शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

कालवडी येथील मृत पक्ष्यांचा अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:18 IST

अकोला - अकाेट तालुक्यातील कालवडी येथील पोल्ट्री फार्ममधील मृत पक्ष्यांचे अहवाल एच ५ एन१ करिता निगेटिव्ह आले आहे. तसेच ...

अकोला - अकाेट तालुक्यातील कालवडी येथील पोल्ट्री फार्ममधील मृत पक्ष्यांचे अहवाल एच ५ एन१ करिता निगेटिव्ह आले आहे. तसेच अकोटजवळील खासगी पाळलेल्या पक्ष्यांचे, रामापूर येथे आढळलेल्या मृत मोराचा अहवालही निगेटिव्ह आल्याची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. तुषार बावने यांनी दिली. दरम्यान, अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे बर्ड फ्लूसंदर्भात जारी करण्यात आलेल्या चार अधिसूचनांचे आदेश रद्द करण्यात आले असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

यासंदर्भात पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नियमित रोगनिदान सर्वेक्षणअंतर्गत ३५२ नमुने पाठविण्यात आले आहेत. रोगनिदानाकरिता पाठविलेल्या मृत १३ कुक्कुट पक्ष्यांपैकी पिंपळगाव चांभारे ता. बार्शीटाकळी व कुरणखेड ता. अकोला येथील नमुने एच५ एन१ करिता पॉझिटिव्ह आले. दोन्ही ठिकाणी केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे विविध ऑपरेशन पशुसंवर्धन विभागातर्फे पूर्ण करण्यात आले आहे. पिंपळगाव चांभारे येथील कुक्कुटपालकांना नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे.

अकोट तालुक्यामधील ग्राम कालवडीजवळील कुक्कुट फार्ममधील २४३५ पक्षी मृत पावले होते. त्या कुक्कुट फार्ममधील मृत पक्ष्यांचे अहवाल एच५एन१ करिता निगेटिव्ह आले आहेत. त्याचप्रमाणे अकोट जवळील परसातील कुक्कुट फार्ममधील १०८ पक्षी मृत पावले होते. त्याचादेखील अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्याचप्रमाणे रामापूर येथील शेतशिवारात मृत पावलेल्या मोराचाही अहवाल एच५एन१ करिता निगेटिव्ह आला आहे.

जंगली व इतर पक्षी व कावळे यांचे आतापर्यंत १७ नमुने पुणे येथे पाठविले असून त्यांचा अहवाल अजून प्रतीक्षेत आहे. आतापर्यंत एकूण १५ अधिसूचना बर्ड फ्लूसंदर्भात काढण्यात आल्या होत्या. त्यापैकी चार अधिसूचनांचे आदेश रद्द करण्यात आले आहेत. त्यात अकोट, कालवडी ता. अकोट, रामापूर ता. अकोट व चाचोडी ता. अकोला या क्षेत्रांचा समावेश आहे, अशी माहिती देण्यात आली.

पोल्ट्री फार्मधारकांनी कोंबड्याचे खुराडे व गटारे, नाल्या तसेच पशु- पक्ष्यांचा वावर असलेल्या भिंती व जमिनीवर सोडियम कार्बोनेट(धुण्याचा सोडा) यांचे एक लिटर पाण्यामध्ये सात ग्रॅम द्रावणाची फवारणी करुन निर्जंतुकीकरण करुन घ्यावे. दर १५ दिवसांच्या अंतराने तीन वेळेस फवारणी करावी. त्याचप्रमाणे पोल्ट्री फार्मवर स्वच्छता ठेवावी व जैवसुरक्षा यंत्रणा सक्षम करावी. स्तलांतरित पक्षी यांचा पोल्ट्रीफार्म सोबत संपर्क येवू नये, याची दक्षता घ्यावी. तरी नागरिकांनी घाबरून न जाता अंडी, चिकन उकळून खावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.