शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

रब्बी पीक कर्जाचे वाटप १५ कोटींवरच!

By admin | Updated: January 12, 2017 02:21 IST

डिसेंबर अखेरपर्यंत जिल्हय़ात केवळ १५ कोटी ६३ लाख ५८ हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले.

अकोला, दि. ११- यावर्षीच्या रब्बी हंगामात जिल्हय़ात ५१ कोटी ५२ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असले, तरी डिसेंबर अखेरपर्यंत जिल्हय़ात केवळ १५ कोटी ६३ लाख ५८ हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. नोटाबंदीच्या कालावधीत कर्ज वाटपात अडचणी निर्माण झाल्याने, रब्बी पीक कर्ज वाटपाला फटका बसला. त्यामुळे यावर्षीच्या रब्बी हंगामातील पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावर्षीच्या रब्बी हंगामात जिल्हय़ातील शेतकर्‍यांना ५१ कोटी ५२ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. दरम्यान, पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारमार्फत गत ८ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला. नोटाबंदीच्या कालावधीत नवीन ५00 रुपयांसह १00, ५0, २0 आणि १0 रुपयांच्या नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने सर्वच प्रकारच्या आर्थिक व्यवहारावर परिणाम झाला. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर लादण्यात आलेले आर्थिक निर्बंध आणि चलन तुटवड्यामुळे रब्बी पीक कर्ज वाटपावरही परिणाम झाला. या पृष्ठभूमीवर जिल्हय़ातील रब्बी पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टाच्या तुलनेत डिसेंबर अखेरपर्यंत जिल्हय़ात केवळ १ हजार ६१५ शेतकर्‍यांना १५ कोटी ६३ लाख ५८ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. उद्दिष्टाच्या तुलनेत रब्बी पीक कर्ज वाटपाचे प्रमाण अत्यल्प असल्याने, यावर्षीच्या रब्बी हंगामात पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.