शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

पाऊस तासभर, वीज गायब रात्रभर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:14 IST

कारंजा रम ३३ केव्ही वीज उपकेंद्रांतर्गत अंदुरा परिसरातील १६ गावांना वीजपुरवठा करण्यात येतो. परंतु मागील काही दिवसांपासून अंदुरा येथे ...

कारंजा रम ३३ केव्ही वीज उपकेंद्रांतर्गत अंदुरा परिसरातील १६ गावांना वीजपुरवठा करण्यात येतो. परंतु मागील काही दिवसांपासून अंदुरा येथे विजेचा लपंडाव सुरू असून, कधी वारा तर कधी पाऊस जरी तासभर पडला तरी वीजपुरवठा रात्रभर खंडित करण्यात येतो, तर कधी वारा, पाऊस नसतानासुद्धा वीजपुरवठा रात्रभर खंडित केला जातो. एवढेच नव्हे दर तासाला वीजपुरवठा खंडित होतो. यामुळे कधी वीजपुरवठा जास्त दाबाने तर कधी कमी दाबाने होत असल्याने घरातील विजेवर चालणाऱ्या वस्तू निकामी होत असून, नागरिकांना नाहक आर्थिक त्रास होत आहे.

विजेच्या लपंडावामुळे व्यवसाय बंद

मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे विजेवर चालणारे व्यवसाय बंद करून ठेवण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. तसेच वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाणीपुरवठा योजना ठप्प पडली असून, परिसरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली असून, येत्या तीन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न केल्यास कारंजा रम येथील वीज उपकेंद्र येथे आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.