शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

पाण्यासाठी जनावरांची धावाधाव!

By admin | Updated: December 1, 2014 00:31 IST

पाणीटंचाईचा फटका : समस्या तीव्र होणार.

अकोला: अल्प पावसामुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत पाणीटंचाईचे चटके ग्रामस्थांना सहन करावे लागत असतानाच, पिण्याच्या पाण्यासाठी जनावरांचीही धावाधाव सुरू झाली आहे. ही समस्या येणार्‍या काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, खरीप पिके शेतकर्‍यांच्या हातून गेली. तसेच धरणांमध्ये पुरेसा जलसाठाही उपलब्ध झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, धरणांमध्ये अल्प जलसाठा उपलब्ध असल्याच्या स्थितीत जिल्ह्यातील विविध भागात हिवाळ्यातच पाणीटंचाई निर्माण झाली आहे. खारपाणपट्टय़ातील जिल्ह्यातल्या खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना सध्या पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गोड पाण्याचे स्रोत उपलब्ध नसलेल्या इतर गावातही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. पाणीटंचाईच्या परिस्थितीत जनावरांना पिण्यासाठी पाणी कोठून आणावे, असा प्रश्न ग्रामस्थांसमोर उपस्थित झाला आहे. काही गावांमध्ये तलावात सध्या उपलब्ध असलेल्या पाण्यावर जनावरांना तहान भागवावी लागत आहे. गाळ साचलेल्या तलावांमधील शेवाळलेल्या पाण्यावर तसेच गावातील नाल्याच्या ठिकाणी तहान भागविण्यासाठी गुरा-ढोरांना धावाधाव करावी लागत आहे. मात्र गावतलावांमधील पाणी आणखी महिना-दीड महिना पुरणार आहे. तलावातील पाणी आटल्यानंतर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही दिवसातच आणखी गंभीर होण्याची शक्यता ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. या पृष्ठभूमीवर दुष्काळी परिस्थितीत नापिकी आणि पाणीटंचाईच्या झळा सोसणार्‍या ग्रामस्थांना जनावरांच्या पाण्याची चिंताही सतावत आहे.