शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिके धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:57 IST

बाळापूर : दोन दिवासांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे शेतकरी चिंतित आहे. रब्बी हंगामातील गहू, व हरभरा पिकांवर विविध किडींचा ...

बाळापूर : दोन दिवासांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे शेतकरी चिंतित आहे. रब्बी हंगामातील गहू, व हरभरा पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. किडीच्या बंदोबस्तासाठी पुन्हा शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करीत असल्याचे चित्र आहे. तालुक्यात तुरीची सोंगणी सुरू असून, ढगाळ वातावरणामुळे सोंगणी केलेले शेतकरी चिंतातुर झाले आहेत. खरिप हंगामातील तुरीचे पीक सध्या सोंगणीला आले असून, तालुक्यातील ग्रामीण भागात तुरीची सोंगणी सुरू आहे. गत दोन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तसेच सध्या रब्बी हंगामातील हरभरा, गहू पिके बहरली असून, हरभऱ्याचे पीक फुलधारणा अवस्थेत आहे. वातावरणातील बदलांमुळे हरभऱ्यावर अळींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गहू पिकावर खोड अळी, मर रोगाने आक्रमण केले आहे. त्यामुळे यंदा गहू, तूर व हरभरा पिकाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. खरिप हंगामापाठोपाठ आता रब्बी हंगामातली पिके धोक्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे. किडीच्या बंदोबस्तासाठी शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करीत असल्याचे चित्र आहे.

----------------------------

तूर सोंगणीची लगबग

तालुक्यात गत दोन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतित आहे. तुरीचे पीक सोंगणीला आले असून, पावसामुळे तुरीचे नुकसान होऊ नये, यासाठी शेतकरी सोंगणीची घाई करीत असल्याचे चित्र आहे. काही भागात तुरीच्या सोंगणीची लगबग सुरू असल्याने मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे.

------------------------------

पेरणी केल्यापासून ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिके धोक्यात आले असून, हरभऱ्यावर धुक्यामुळे कीडीचे आक्रमण वाढले आहे. त्यामुळे यंदा केलेला खर्चही निघतो की नाही, याची चिंता आहे.

- ----------------, शेतकरी