शहरं
Join us  
Trending Stories
1
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
2
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
3
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
4
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
5
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
6
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
7
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
8
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
9
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
10
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
11
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
12
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
13
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
14
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
15
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
16
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
17
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 
18
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 
19
"आम्ही विरोधात असलो तरी..."; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण
20
धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

शाळांसाठी ‘आरओ’ फिल्टर खरेदी बारगळली!

By admin | Updated: March 7, 2017 02:23 IST

निधी खर्चासाठी हात बांधले; प्रक्रियेला उशीर झाल्याने अडकली योजना.

सदानंद सिरसाट अकोला, दि. ६- जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्ह्यातील ६0 पेक्षाही अधिक शाळांमध्ये जलशुद्धीकरण यंत्रांची (आरओ फिल्टर) खरेदी योजना बारगळली आहे. खरेदी प्रक्रियेला झालेला उशीर आणि त्यातच शासनाने खरेदीवरच आणलेल्या बंधनात ही योजना अडकली आहे. योजनेचा ५0 लाखांचा निधी शासनाकडेच अखर्चित राहणार आहे. जिल्हा नियोजन समितीमध्ये ठरल्यानुसार शाळांमध्ये आरओ फिल्टरसाठी निधीची तरतूद करण्यात आली. त्यासाठी ५0 लाख रुपये निधीही मिळाला. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. त्यामध्ये उत्पादनाला आयएसआय मानांकन असलेल्या एकाही पुरवठादाराने निविदा सादर केलेली नाही. त्यामुळेही त्या आरओ (फिल्टर)च्या खरेदीवरून अधिकार्‍यांचा गोंधळ उडालेला आहे. त्यातच शासनाच्या १७ जानेवारी २0१७ रोजीच्या शासन निर्णयाने योजनेचा गळाच दाबला आहे. खरेदी रोखल्याने निधी राहणार अखर्चितशासनाच्या वित्त विभागाने राज्याने विविध योजनांसाठी जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन समिती, तसेच विविध विकास कामांसाठी दिलेला निधी खर्च करण्याची अंतिम प्रक्रिया १७ जानेवारीपूर्वी पूर्ण केलेली असावी. त्यानंतर कुठल्याही परिस्थितीत निधी खर्च करू नये, असे बंधन घातले आहे. सर्वच विभागाच्या खरेदीचा वांधाशासनाने सर्वच प्रशासकीय यंत्रणांना उपलब्ध करून दिलेल्या निधीतून खरेदी करण्यावर ३१ मार्च २0१७ पर्यंत निर्बंध लावले आहेत. त्यामध्ये सर्वच शासकीय कार्यालये, अनुदानित संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था (नागरी आणि ग्रामीण) या सर्व विभागांना आता निधी खर्चासाठी हात बांधले आहेत. नळजोडणी असलेल्या शाळांची निवडयोजनेत जिल्ह्यातील ज्या शाळांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा होतो, त्या शाळांमध्ये जलशुद्धीकरण यंत्र बसवण्याची प्रक्रिया सुरू झाली. जलशुद्धीकरण यंत्राचा पुरवठा करण्यासाठी प्राप्त निविदांमध्ये अटीनुसार एकही पुरवठादार पात्र नसल्याचे पुढे आले. त्यातही शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून गुणवत्ता तपासणीमध्ये पात्र ठरणार्‍याला पुरवठा आदेश देण्याची तरतूद आहे. मात्र, आता खरेदी प्रक्रिया शासनानेच रोखली आहे. दरमहा खर्च करण्याची अटअर्थसंकल्प वितरण प्रणाली सुरू आहे. त्यानुसार दरमहा उपलब्ध निधीचे नियोजन करून खर्च करणे शासनाला अपेक्षित आहे. मात्र, शेवटच्या तिमाहीतच खर्च केला जातो. त्यामुळे अनावश्यक खर्च होत असल्याचे शासनाचे म्हणणे आहे.