शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
3
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
4
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
5
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
6
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
7
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
8
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
9
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
10
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
11
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
12
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
13
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
14
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
15
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
18
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
19
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
20
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...

दुष्काळातही शेतसारा वसुली!

By admin | Updated: December 6, 2015 02:28 IST

अकोला जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतक-यांना सवलती केव्हा मिळणार?

अकोला: जिल्ह्यातील खरीप पिकांची सुधारित पैसेवारी सरासरी ४२ पैसे जिल्हा प्रशासनमार्फत जाहीर करण्यात आली. पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असल्याने, जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर शिक्कामोर्तब झाले असले तरी, शासनामार्फत दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी सवलती अद्याप जाहीर करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीतही जिल्ह्यात शेतकर्‍यांकडून शेतसार्‍याची वसुली करण्यात येत आहे. या पृष्ठभूमीवर दुष्काळी दुष्टचक्रात सापडलेल्या शेतकर्‍यांना दुष्काळी परिस्थितीत दिल्या जाणार्‍या सवलती केव्हा मिळणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. यावर्षी पावसाळय़ात अत्यल्प पाऊस झाल्याने खरीपाचे पीक हातून गेले. सोयाबीन पिकाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली असून, कपाशीचे उत्पादनही एकरी चार क्विंटलच्यावर पोहोचले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला. यावर्षीच्या खरीप हंगामातील जिल्ह्यातील सातही तालुक्यातल्या लागवडी योग्य ९९७ गावांमधील खरीप पिकांची सुधारित पैसेवारी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी ७ नोव्हेंबर रोजी जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व ९९७ गावांची खरीप पिकांची सरासरी पैसेवारी ४२ पैसे म्हणजेच ५0 पैशांपेक्षा कमी आहे. खरीप पिकांच्या पैसेवारीचा अहवाल जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला. पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असल्याने, जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे चित्र स्पष्ट झाले; मात्र शासनामार्फत अद्यापही जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आला नसून, दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांना द्यावयाच्या विविध सवलतीही जाहीर करण्यात आल्या नाही. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीतही जिल्ह्यातील शेतकर्‍यांकडून शेतसारा वसूल करण्यात येत आहे. दुष्काळी परिस्थितीत शासनामार्फत दिल्या जाणार्‍या जमीन महसुलात सूट व इतर सवलतींचा लाभ जिल्ह्यातील शेतकर्‍यांना केव्हा मिळणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.