शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांच्या सुविधा वाढविण्यावर रेल्वेचा भर !

By admin | Updated: June 22, 2016 23:59 IST

भुसावळ रेल्वेच्या वाणिज्य प्रबंधकांनी दोन वर्षांचा आढावा घेतला.

शेगाव (जि. बुलडाणा) : गत दोन वर्षांत रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या अडीअडचणी जाणून त्या दूर करण्यासाठी यथोचित प्रयत्न केले. त्यात रेल्वे प्रशासनाला यश आले असल्याची माहिती भुसावळ रेल्वे विभागाचे वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा यांनी बुधवारी येथे दिली. मोदी सरकारच्या दोन वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा प्रत्येक विभागाने जनतेपर्यंत मांडावा, असे केंद्र शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार बुधवारी भुसावळ रेल्वे विभागाच्यावतीने मागील दोन वर्षांंत विभागांतर्गत प्रवाशांसाठी केलेली कामे व दिलेल्या सुविधांचा आढावा शेगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत मांडण्यात आला. वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा यांचे महाराष्ट्र एक्स्प्रेसने शेगाव येथे आगमन झाल्यानंतर त्यांनी रेल्वे स्थानकाची पाहणी केली. यानंतर रेल्वेच्या विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, शेगाव रेल्वे स्थानकावर अतिरिक्त पादचारी दादरा, रेल्वे टिकीट खिडकीवर होणारी गर्दी पाहता अतिरिक्त काउंटर, चौकशी कक्ष, पिण्याचे पाणी, वाहन पार्किंग आदी व्यवस्था रेल्वे प्रशासनाने अग्रक्रमाने केल्या आहेत. याशिवाय अकोला, मलकापूर, भुसावळ आदी रेल्वे स्थानकेही अद्ययावत केली आहेत. राहिलेली कामे प्रगतिपथावर आहेत, असे त्यांनी सांगितले. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की, शेगाव रेल्वे स्थानकातून तिकिटांची अवैध विक्री व ऑटोरिक्षाचालकांचा प्रवाशांना होणारा त्रास याची आपण गंभीर दखल घेतली असून, संबंधित विभागाला कारवाई करण्याच्या सूचना देणार आहोत, असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत रेल्वे प्रवासी संघाच्यावतीने निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनामध्ये सुपरफास्ट गाड्यांना शेगाव येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.