शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी पीक कर्जाचे वाटप १५ कोटींवरच!

By admin | Updated: January 12, 2017 02:21 IST

डिसेंबर अखेरपर्यंत जिल्हय़ात केवळ १५ कोटी ६३ लाख ५८ हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले.

अकोला, दि. ११- यावर्षीच्या रब्बी हंगामात जिल्हय़ात ५१ कोटी ५२ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असले, तरी डिसेंबर अखेरपर्यंत जिल्हय़ात केवळ १५ कोटी ६३ लाख ५८ हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. नोटाबंदीच्या कालावधीत कर्ज वाटपात अडचणी निर्माण झाल्याने, रब्बी पीक कर्ज वाटपाला फटका बसला. त्यामुळे यावर्षीच्या रब्बी हंगामातील पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावर्षीच्या रब्बी हंगामात जिल्हय़ातील शेतकर्‍यांना ५१ कोटी ५२ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. दरम्यान, पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारमार्फत गत ८ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला. नोटाबंदीच्या कालावधीत नवीन ५00 रुपयांसह १00, ५0, २0 आणि १0 रुपयांच्या नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने सर्वच प्रकारच्या आर्थिक व्यवहारावर परिणाम झाला. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर लादण्यात आलेले आर्थिक निर्बंध आणि चलन तुटवड्यामुळे रब्बी पीक कर्ज वाटपावरही परिणाम झाला. या पृष्ठभूमीवर जिल्हय़ातील रब्बी पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टाच्या तुलनेत डिसेंबर अखेरपर्यंत जिल्हय़ात केवळ १ हजार ६१५ शेतकर्‍यांना १५ कोटी ६३ लाख ५८ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. उद्दिष्टाच्या तुलनेत रब्बी पीक कर्ज वाटपाचे प्रमाण अत्यल्प असल्याने, यावर्षीच्या रब्बी हंगामात पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.