शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जूनअखेर कर्ज प्रकरणे निकाली काढा, अन्यथा फौजदारी कारवाई

By admin | Updated: June 24, 2015 02:02 IST

विभागीय आयुक्तांनी पीककर्जाचा घेतला आढावा

अकोला: शासनाने पीककर्ज वाटप, कर्जपुनर्गठन व कर्ज पुनर्गठन करून नव्याने कर्जवाटप करण्याची मुदत ३0 जून ठरविली आहे. या मुदतीच्या आत कर्ज प्रकरणे निकाली काढा, असे निर्देश विभागीय महसूल आयुक्त ज्ञानेश्‍वर राजूरकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात २३ जून रोजी पीककर्ज पुनर्गठनाबाबतच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला विभागीय महसूल आयुक्त ज्ञानेश्‍वर राजूरकर, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, वाशिमचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंद्रसिंह, विभागीय सहनिबंधक गौतम वालदे, जिल्हा उपनिबंधक ज्ञानदीप लोणारे, वाशिम उपनिबंधक ज्ञानेश्‍वर खाडे, निवासी जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, जिल्हा अग्रणी बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड, जिल्हा कृषी अधीक्षक शांताराम मालपुरे, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, शैलेश हिंगे, गजानन निपाणे, राम लठाड यांच्यासह जिल्हय़ातील सर्वच बँकांचे अधिकारी व प्रतिनिधी हजर होते. यावेळी बँकनिहाय कर्जाचे लक्ष्य व आतापर्यंत किती लक्ष्यपूर्ती झाली, याची माहिती घेण्यात आली. यावेळी बँकांनी कर्जाचे लक्ष्य पूर्ण झाले नसल्याची माहिती सादर केली, तर ३0 जूनच्या आत लक्ष्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, असे आश्‍वासन दिले. जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी बँकांना पत्र दिले असून, त्यामध्ये ३0 जूनच्या आत पीककर्जाची लक्ष्यपूर्ती झाली नाही तर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला असल्याची आठवण बँकेच्या प्रतिनिधींना करून दिली. यावेळी सर्व बँकांच्या कर्जपुरवठय़ाचा आढावा घेण्यात आला.