शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
2
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
3
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
4
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
5
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
6
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
7
Rambabu Singh : अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
8
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
9
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
10
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
11
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
12
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?
13
"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार
14
Operation Sindoor : काहींचे हात तुटले, तर काहींना गंभीर दुखापत झाली, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिकांची अवस्था दाखवली
15
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या
16
लग्नात नायट्रोजनचा धूर ठरला घातक; नवरा-नवरीच्या एन्ट्रीदरम्यान ७ वर्षांच्या मुलीचा गेला जीव
17
भारतीय सैन्याच्या रिटायर्ड कॅप्टनची घरात घुसून हत्या; सरपंचाने मध्यरात्री केला हल्ला
18
High Alert: दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
19
आधी वरमाला घातली अन्..; अभिनेत्याचा बायकोसोबत खास डान्स, रत्नागिरीत गावकऱ्यांच्या साथीने धरला ठेका
20
IPL च्या सामन्यांतून BCCI ची कमाई किती होते, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुठून येतो पैसा?

४५ काेटींचा प्रकल्प; करारनाम्याची प्रत मनपातून गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:22 IST

केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत महापालिकेला प्राप्त झालेल्या ४५ काेटी रुपयांच्या घनकचरा प्रकल्पाला नख लावण्याचे काम सुरू झाले ...

केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत महापालिकेला प्राप्त झालेल्या ४५ काेटी रुपयांच्या घनकचरा प्रकल्पाला नख लावण्याचे काम सुरू झाले आहे. सप्टेंबर २०२० मध्ये मे.परभणी अॅग्राेटेक प्रा.लि.कंपनीसाेबत करण्यात आलेल्या करारनाम्याची प्रत बांधकाम विभागातून गायब झाल्याची धक्कादायक माहिती समाेर आली आहे. शासनाच्या इतर अधिकाऱ्यांकडेही करारनाम्याची प्रत उपलब्ध नसल्यामुळे हा प्रकल्प व त्यावर नियुक्त केलेले अधिकारी, उपअभियंता तसेच कनिष्ठ अभियंता संशयाच्या घेऱ्यात सापडले आहेत.

शहरात निर्माण हाेणाऱ्या घनकचऱ्याची समस्या निकाली काढण्याच्या उद्देशातून केंद्र व राज्य शासनाने महापालिकेसाठी ४५ काेटींचा निधी दिला. हा प्रकल्प उभारण्यासाठी भाेड गावालगतच्या १९ एकर शासकीय जमिनीची निवड करण्यात आली. तत्पूर्वी प्रकल्प अहवाल(डीपीआर)तयार करण्यासाठी शासनाने ‘मार्स’नामक एजन्सीची नियुक्ती केली. एजन्सीने तयार केलेल्या ‘डीपीआर’ला नीरीने मान्यता दिली. दरम्यान, मनपाने मे.परभणी अॅग्राेटेक प्रा.लि.कंपनीची निविदा मंजूर करीत कंपनीसाेबत करारनामा केला. कंपनीला वर्कऑर्डर दिल्यानंतर भाेड येथील जमिनीतून गाैण खनिजाचे उत्खनन झाल्याचा प्रशासनाला साक्षात्कार झाला. नेहमीप्रमाणे ‘कट प्रॅक्टीस’ करणाऱ्या काही राजकारण्यांसह एका स्थानिक अधिकाऱ्याने ही खदान बुजविण्यासाठी सात ते आठ काेटींच्या खर्चाची तरतूद करण्याचा घाट रचला. हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत विराेधी पक्ष काॅंग्रेस व शिवसेनेने उधळून लावला हाेता. यादरम्यान,मागील आठ महिन्यांपासून नायगावस्थित डम्पिंग ग्राऊंडवर ‘बायाेमायनिंग’द्वारे कचऱ्यावर प्रक्रिया केली जात असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. परंतु या प्रकल्पाचे कामकाज नेमके कसे पार पडणार याबद्दल सर्व बाबींचा अंतर्भाव असलेला करारनामा मनपातून गायब झाल्यामुळे मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

जबाबदारी अजय गुजर यांच्याकडे!

हद्दवाढ क्षेत्रात ९६ काेटी २० लक्ष रुपयांतून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण कामे व्हावीत, या उद्देशातून भाजपच्या लाेकप्रतिनिधींनी मनपात अतिशय प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी अशी ओळख असलेल्या अजय गुजर यांच्याकडे जबाबदारी साेपवली. हाच विश्वास कायम ठेवत पुढे आराेग्य विभागाऐवजी गुजर यांच्याकडेच घनकचरा प्रकल्पाचीही जबाबदारी देण्यात आली. करारनामा गायब झाल्याप्रकरणी त्यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता ताे हाेऊ शकला नाही.

करारनाम्याची प्रत उपलब्ध का नाही?

मनपातील आराेग्य व स्वच्छता विभागासह शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही करारनाम्याची प्रत उपलब्ध नसल्याची माहिती आहे. हा करारनामा गायब करणे, दडवून ठेवण्यामागे नेमका काेणता कर्मचारी सक्रिय आहे, याबद्दल असंख्य प्रश्न उपस्थित झाले आहेत.