शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदारांना कर्ज वाटपावर प्रश्नचिन्ह

By admin | Updated: June 18, 2017 02:22 IST

खरीप पेरण्या सुरू ; बँकांपर्यंत आदेश पोहोचलाच नाही.

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : थकबाकीदार शेतकर्‍यांना तातडीने दहा हजार रुपयांपर्यंत कर्ज वाटप करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला आहे; मात्र यासंबंधीचे आदेश अद्याप बँकांमार्फत पोहोचले नसल्याने, कर्ज वाटप सुरू करण्यात आले नाही. खरीप पेरण्या सुरू झाल्या; मात्र कर्ज वाटप सुरू करण्यात आले नसल्याने, जिल्हय़ातील थकबाकीदार शेतकर्‍यांना बियाणे आणि खते खरेदीसाठी दहा हजार रुपयांचे कर्ज केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.राज्यातील अल्पभूधारक शेतकर्‍यांना तातडीने कर्जमाफी देण्यासह अटींच्या आधारे पाच एकरापेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी देण्यास शासनामार्फत तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान, थकबाकीदार शेतकर्‍यांना खरीप पिकासाठी निविष्ठा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने १0 हजार रुपयांच्या र्मयादेपर्यंत तातडीने कर्ज देण्याचे आदेश शासनामार्फत देण्यात आले. त्यानुसार, ३0 जून २0१६ अखेर जिल्हय़ातील थकबाकीदार शेतकर्‍यांना बियाणे व खते खरेदीचा खर्च भागविण्यासाठी दहा हजार रुपयांपर्यंत ता तडीने कर्ज मिळणे अपेक्षित आहे; परंतु थकबाकीदार शेतकर्‍यांना कर्ज वाटप करण्याचा आदेश जिल्हय़ातील बँकांपर्यंत १७ जूनपर्यंत पोहोचले नाही. त्यामुळे थकबाकीदार शे तकर्‍यांना कर्ज वाटप करण्याची प्रक्रिया बँकांमार्फत अद्याप सुरू करण्यात आली नाही. जिल्हय़ात खरीप पेरण्या सुरू झाल्या; मात्र दहा हजार रुपयांपर्यंत कर्ज वाटप सुरू झाले नसल्याने, बियाणे व खते खरेदीचा खर्च भागविण्यासाठी थकबाकीदार शेतकर्‍यांना कर्ज केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.पीक कर्जाचे वाटपही रेंगाळले; केवळ २८२ कोटी कर्जाचे वाटप!यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्हय़ात ११४0 कोटी ५५ लाख रुपये पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. गत १ एप्रिलपासून जिल्हय़ात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके सह राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत पीक कर्जाचे वाटप सुरू करण्यात आले. उद्दिष्टाच्या तुलनेत १७ जूनपर्यंत जिल्हय़ात ३६ हजार ४७५ शेतकर्‍यांना केवळ २८२ कोटी ८९ लाख ७५ हजार रुपयांचे पीक कर्जाचे वाटप करण्यात आले. त्यामुळे जिल्हय़ात पीक कर्जाचे वाटपही रेंगाळले आहे.पेरणीपूर्वी लाभ मिळणार?आदेशाअभावी जिल्हय़ातील बँकांमार्फत थकबाकीदार शेतकर्‍यांना दहा हजार रुपयांपर्यंत कर्ज वाटपाची प्रक्रिया अद्याप सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे थकबाकीदार शेतकर्‍यांना खरीप पेरणीसाठी निविष्ठा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने दहा हजार रुपयांपर्यंत कर्ज तातडीने उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात जिल्हय़ातील थकबाकीदार शेतकर्‍यांना या कर्ज वाटपाचा लाभ खरीप पेरणी सुरू होण्यापूर्वी मिळणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.थकबाकीदार शेतकर्‍यांना तातडीने दहा हजार रुपयांपर्यंंत कर्ज वाटप करण्याबाबत शासनाचे आदेश जिल्हय़ातील बँकांच्या शाखांपर्यंत अद्याप पोहोचले नाही, त्यामुळे कर्ज वाटप करण्याचे काम अद्याप सुरू करण्यात आले नाही. आदेश पाहोचल्यानंतर बँकांमार्फत थकबाकीदार शेतकर्‍यांना दहा हजार रुपयांपर्यंंत कर्ज वाटपाचे काम मंगळवारपासून सुरू करण्यात येणार आहे.-तुकाराम गायकवाड,व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक.