शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

शाळा सुरू, बसेस बंद; विद्यार्थ्यांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:32 IST

कोरोना आजाराच्या पृष्ठभूमीवर संसर्ग होऊ नये म्हणून गतवर्षी मार्च महिन्यापासून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शाळा बंद करण्यात आल्या होत्या. शासनाने गत ...

कोरोना आजाराच्या पृष्ठभूमीवर संसर्ग होऊ नये म्हणून गतवर्षी मार्च महिन्यापासून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शाळा बंद करण्यात आल्या होत्या. शासनाने गत २३ नोव्हेंबरपासून आठवी ते बारावीचे वर्ग व आता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू केले. शाळा सुरू झाल्या; परंतु अद्यापही ग्रामीण भागातील एसटी महामंडळाच्या बस सुरू झाल्या नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी त्रास सहन लागत आहे.

बोरगाव मंजू गावात शाळा, महाविद्यालय, अभ्यासिका आदी शैक्षणिक संस्था आहेत. मध्यवर्ती ठिकाण असल्याने परिसरातील कानशिवणी, काटेपूर्णा, पळसो बढे, वाशिंबा आदी ग्रामीण भागातील विद्यार्थी बोरगाव मंजू शहरात शिक्षणासाठी येतात. परंतु ग्रामीण भागातील बसगाड्या सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांना बोरगाव मंजूसह अकोला शहरात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. शिवाय मोठ्या प्रमाणावर शेतकरी व शेतमजूर यांनाही वेळ मिळत नाही. शिवाय स्वत:ची वाहनेसुद्धा नसल्याने आपल्या पाल्याला शाळेत पाठवावे, असे हा प्रश्न पडला आहे.

दरम्यान, अकोला आगारातून पूर्वी यळवण मार्गे कानशिवणी, पळसो बढे, मूर्तिजापूर, पळसो बढे मार्गे बोरगाव मंजू अकोला, मूर्तिजापूर, कानशिवणी, दुधलम मार्गे कवळा अशा बस फेरी सुरू होत्या; परंतु टाळेबंदी काळात सदर बस सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बंद केल्या होत्या. परंतु शासनाने पुन्हा शाळा सुरू केल्या; परंतु बस मात्र ग्रामीण भागातील जाणे बंद असल्याने, विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. संबंधित विभागाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून बस सुरू कराव्यात, अशी विद्यार्थ्यांसह पालकांची मागणी आहे.

फोटो: एसटी व विद्यार्थी

बोरगाव मंजू येथे थांबा देण्याची मागणी

बोरगाव मंजू येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जवळ बसला थांबा द्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालक व शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य भरत बोरे यांनी विभाग नियंत्रकांकडे केली आहे. दरम्यान, येथे बस थांबा नसल्याने जुन्या बस थांब्यावरून परत १ किलोमीटर अंतरावरील रेणुका नगर, लक्ष्मीनगर, दिलासा रुग्णालय, माउंट कारमेल, क. वर्ग तीर्थक्षेत्र संत गजानन महाराज मंदिर, स्वामी समर्थ केंद्र आदी महत्त्वपूर्ण ठिकाणे आहेत. अकोल्यावरून येणाऱ्या बस व मूर्तिजापूरकडून येणाऱ्या बस येथे थांबल्यास जनतेच्या हिताचे होईल. शिवाय परिवहन महामंडळाच्या आर्थिक तिजोरीत अधिक भर पडेल. दरम्यान, येथे थांबा द्यावा, अशी मागणी होत आहे.