शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिके धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:57 IST

बाळापूर : दोन दिवासांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे शेतकरी चिंतित आहे. रब्बी हंगामातील गहू, व हरभरा पिकांवर विविध किडींचा ...

बाळापूर : दोन दिवासांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे शेतकरी चिंतित आहे. रब्बी हंगामातील गहू, व हरभरा पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. किडीच्या बंदोबस्तासाठी पुन्हा शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करीत असल्याचे चित्र आहे. तालुक्यात तुरीची सोंगणी सुरू असून, ढगाळ वातावरणामुळे सोंगणी केलेले शेतकरी चिंतातुर झाले आहेत. खरिप हंगामातील तुरीचे पीक सध्या सोंगणीला आले असून, तालुक्यातील ग्रामीण भागात तुरीची सोंगणी सुरू आहे. गत दोन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तसेच सध्या रब्बी हंगामातील हरभरा, गहू पिके बहरली असून, हरभऱ्याचे पीक फुलधारणा अवस्थेत आहे. वातावरणातील बदलांमुळे हरभऱ्यावर अळींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गहू पिकावर खोड अळी, मर रोगाने आक्रमण केले आहे. त्यामुळे यंदा गहू, तूर व हरभरा पिकाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. खरिप हंगामापाठोपाठ आता रब्बी हंगामातली पिके धोक्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे. किडीच्या बंदोबस्तासाठी शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करीत असल्याचे चित्र आहे.

----------------------------

तूर सोंगणीची लगबग

तालुक्यात गत दोन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतित आहे. तुरीचे पीक सोंगणीला आले असून, पावसामुळे तुरीचे नुकसान होऊ नये, यासाठी शेतकरी सोंगणीची घाई करीत असल्याचे चित्र आहे. काही भागात तुरीच्या सोंगणीची लगबग सुरू असल्याने मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे.

------------------------------

पेरणी केल्यापासून ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिके धोक्यात आले असून, हरभऱ्यावर धुक्यामुळे कीडीचे आक्रमण वाढले आहे. त्यामुळे यंदा केलेला खर्चही निघतो की नाही, याची चिंता आहे.

- ----------------, शेतकरी