शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

थकबाकीदारांना कर्ज वाटपावर प्रश्नचिन्ह

By admin | Updated: June 18, 2017 02:22 IST

खरीप पेरण्या सुरू ; बँकांपर्यंत आदेश पोहोचलाच नाही.

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : थकबाकीदार शेतकर्‍यांना तातडीने दहा हजार रुपयांपर्यंत कर्ज वाटप करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला आहे; मात्र यासंबंधीचे आदेश अद्याप बँकांमार्फत पोहोचले नसल्याने, कर्ज वाटप सुरू करण्यात आले नाही. खरीप पेरण्या सुरू झाल्या; मात्र कर्ज वाटप सुरू करण्यात आले नसल्याने, जिल्हय़ातील थकबाकीदार शेतकर्‍यांना बियाणे आणि खते खरेदीसाठी दहा हजार रुपयांचे कर्ज केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.राज्यातील अल्पभूधारक शेतकर्‍यांना तातडीने कर्जमाफी देण्यासह अटींच्या आधारे पाच एकरापेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी देण्यास शासनामार्फत तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान, थकबाकीदार शेतकर्‍यांना खरीप पिकासाठी निविष्ठा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने १0 हजार रुपयांच्या र्मयादेपर्यंत तातडीने कर्ज देण्याचे आदेश शासनामार्फत देण्यात आले. त्यानुसार, ३0 जून २0१६ अखेर जिल्हय़ातील थकबाकीदार शेतकर्‍यांना बियाणे व खते खरेदीचा खर्च भागविण्यासाठी दहा हजार रुपयांपर्यंत ता तडीने कर्ज मिळणे अपेक्षित आहे; परंतु थकबाकीदार शेतकर्‍यांना कर्ज वाटप करण्याचा आदेश जिल्हय़ातील बँकांपर्यंत १७ जूनपर्यंत पोहोचले नाही. त्यामुळे थकबाकीदार शे तकर्‍यांना कर्ज वाटप करण्याची प्रक्रिया बँकांमार्फत अद्याप सुरू करण्यात आली नाही. जिल्हय़ात खरीप पेरण्या सुरू झाल्या; मात्र दहा हजार रुपयांपर्यंत कर्ज वाटप सुरू झाले नसल्याने, बियाणे व खते खरेदीचा खर्च भागविण्यासाठी थकबाकीदार शेतकर्‍यांना कर्ज केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.पीक कर्जाचे वाटपही रेंगाळले; केवळ २८२ कोटी कर्जाचे वाटप!यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्हय़ात ११४0 कोटी ५५ लाख रुपये पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. गत १ एप्रिलपासून जिल्हय़ात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके सह राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत पीक कर्जाचे वाटप सुरू करण्यात आले. उद्दिष्टाच्या तुलनेत १७ जूनपर्यंत जिल्हय़ात ३६ हजार ४७५ शेतकर्‍यांना केवळ २८२ कोटी ८९ लाख ७५ हजार रुपयांचे पीक कर्जाचे वाटप करण्यात आले. त्यामुळे जिल्हय़ात पीक कर्जाचे वाटपही रेंगाळले आहे.पेरणीपूर्वी लाभ मिळणार?आदेशाअभावी जिल्हय़ातील बँकांमार्फत थकबाकीदार शेतकर्‍यांना दहा हजार रुपयांपर्यंत कर्ज वाटपाची प्रक्रिया अद्याप सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे थकबाकीदार शेतकर्‍यांना खरीप पेरणीसाठी निविष्ठा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने दहा हजार रुपयांपर्यंत कर्ज तातडीने उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात जिल्हय़ातील थकबाकीदार शेतकर्‍यांना या कर्ज वाटपाचा लाभ खरीप पेरणी सुरू होण्यापूर्वी मिळणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.थकबाकीदार शेतकर्‍यांना तातडीने दहा हजार रुपयांपर्यंंत कर्ज वाटप करण्याबाबत शासनाचे आदेश जिल्हय़ातील बँकांच्या शाखांपर्यंत अद्याप पोहोचले नाही, त्यामुळे कर्ज वाटप करण्याचे काम अद्याप सुरू करण्यात आले नाही. आदेश पाहोचल्यानंतर बँकांमार्फत थकबाकीदार शेतकर्‍यांना दहा हजार रुपयांपर्यंंत कर्ज वाटपाचे काम मंगळवारपासून सुरू करण्यात येणार आहे.-तुकाराम गायकवाड,व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक.