शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
4
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
5
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
8
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
10
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
11
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
12
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
13
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
14
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
15
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
20
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!

रोहयो कंत्राटी कर्मचा-यांना हवे ‘कायम’चे कवच!

By admin | Updated: December 2, 2015 03:02 IST

राज्यातील तीन हजारांवर कंत्राटी कर्मचा-यांचा प्रश्न.

संतोष येलकर/अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणार्‍या राज्यातील ३ हजार २९ कर्मचार्‍यांना सेवेत कायम करण्यात आले नाही. त्यामुळे कंत्राटी तत्त्वावरील कर्मचार्‍यांना सेवेत कायम करण्यात यावे, तसेच इतर सवलतींची मागणी रोहयो अंतर्गत कर्मचार्‍यांकडून केली जात आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कंत्राटी तत्त्वावर राज्यात जिल्हा स्तरावर कार्यक्रम व्यवस्थापक, एमआयएस समन्वयक, पंचायत समिती स्तरावर साहाय्यक कार्यक्रम अधिकारी (एपीओ), पॅनल तांत्रिक अधिकारी व डेटा एन्ट्री ऑपरेटर इत्यादी संवर्गातील कर्मचारी काम करतात. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी, नियोजन, डेटा एन्ट्री, कामांचे मोजमाप, संनियंत्रण, ई-मस्टर तयार करणे, रोहयो कामांवरील मजुरांची मजुरी प्रदान करणे इत्यादी प्रकारची कामे या कंत्राटी कर्मचार्‍यांकडून केली जातात. रोहयो अंतर्गत राज्यात विविध संवर्गातील ३ हजार २९ कर्मचारी कार्यरत आहेत. कंत्राटी तत्त्वावरील या कर्मचार्‍यांना सेवेत कायम करण्यात यावे तसेच पीएफ, घरभाडे भत्ता मिळावा, समान काम समान वेतन या तत्त्वाची अंमलबजावणी करण्यात यावी आणि मनरेगा स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी, अशी मागणी रोहयो अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचार्‍यांकडून शासनाकडे केली जात आहे. रोहयो अंतर्गत राज्यातील कंत्राटी कर्मचार्‍यांना सेवेत कायम करण्यात यावे, मनरेगा स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य मनरेगा कर्मचारी संघटनेच्यावतीने मंगळवारपासून राज्यात रोहयो अंतर्गत कंत्राटी कर्मचार्‍यांचा बेमुदत संप पुकारण्यात आला आहे., तसेच संघटनेच्या वतीने मुंबईतील आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले असल्याचे मनरेगा कर्मचारी संघटनेचे राज्याचे सरचिटणीस राजन क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.