शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

पाऊस पडेना..अधिकारी मिळेना

By admin | Updated: July 4, 2014 00:44 IST

कृषी कार्यालयात कर्मचार्‍यांचा दुष्काळ

आकोट: कृषी उत्पादन वाढीसाठी शेतकर्‍यांना मार्गदर्शनाची निकड लक्षात घेऊन उघडलेल्या आकोट तालुका कृषी कार्यालयात अधिकारी-कर्मचार्‍यांचा दुष्काळ पडला आहे. अधिकारी-कर्मचार्‍यांची ६७ पदे मंजूर असलेल्या तालुका कृषी कार्यालयात केवळ २८ कर्मचारीवर्ग उरला आहे. उपविभागीय कृषी अधिकारी सोडाच; पण तालुका कृषी अधिकारीसुद्धा कार्यरत नाहीतच. पण कार्यरत असलेले कर्मचारीसुद्धा प्रभार सांभाळण्यात वेळ मारून नेत आहेत. शेती क्षेत्राशी निगडित सर्व विभागांचा त्यात समावेश करून ग्रामीण भागात शेतीमधे उत्पादनवाढीसाठी शासनस्तरावरून आवश्यक ती मदत करण्याच्या उद्देशाने जुलै १८८३ मध्ये कृषी खात्याची स्थापना करण्यात आली. प्रशासकीय कामकाज, इतर विभागांशी संपर्क, संनियंत्रण व प्रशिक्षण कार्यक्रम इत्यादी सोयीसाठी तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी, उपविभाग स्तरावर उप विभागीय कृषी अधिकारी यांची कार्यालये उघडण्यात आली. आकोट तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ६७ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ३0 महत्त्वाची पदे रिक्त आहेत. रिक्त पदामध्ये सहाय्यक अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, कृषी सहाय्यक, लिपिक, अनुरेखांक आदी महत्त्वाच्या पदाचा समावेश आहे. शिवाय कार्यरत असलेल्या ३७ पदापैंकी ८ जणांची बदली होऊन कार्यमुक्त झाले आहे. विशेष म्हणजे आकोट तालुका कृषी अधिकारी साळी व उपविभागीय कृषी अधिकारी गायकवाड हेसुद्धा बदली होऊन कार्यमुक्त झाले; परंतु त्याच्या जागी अद्याप कोणी रुजू झाले नाही. शेतकर्‍यांच्या सुलभ संपर्कासाठी आवश्यक असलेले कृषी सहायक भोई, डोईफोडे, कुमावात, बाजाड, राजनकर, निमकर, करवते मालसुरे यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे; परंतु त्याच्या जागी अद्याप बदलीवर आलेले कृषी सहाय्यक व अधिकारी हे रुजू झाले नाहीत. त्यामुळे उर्वरित कर्मचार्‍यांना अतिरिक्त प्रभार सांभाळावा लागत असल्याने शेतकर्‍यांच्या कामांना न्याय मिळणे कठीण झाले आहे. सुधारित तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकर्‍यांपर्यंत पोचवण्यासाठी आखलेल्या पीक प्रात्यक्षिके, प्रक्षेत्र भेटी, प्रचारसभा, चर्चासत्रे, मेळावे, प्रदर्शने इत्यादी कार्यक्रमांची परिणामकारक अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कृषी विभागावर आहे. पाऊस पडत नसल्यामुळे त्यांना योग्य मार्गदर्शन करीत जनजागृती करण्याची जबाबदारी तालुका कृषी कार्यालयाची आहे; परंतु कृषी कार्यालयातच रिक्त असलेल्या पदाचा दृष्काळ पडल्यामुळे शेतकर्‍यांना मार्गदर्शन कसे मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.** आकोट नकोच!आकोट येथे तालुका कृषी कार्यालयात काम करण्यास कोणताही अधिकारी-कर्मचारी उत्सुक दिसत नाही. माहितीचे अधिकार, निर्थक तक्रारी यामुळे कार्यालयातील अधिकारी वैतागले आहेत. त्यामुळे एकंदरीत वातावरण पाहता अनेक कर्मचार्‍यांनी येथून काढता पाय घेतला. शिवाय बदलीवर आलेले कर्मचारीसुद्धा आकोट नको म्हणत पर्यायी व्यवस्था शोधत आहे. आकोट येथे तालुका कृषी अधिकारी साळी वगळता कायमस्वरूपी एकही अधिकारी जास्त काळ टिकला नाही.