णालय, माउंट कारमेल, क. वर्ग तीर्थक्षेत्र संत गजानन महाराज मंदिर, स्वामी समर्थ केंद्र आदी महत्त्वपूर्ण ठिकाणे आहेत. अकोल्यावरून येणाऱ्या बस व मूर्तिजापूरकडून येणाऱ्या बस येथे थांबल्यास जनतेच्या हिताचे होईल. शिवाय परिवहन महामंडळाच्या आर्थिक तिजोरीत अधिक भर पडेल. दरम्यान, येथे थांबा द्यावा, अशी मागणी होत आहे.