शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

शाळांसाठी ‘आरओ’ फिल्टर खरेदी बारगळली!

By admin | Updated: March 7, 2017 02:23 IST

निधी खर्चासाठी हात बांधले; प्रक्रियेला उशीर झाल्याने अडकली योजना.

सदानंद सिरसाट अकोला, दि. ६- जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्ह्यातील ६0 पेक्षाही अधिक शाळांमध्ये जलशुद्धीकरण यंत्रांची (आरओ फिल्टर) खरेदी योजना बारगळली आहे. खरेदी प्रक्रियेला झालेला उशीर आणि त्यातच शासनाने खरेदीवरच आणलेल्या बंधनात ही योजना अडकली आहे. योजनेचा ५0 लाखांचा निधी शासनाकडेच अखर्चित राहणार आहे. जिल्हा नियोजन समितीमध्ये ठरल्यानुसार शाळांमध्ये आरओ फिल्टरसाठी निधीची तरतूद करण्यात आली. त्यासाठी ५0 लाख रुपये निधीही मिळाला. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. त्यामध्ये उत्पादनाला आयएसआय मानांकन असलेल्या एकाही पुरवठादाराने निविदा सादर केलेली नाही. त्यामुळेही त्या आरओ (फिल्टर)च्या खरेदीवरून अधिकार्‍यांचा गोंधळ उडालेला आहे. त्यातच शासनाच्या १७ जानेवारी २0१७ रोजीच्या शासन निर्णयाने योजनेचा गळाच दाबला आहे. खरेदी रोखल्याने निधी राहणार अखर्चितशासनाच्या वित्त विभागाने राज्याने विविध योजनांसाठी जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन समिती, तसेच विविध विकास कामांसाठी दिलेला निधी खर्च करण्याची अंतिम प्रक्रिया १७ जानेवारीपूर्वी पूर्ण केलेली असावी. त्यानंतर कुठल्याही परिस्थितीत निधी खर्च करू नये, असे बंधन घातले आहे. सर्वच विभागाच्या खरेदीचा वांधाशासनाने सर्वच प्रशासकीय यंत्रणांना उपलब्ध करून दिलेल्या निधीतून खरेदी करण्यावर ३१ मार्च २0१७ पर्यंत निर्बंध लावले आहेत. त्यामध्ये सर्वच शासकीय कार्यालये, अनुदानित संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था (नागरी आणि ग्रामीण) या सर्व विभागांना आता निधी खर्चासाठी हात बांधले आहेत. नळजोडणी असलेल्या शाळांची निवडयोजनेत जिल्ह्यातील ज्या शाळांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा होतो, त्या शाळांमध्ये जलशुद्धीकरण यंत्र बसवण्याची प्रक्रिया सुरू झाली. जलशुद्धीकरण यंत्राचा पुरवठा करण्यासाठी प्राप्त निविदांमध्ये अटीनुसार एकही पुरवठादार पात्र नसल्याचे पुढे आले. त्यातही शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून गुणवत्ता तपासणीमध्ये पात्र ठरणार्‍याला पुरवठा आदेश देण्याची तरतूद आहे. मात्र, आता खरेदी प्रक्रिया शासनानेच रोखली आहे. दरमहा खर्च करण्याची अटअर्थसंकल्प वितरण प्रणाली सुरू आहे. त्यानुसार दरमहा उपलब्ध निधीचे नियोजन करून खर्च करणे शासनाला अपेक्षित आहे. मात्र, शेवटच्या तिमाहीतच खर्च केला जातो. त्यामुळे अनावश्यक खर्च होत असल्याचे शासनाचे म्हणणे आहे.