शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

मार्च एण्डिंगची धावपळ, मग पंचनामे कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:18 IST

खरिपात अतिवृष्टीमुळे सोयाबीन करपले. बोंडअळीने कापसाची पार दैना केली. पेरणीसाठी लावलेला खर्चही निघाला नाही. तरी पुन्हा जोमाने उभे राहत ...

खरिपात अतिवृष्टीमुळे सोयाबीन करपले. बोंडअळीने कापसाची पार दैना केली. पेरणीसाठी लावलेला खर्चही निघाला नाही. तरी पुन्हा जोमाने उभे राहत शेतकऱ्यांनी रब्बीच्या पिकांची पेरणी केली. पुरेसे सिंचन उपलब्ध असल्याने गहू, हरभरा पिके चांगली झाली; मात्र ऐन काढणीच्या हंगामात अवकाळी पावसाने सर्व दाणादाण उडाली. जिल्ह्यात १८ ते २१ चार दिवस पावसाने हजेरी लावली. गहू घरात येण्याआधीच भिजला. ज्वारी, कांदा, भाजीपाला व फळपिकांचे नुकसान झाले. कृषी विभागाने या नुकसानाचा प्राथमिक अहवाल तयार केला. यामध्ये १८ व १९ तारखेला जिल्ह्यात ४ हजार ७७० हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले, तसेच २० व २१ या तारखेलाही गारपिटीने नुकसान झाले. या नुकसानाचे तातडीने पंचनामे करणे गरजेचे होते; परंतु अद्यापही कृषी व महसूल विभागाचा कोणी कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचला नाही. त्यात मार्च एण्डिंगची धावपळ असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाज पूर्ण करण्याची घाई झाली आहे; मात्र पंचनामे कधी होणार? व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांकडून तत्काळ पंचनामे करण्याची मागणी होत आहे.

--कोट--

जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचमाने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लवकरच पंचनामे करण्यास सुरुवात होईल.

कांताप्पा खोत, जिल्हा कृषी अधीक्षक.

--कोट--

शेतकऱ्यांचे दु:ख कोणाला कळेनासे झाले आहे. मार्च एण्डिंग आर्थिक व्यवहारासाठी असते. तलाठी व कृषी सहायकांना आदेश दिल्यास पंचनामे होऊ शकतात. विनाकारण मार्च एण्डिंगचे कारण पुढे केले जात आहे.

मनोज तायडे, संयोजक, शेतकरी जागर मंच.