शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

४५ काेटींचा प्रकल्प; करारनाम्याची प्रत मनपातून गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:22 IST

केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत महापालिकेला प्राप्त झालेल्या ४५ काेटी रुपयांच्या घनकचरा प्रकल्पाला नख लावण्याचे काम सुरू झाले ...

केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत महापालिकेला प्राप्त झालेल्या ४५ काेटी रुपयांच्या घनकचरा प्रकल्पाला नख लावण्याचे काम सुरू झाले आहे. सप्टेंबर २०२० मध्ये मे.परभणी अॅग्राेटेक प्रा.लि.कंपनीसाेबत करण्यात आलेल्या करारनाम्याची प्रत बांधकाम विभागातून गायब झाल्याची धक्कादायक माहिती समाेर आली आहे. शासनाच्या इतर अधिकाऱ्यांकडेही करारनाम्याची प्रत उपलब्ध नसल्यामुळे हा प्रकल्प व त्यावर नियुक्त केलेले अधिकारी, उपअभियंता तसेच कनिष्ठ अभियंता संशयाच्या घेऱ्यात सापडले आहेत.

शहरात निर्माण हाेणाऱ्या घनकचऱ्याची समस्या निकाली काढण्याच्या उद्देशातून केंद्र व राज्य शासनाने महापालिकेसाठी ४५ काेटींचा निधी दिला. हा प्रकल्प उभारण्यासाठी भाेड गावालगतच्या १९ एकर शासकीय जमिनीची निवड करण्यात आली. तत्पूर्वी प्रकल्प अहवाल(डीपीआर)तयार करण्यासाठी शासनाने ‘मार्स’नामक एजन्सीची नियुक्ती केली. एजन्सीने तयार केलेल्या ‘डीपीआर’ला नीरीने मान्यता दिली. दरम्यान, मनपाने मे.परभणी अॅग्राेटेक प्रा.लि.कंपनीची निविदा मंजूर करीत कंपनीसाेबत करारनामा केला. कंपनीला वर्कऑर्डर दिल्यानंतर भाेड येथील जमिनीतून गाैण खनिजाचे उत्खनन झाल्याचा प्रशासनाला साक्षात्कार झाला. नेहमीप्रमाणे ‘कट प्रॅक्टीस’ करणाऱ्या काही राजकारण्यांसह एका स्थानिक अधिकाऱ्याने ही खदान बुजविण्यासाठी सात ते आठ काेटींच्या खर्चाची तरतूद करण्याचा घाट रचला. हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत विराेधी पक्ष काॅंग्रेस व शिवसेनेने उधळून लावला हाेता. यादरम्यान,मागील आठ महिन्यांपासून नायगावस्थित डम्पिंग ग्राऊंडवर ‘बायाेमायनिंग’द्वारे कचऱ्यावर प्रक्रिया केली जात असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. परंतु या प्रकल्पाचे कामकाज नेमके कसे पार पडणार याबद्दल सर्व बाबींचा अंतर्भाव असलेला करारनामा मनपातून गायब झाल्यामुळे मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

जबाबदारी अजय गुजर यांच्याकडे!

हद्दवाढ क्षेत्रात ९६ काेटी २० लक्ष रुपयांतून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण कामे व्हावीत, या उद्देशातून भाजपच्या लाेकप्रतिनिधींनी मनपात अतिशय प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी अशी ओळख असलेल्या अजय गुजर यांच्याकडे जबाबदारी साेपवली. हाच विश्वास कायम ठेवत पुढे आराेग्य विभागाऐवजी गुजर यांच्याकडेच घनकचरा प्रकल्पाचीही जबाबदारी देण्यात आली. करारनामा गायब झाल्याप्रकरणी त्यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता ताे हाेऊ शकला नाही.

करारनाम्याची प्रत उपलब्ध का नाही?

मनपातील आराेग्य व स्वच्छता विभागासह शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही करारनाम्याची प्रत उपलब्ध नसल्याची माहिती आहे. हा करारनामा गायब करणे, दडवून ठेवण्यामागे नेमका काेणता कर्मचारी सक्रिय आहे, याबद्दल असंख्य प्रश्न उपस्थित झाले आहेत.