शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

काटेपूर्णा बॅरेज प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता, श्रेय लाटण्याची स्पर्धा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:18 IST

मूर्तिजापूर : तालुक्यातील २००७ पासून रखडलेल्या काटेपूर्णा बॅरेज प्रकल्पास अलीकडेच सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मान्यता मिळविण्यासाठी आपणच प्रयत्न ...

मूर्तिजापूर : तालुक्यातील २००७ पासून रखडलेल्या काटेपूर्णा बॅरेज प्रकल्पास अलीकडेच सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मान्यता मिळविण्यासाठी आपणच प्रयत्न केले केल्याचे सांगत, श्रेय लाटण्यासाठी राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. यामुळे या प्रकल्पाला श्रेय वादाचे ग्रहण लागले आहे. सोशल मीडियावर प्रचंड पत्रकबाजी व जाहिराती सुरू झाल्या आहेत. प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळवून देण्यासाठी आम्हीच पाठपुरावा केल्याचे दावे, प्रतिदावे सत्ताधारी व विरोधी पक्ष करीत आहेत.

तालुक्यातील मंगरूळ कांबे प्रकल्प उभारणीसाठी ३१ ऑगस्ट २००७ रोजी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. तो मंजूर होऊन त्यासाठी ९६ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला होता. तेव्हापासून हा प्रकल्प अर्धवट अवस्थेत असून, आता पुन्हा २४ मार्च रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ५३३ कोटी ८१ लाख रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास १३ गावांमधील ४ हजार २८१ शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे. केवळ प्रकल्प पूर्णत्वास जाऊन शेतकऱ्यांचे भले व्हावे, एवढी अपेक्षा न ठेवता प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता आम्हीच मिळवून दिली. याचे श्रेय घेण्यासाठी नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे.

जलसंपदामंत्री जयंत पाटील ६ फेब्रुवारी रोजी मूर्तिजापुरात आले असता, या प्रकल्पाबाबत त्यांना काही स्थानिक नेत्यांनी अवगत करून दिले होते. त्यावेळी प्रकल्प पूर्ण करून घेण्यासाठी लक्ष घालणार असल्याचे आश्वासन दिले होते. पाटील यांनी आश्वासन पाळल्याचे स्थानिक राष्ट्रवादी नेत्यांचे म्हणणे आहे. विदर्भातील अनेक प्रकल्पासाठी आपण शर्तीचे प्रयत्न केले. काटेपूर्णा बॅरेज सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी आपण विशेष प्रयत्न केल्यामुळेच सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली, असे पालकमंत्री बच्चू कडू म्हणत आहेत. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील पंढरी प्रकल्प, गर्गा मध्यम प्रकल्प, धारणी तालुक्यातील मान्सूधावडी प्रकल्पांना आपल्याच प्रयत्नाने सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनीही प्रकल्पासाठी केलेला पत्रव्यवहार व पाठपुरावा केला. २९ ऑगस्ट २०१९ रोजी नियामक मंडळाच्या बैठकीत प्रशासकीय मान्यता प्रस्ताव मंजूर करुन घेतल्याचा दावा केला आहे.

फोटो: