शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
5
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
6
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
7
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
8
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
9
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
10
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
11
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
12
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
13
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
14
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
15
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
16
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
17
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
18
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
19
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
20
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   

लंघापूरच्या पुनर्वसनासाठी पुरातनकालीन तलावाचा ‘बळी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:25 IST

मूर्तिजापूर : तालुक्यात तीन बॅरेजची निर्मिती करण्यात येत असली तरी रोहणा बॅरेजचे काम अनेक वर्षांपासून रखडले असून, ते अद्यापही ...

मूर्तिजापूर : तालुक्यात तीन बॅरेजची निर्मिती करण्यात येत असली तरी रोहणा बॅरेजचे काम अनेक वर्षांपासून रखडले असून, ते अद्यापही पूर्णत्वास गेले नाही. या बॅरेज निर्मितीमुळे अनेक गावे उजाड होणार आहेत. यातील लंघापूर गावचे सिरसो गायरान परिसरात पुनर्वसन करण्यात येत असल्याने यासाठी किमान तीन एकराचा पुरातन तलाव भुईसपाट करण्यात आल्याने भविष्यात सिरसो येथे पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

तालुक्यातील सिरसो येथील गायरान परिसरात किमान तीन एकरावर ब्रिटिशकालीन तलाव होते. लंघापूर गावच्या पुनर्वसनासाठी या तलावाचा ‘बळी’ दिल्याने गावकऱ्यात प्रचंड संताप निर्माण झाला आहे. तालुक्यातून वाहणाऱ्या उमा नदीवर रोहणा बॅरेजची निर्मिती करण्यात येत आहे. या बॅरेजचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे; परंतु या बॅरेज अंतर्गत येत असलेल्या लंघापूर गावचा पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्या गावच्या पुनर्वसनासाठी सिरसो गायरान परिसरातील ४ (२६ हजार ४८२ चौरस मीटर) एकर ‘ई’ क्लास जमिनीचे प्रावधान करण्यात आले. त्या दृष्टीने ले-आउटदेखील करण्यात आले आहे; परंतु याच परिसरात किमान तीन एकर क्षेत्रावर असलेल्या ब्रिटिशकालीन तलावच्या भिंती पाडून तो जमीनदोस्त करण्यात आला आहे; मात्र या तलावाची सरकार दप्तरी नोंदच नसल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी वीटभट्टी व्यावसायिकांनी या तलावाच्या गाळासह भिंतीची माती चोरून नेली होती. त्या संदर्भात सिरसो ग्रामपंचायतने २००५ साली उपविभागीय अधिकाऱ्यांना रितसर तक्रार केली होती. त्या पश्चात २०१९ मध्ये तलाव तोडल्या जाऊ नये, अशी विनंतीही ग्रामपंचायतने संबंधित विभागाला केली होती; परंतु तेथे तलाव नसल्याच्या माहितीपासून शासन अनभिज्ञ आहे. एकीकडे शासन जलयुक्त शिवारासाठी भर देत असून, त्यासाठी लाखोंचा खर्च होत असताना स्थानिक प्रशासनाच्या अहवालावरून पुनर्वसन विभागाने अख्खा तलावच गायब केला असल्याने गावकऱ्यात प्रचंड चीड निर्माण झाली आहे. लंघापूरच्या पुनर्वसनासाठी शासन स्तरावरून जमीन व घरारांसाठी ५० कोटी १२ लाख ७ हजार ४०४ रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यातील २१ कोटी ६८ लाख १६ हजार एवढे पुनर्वसन अनुदान देणे बाकी आहे; परंतु या आणखी ‘ई’ क्लास जागा शिल्लक असताना पुनर्वसनासाठी पुरातनकालीन तलावाचा नाहक ‘बळी’ दिला असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

----------------------------------------

पुनर्वसनासाठी सिरसो गायरान परिसरात ई-क्लास जागेचे प्रावधान आहे. त्यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे; परंतु या जागेवर पुरातन तलाव असल्याची आपल्याला माहिती नाही, या संदर्भात आपण अधिक चौकशी करून अहवाल सादर करणार आहे.

सदाशिव शेलार, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, अकोला