शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

रोहयो कंत्राटी कर्मचा-यांना हवे ‘कायम’चे कवच!

By admin | Updated: December 2, 2015 03:02 IST

राज्यातील तीन हजारांवर कंत्राटी कर्मचा-यांचा प्रश्न.

संतोष येलकर/अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणार्‍या राज्यातील ३ हजार २९ कर्मचार्‍यांना सेवेत कायम करण्यात आले नाही. त्यामुळे कंत्राटी तत्त्वावरील कर्मचार्‍यांना सेवेत कायम करण्यात यावे, तसेच इतर सवलतींची मागणी रोहयो अंतर्गत कर्मचार्‍यांकडून केली जात आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कंत्राटी तत्त्वावर राज्यात जिल्हा स्तरावर कार्यक्रम व्यवस्थापक, एमआयएस समन्वयक, पंचायत समिती स्तरावर साहाय्यक कार्यक्रम अधिकारी (एपीओ), पॅनल तांत्रिक अधिकारी व डेटा एन्ट्री ऑपरेटर इत्यादी संवर्गातील कर्मचारी काम करतात. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी, नियोजन, डेटा एन्ट्री, कामांचे मोजमाप, संनियंत्रण, ई-मस्टर तयार करणे, रोहयो कामांवरील मजुरांची मजुरी प्रदान करणे इत्यादी प्रकारची कामे या कंत्राटी कर्मचार्‍यांकडून केली जातात. रोहयो अंतर्गत राज्यात विविध संवर्गातील ३ हजार २९ कर्मचारी कार्यरत आहेत. कंत्राटी तत्त्वावरील या कर्मचार्‍यांना सेवेत कायम करण्यात यावे तसेच पीएफ, घरभाडे भत्ता मिळावा, समान काम समान वेतन या तत्त्वाची अंमलबजावणी करण्यात यावी आणि मनरेगा स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी, अशी मागणी रोहयो अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचार्‍यांकडून शासनाकडे केली जात आहे. रोहयो अंतर्गत राज्यातील कंत्राटी कर्मचार्‍यांना सेवेत कायम करण्यात यावे, मनरेगा स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य मनरेगा कर्मचारी संघटनेच्यावतीने मंगळवारपासून राज्यात रोहयो अंतर्गत कंत्राटी कर्मचार्‍यांचा बेमुदत संप पुकारण्यात आला आहे., तसेच संघटनेच्या वतीने मुंबईतील आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले असल्याचे मनरेगा कर्मचारी संघटनेचे राज्याचे सरचिटणीस राजन क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.