शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
3
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
4
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
5
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
6
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
7
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
8
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
9
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
10
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
11
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
12
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
13
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
14
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
15
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
16
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
17
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
18
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

शाळा सुरू, बसेस बंद; विद्यार्थ्यांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:32 IST

कोरोना आजाराच्या पृष्ठभूमीवर संसर्ग होऊ नये म्हणून गतवर्षी मार्च महिन्यापासून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शाळा बंद करण्यात आल्या होत्या. शासनाने गत ...

कोरोना आजाराच्या पृष्ठभूमीवर संसर्ग होऊ नये म्हणून गतवर्षी मार्च महिन्यापासून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शाळा बंद करण्यात आल्या होत्या. शासनाने गत २३ नोव्हेंबरपासून आठवी ते बारावीचे वर्ग व आता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू केले. शाळा सुरू झाल्या; परंतु अद्यापही ग्रामीण भागातील एसटी महामंडळाच्या बस सुरू झाल्या नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी त्रास सहन लागत आहे.

बोरगाव मंजू गावात शाळा, महाविद्यालय, अभ्यासिका आदी शैक्षणिक संस्था आहेत. मध्यवर्ती ठिकाण असल्याने परिसरातील कानशिवणी, काटेपूर्णा, पळसो बढे, वाशिंबा आदी ग्रामीण भागातील विद्यार्थी बोरगाव मंजू शहरात शिक्षणासाठी येतात. परंतु ग्रामीण भागातील बसगाड्या सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांना बोरगाव मंजूसह अकोला शहरात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. शिवाय मोठ्या प्रमाणावर शेतकरी व शेतमजूर यांनाही वेळ मिळत नाही. शिवाय स्वत:ची वाहनेसुद्धा नसल्याने आपल्या पाल्याला शाळेत पाठवावे, असे हा प्रश्न पडला आहे.

दरम्यान, अकोला आगारातून पूर्वी यळवण मार्गे कानशिवणी, पळसो बढे, मूर्तिजापूर, पळसो बढे मार्गे बोरगाव मंजू अकोला, मूर्तिजापूर, कानशिवणी, दुधलम मार्गे कवळा अशा बस फेरी सुरू होत्या; परंतु टाळेबंदी काळात सदर बस सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बंद केल्या होत्या. परंतु शासनाने पुन्हा शाळा सुरू केल्या; परंतु बस मात्र ग्रामीण भागातील जाणे बंद असल्याने, विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. संबंधित विभागाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून बस सुरू कराव्यात, अशी विद्यार्थ्यांसह पालकांची मागणी आहे.

फोटो: एसटी व विद्यार्थी

बोरगाव मंजू येथे थांबा देण्याची मागणी

बोरगाव मंजू येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जवळ बसला थांबा द्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालक व शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य भरत बोरे यांनी विभाग नियंत्रकांकडे केली आहे. दरम्यान, येथे बस थांबा नसल्याने जुन्या बस थांब्यावरून परत १ किलोमीटर अंतरावरील रेणुका नगर, लक्ष्मीनगर, दिलासा रुग्णालय, माउंट कारमेल, क. वर्ग तीर्थक्षेत्र संत गजानन महाराज मंदिर, स्वामी समर्थ केंद्र आदी महत्त्वपूर्ण ठिकाणे आहेत. अकोल्यावरून येणाऱ्या बस व मूर्तिजापूरकडून येणाऱ्या बस येथे थांबल्यास जनतेच्या हिताचे होईल. शिवाय परिवहन महामंडळाच्या आर्थिक तिजोरीत अधिक भर पडेल. दरम्यान, येथे थांबा द्यावा, अशी मागणी होत आहे.