शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

शाळांसाठी ‘आरओ’ फिल्टर खरेदी बारगळली!

By admin | Updated: March 7, 2017 02:23 IST

निधी खर्चासाठी हात बांधले; प्रक्रियेला उशीर झाल्याने अडकली योजना.

सदानंद सिरसाट अकोला, दि. ६- जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्ह्यातील ६0 पेक्षाही अधिक शाळांमध्ये जलशुद्धीकरण यंत्रांची (आरओ फिल्टर) खरेदी योजना बारगळली आहे. खरेदी प्रक्रियेला झालेला उशीर आणि त्यातच शासनाने खरेदीवरच आणलेल्या बंधनात ही योजना अडकली आहे. योजनेचा ५0 लाखांचा निधी शासनाकडेच अखर्चित राहणार आहे. जिल्हा नियोजन समितीमध्ये ठरल्यानुसार शाळांमध्ये आरओ फिल्टरसाठी निधीची तरतूद करण्यात आली. त्यासाठी ५0 लाख रुपये निधीही मिळाला. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. त्यामध्ये उत्पादनाला आयएसआय मानांकन असलेल्या एकाही पुरवठादाराने निविदा सादर केलेली नाही. त्यामुळेही त्या आरओ (फिल्टर)च्या खरेदीवरून अधिकार्‍यांचा गोंधळ उडालेला आहे. त्यातच शासनाच्या १७ जानेवारी २0१७ रोजीच्या शासन निर्णयाने योजनेचा गळाच दाबला आहे. खरेदी रोखल्याने निधी राहणार अखर्चितशासनाच्या वित्त विभागाने राज्याने विविध योजनांसाठी जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन समिती, तसेच विविध विकास कामांसाठी दिलेला निधी खर्च करण्याची अंतिम प्रक्रिया १७ जानेवारीपूर्वी पूर्ण केलेली असावी. त्यानंतर कुठल्याही परिस्थितीत निधी खर्च करू नये, असे बंधन घातले आहे. सर्वच विभागाच्या खरेदीचा वांधाशासनाने सर्वच प्रशासकीय यंत्रणांना उपलब्ध करून दिलेल्या निधीतून खरेदी करण्यावर ३१ मार्च २0१७ पर्यंत निर्बंध लावले आहेत. त्यामध्ये सर्वच शासकीय कार्यालये, अनुदानित संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था (नागरी आणि ग्रामीण) या सर्व विभागांना आता निधी खर्चासाठी हात बांधले आहेत. नळजोडणी असलेल्या शाळांची निवडयोजनेत जिल्ह्यातील ज्या शाळांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा होतो, त्या शाळांमध्ये जलशुद्धीकरण यंत्र बसवण्याची प्रक्रिया सुरू झाली. जलशुद्धीकरण यंत्राचा पुरवठा करण्यासाठी प्राप्त निविदांमध्ये अटीनुसार एकही पुरवठादार पात्र नसल्याचे पुढे आले. त्यातही शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून गुणवत्ता तपासणीमध्ये पात्र ठरणार्‍याला पुरवठा आदेश देण्याची तरतूद आहे. मात्र, आता खरेदी प्रक्रिया शासनानेच रोखली आहे. दरमहा खर्च करण्याची अटअर्थसंकल्प वितरण प्रणाली सुरू आहे. त्यानुसार दरमहा उपलब्ध निधीचे नियोजन करून खर्च करणे शासनाला अपेक्षित आहे. मात्र, शेवटच्या तिमाहीतच खर्च केला जातो. त्यामुळे अनावश्यक खर्च होत असल्याचे शासनाचे म्हणणे आहे.