शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

मार्च एण्डिंगची धावपळ, मग पंचनामे कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:18 IST

खरिपात अतिवृष्टीमुळे सोयाबीन करपले. बोंडअळीने कापसाची पार दैना केली. पेरणीसाठी लावलेला खर्चही निघाला नाही. तरी पुन्हा जोमाने उभे राहत ...

खरिपात अतिवृष्टीमुळे सोयाबीन करपले. बोंडअळीने कापसाची पार दैना केली. पेरणीसाठी लावलेला खर्चही निघाला नाही. तरी पुन्हा जोमाने उभे राहत शेतकऱ्यांनी रब्बीच्या पिकांची पेरणी केली. पुरेसे सिंचन उपलब्ध असल्याने गहू, हरभरा पिके चांगली झाली; मात्र ऐन काढणीच्या हंगामात अवकाळी पावसाने सर्व दाणादाण उडाली. जिल्ह्यात १८ ते २१ चार दिवस पावसाने हजेरी लावली. गहू घरात येण्याआधीच भिजला. ज्वारी, कांदा, भाजीपाला व फळपिकांचे नुकसान झाले. कृषी विभागाने या नुकसानाचा प्राथमिक अहवाल तयार केला. यामध्ये १८ व १९ तारखेला जिल्ह्यात ४ हजार ७७० हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले, तसेच २० व २१ या तारखेलाही गारपिटीने नुकसान झाले. या नुकसानाचे तातडीने पंचनामे करणे गरजेचे होते; परंतु अद्यापही कृषी व महसूल विभागाचा कोणी कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचला नाही. त्यात मार्च एण्डिंगची धावपळ असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाज पूर्ण करण्याची घाई झाली आहे; मात्र पंचनामे कधी होणार? व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांकडून तत्काळ पंचनामे करण्याची मागणी होत आहे.

--कोट--

जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचमाने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लवकरच पंचनामे करण्यास सुरुवात होईल.

कांताप्पा खोत, जिल्हा कृषी अधीक्षक.

--कोट--

शेतकऱ्यांचे दु:ख कोणाला कळेनासे झाले आहे. मार्च एण्डिंग आर्थिक व्यवहारासाठी असते. तलाठी व कृषी सहायकांना आदेश दिल्यास पंचनामे होऊ शकतात. विनाकारण मार्च एण्डिंगचे कारण पुढे केले जात आहे.

मनोज तायडे, संयोजक, शेतकरी जागर मंच.