शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस चांगला, पण उत्पादन घटणार!

By admin | Updated: August 2, 2016 00:20 IST

संततधार पावसाचा पिकावर दुष्परिणाम.

राजरत्न सिरसाटअकोला : यावर्षी पाऊस चांगला झाला आहे. पण, अतवृष्टी आणि सतत पाऊस सुरू असून, सूर्यप्रकाश नसल्याने पिकांच्या मुळांपर्यंत प्राणवायू पोहोचत नसल्याने सर्वच खरीप पिकांवर दुष्परिणाम होत असून, विदर्भातील सोयाबीन, तूर व कापूस क्षेत्र बाधित झाले आहे. याचे प्रतिकूल परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तविली आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात विदर्भात कापसाचा पेरा १२ लाख हेक्टरवरू न १0 लाख हेक्टरपर्यंत घसरला आहे. सोयाबीनचे क्षेत्र १४ लाख हेक्टरवर गेले आहे. पूर्व विदर्भात धानाचे क्षेत्र जवळपास सात लाख हेक्टर आहे. कडधान्य आठ लाख, तर गळित धान्य जवळपास दोन लाख हेक्टर आहे. यावर्षी जून महिन्याच्या शेवटी चांगला पाऊस झाल्याने शेतकर्‍यांनी जून व जुलै महिन्यात जवळपास ९0 टक्के क्षेत्रावर पेरणी केली. पण, पाऊस उसंत देत नसल्याने विदर्भातील काही ठिकाणची शेती पाण्याखाली गेली असून, ३५ ते ४0 दिवसांपासून पिकांना प्रकाशसंश्लेषणासाठी सूर्यप्रकाश मिळाला नसल्याने सर्व पिकांची अन्नप्रक्रिया तयार करण्याची गती मंदावली आहे.

सर्वच पिकांच्या नुकसानाची शक्यता सततच्या पावसामुळे मूग, उडिदाचे नुकसान होत असून, पश्‍चिम विदर्भातील साडेचार हेक्टरवरील तूर पीक धोक्यात आले आहे. यातील काही पिकांचे नुकसानदेखील झाले आहे. सोयाबीन तग धरू न आहे. पण, प्रकाशसंश्लेषण नसल्याने सोयाबीन पिकावर मूळकूज, खुळकूज व कॉलर रॉट रोग येण्याची शक्यता बळावली आहे. शेतातील डवरणी, निंदण रखडले आणि सूर्यप्रकाश नसल्याने कापूस पिकाची वाढ खुंटली असून, तणाने शेतं व्यापली आहेत. तूर, ज्वारी ही पिके पिवळी पडत आहेत. जुलै महिन्यातील पावसाने शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली आल्याने त्या पिकांचे नुकसान झाले आहे.

लागवड खर्चात वाढ, नफ्यात घटसतत पाऊस सुरू असल्याने पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करणे बंद आहे. तणनाशकाची फवारणी करता आली नाही. काही शेतकर्‍यांनी फवारणी केली पण, त्यावर लगेच पाऊस येत असल्याने शेतकर्‍यांच्या लागवड खर्चात वाढ व नफ्यात घट येण्याची शक्यता आहे.

-किंडीचा प्रादुर्भाव*सोयाबीनला चक्रभुंगा, हिरवी उंटअळी, लष्करी अळीचा धोका *कापसावर रसशोषण करणार्‍या किडींचा प्रादुर्भाव, बुरशी जन्य रोग, गुलाबी बोंडअळी*मूग पिकावर रसशोषण किडींचा प्रादुर्भाव*ज्वारीवर नाकतोड्याच्या प्रादुर्भावाची शक्यता * संत्र्यावर फायटोपथेरा; बागा वाळण्याचा धोका पाऊस चांगला, पण उत्पादन घटणार!  सततच्या पावसामुळे आणि प्रकाश संश्लेषण होत नसल्याने पिकांच्या मुळांपर्यंत प्राणवायू पोहोचत नाही. परिणामी, पिके पिवळी पडतात, तर मावा किडीमुळे सोयाबीनवर ह्यमोझ्ॉकह्ण तर पांढर्‍या माशीमुळे ह्यपिवळा मोझ्ॉकह्ण येण्याची भीती असते. या स्वरू पाच्या पावसामुळे संत्र्यावर ह्यफायटोपथेराह्ण येऊन बागा वाळण्याची शक्यता असते. तेव्हा शेतकर्‍यांनी शेतातील पाणी बाहेर काढावे व डवरणी करावी. - डॉ.आर.एम. गाडे,वनस्पती रोग शास्त्रज्ञ,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.