शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

आलेगाव येथे पावसाचा तडाखा

By admin | Updated: June 11, 2017 02:34 IST

शेती खरवडून गेली: २५ मेंढय़ांचा मृत्यू; वीज पडून म्हैस ठार

लोकमत न्यूज नेटवर्कआलेगाव : परिसरात शुक्रवारी रात्री झालेल्या तुफान पावसाचा तडाखा बसला. ढगफुटीसारख्या झालेल्या या पावसामुळे परिसरात मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. जांब येथे शेती खरवडून गेली, तर शेतात असलेल्या २५ मेंढय़ा व काही कोंबड्यांचा मृत्यू झाला. पावसाचा जोर जास्त असल्याने अनेक शेतकर्‍यांनी टाकलेले बांध फुटले. दरम्यान लसनापूर येथे वीज पडून म्हैस ठार झाल्याची घटना घडली आहे.या वर्षी पिकाला भाव नसल्यामुळे शेतकरी आधीच संकटात आहे. या वर्षी वेळेवर वरुणराजाचे आगमन होईल, या आशेने शेतकर्‍यांनी मेहनत करून शेताची मशागत केली; परंतु मान्सूनपूर्व पावसाने ढगफुटीसारखा पाऊस दोन तास पडल्याने नदी-नाले एकत्र झाले व मोठा पूर आला. यापूर्वी २00६ साली असा पूर आला होता. या पावसाने चोंढी शिवार, जांबमध्ये आणि आलेगाव परिसरात खूप मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. त्यामध्ये मोठ-मोठे बांध टाकलेले वाहून गेले, शेतामध्ये असलेल्या शेंगांचे ढीग वाहून गेले, कांदा साठविल्या ठिकाणीसुद्धा पाणीच पाणी झाले. तसेच काही शेतकर्‍यांनी शेतात मेंढय़ा व कोंबड्या बसवलेल्या आहेत. जोरदार पावसामुळे २५ मेंढय़ा व काही कोंबड्यांचा मृत्यू झाला. कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. त्यातच या पावसामुळे कांदा पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. तसेच गावाला लागून असलेल्या लेंडी नाला अरुंद झाल्यामुळे पाणी लोकांच्या घरात शिरल्याने त्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. बस स्थानकावर असलेल्या जैन कृषी सेवा केंद्रात पाणी शिरल्याने खते, बियाणे भिजल्याने मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. तसेच जनरल स्टोअर्स, पानटपरी, चहा हॉटेल, कापड दुकान, फ्रूटचे दुकान आदींमध्येही पाणी शिरल्याने नुकसान झाले. परिसरात झालेल्या नुकसानाचा तलाठय़ांनी सर्व्हे सुरू केला.