शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

धान्य घोटाळ््याचा चौकशी अहवाल तयार

By admin | Updated: March 19, 2017 19:47 IST

बडनेरा गोदामातून हजारो क्विंटल धान्य गायब झाल्याचा चौकशी अहवाल भारतीय खाद्य निगमच्या मुंबई कार्यालयात सादर करण्यात आला आहे.

अमरावतीत १७ कोटीनंतर आता तीन कोटींचा घोटाळा अकोला: बडनेरा गोदामातून हजारो क्विंटल धान्य गायब झाल्याचा चौकशी अहवाल भारतीय खाद्य निगमच्या मुंबई कार्यालयात सादर करण्यात आला आहे. अपहारित धान्याची रक्कम वसुलीची कारवाई येत्या आठवड्यात होणार आहे. तीन वर्षापूर्वी अकोला, अमरावती जिल्ह्यातील गोदामातून २१ कोटींचे धान्य गायब झाल्यानंतर आता तीन कोटींपेक्षाही अधिक रकमेच्या धान्याचा अपहार झाल्याची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यात भारतीय खाद्य निगमच्या वतीने धान्य वाटप करण्यासाठी केंद्रीय वखार महामंडळाने बडनेरालगत दाभा येथे रेणुका वेअर हाउसचे गोदाम भाड्याने घेतले. त्या गोदामातून गेल्या काही महिन्यांत गहू आणि तांदळाच्या हजारो बॅगा गायब झाल्याचे वृत्त ह्यलोकमतह्णने लावून धरले. त्यानंतर गोदामातील गहू आणि तांदूळ मिळून तब्बल २३ हजार बॅगा गायब झाल्याचे पुढे आले. त्याची बाजारातील किंमत तीन कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे. ही चौकशी करण्यासाठी महिनाभर टाळाटाळ करण्यात आली. २ फेब्रुवारी रोजी खाद्य निगमच्या अधिकाऱ्यांनी बडनेरा गोदामात चौकशी केली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी ही नेहमीची भेट असल्याचे सांगत वेळ मारून नेली होती. त्यानंतर भारतीय खाद्य निगमच्या वर्धा येथील व्यवस्थापक नायक, यवतमाळ येथील सहायक खान यांना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. त्यांच्या पथकाने चौकशी करून तसा अहवाल नागपूर येथील विभागीय कार्यालयात सादर केला. त्या कार्यालयाने भारतीय खाद्य निगमच्या मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयातही पाठवला; मात्र त्यावर पुढील कार्यवाही करणारे सहायक उपमहाप्रबंधक दिल्ली येथे प्रशिक्षणासाठी असल्याने प्रस्ताव तयार झालेला नाही. बुधवारनंतर तो तयार होण्याची शक्यता आहे. प्रादेशिक व्यवस्थापकांच्या आदेशाने केंद्रीय वखार महामंडळाकडून अपहारित धान्याची रक्कम वसूल होण्याची शक्यता आहे. त्यानुसार रेणुका वेअर हाउसच्या व्यवस्थापनाकडून ती वसूल होणार आहे, असे भारतीय खाद्य निगमचे मुंबई येथील उपमहाव्यवस्थापक एस.जी. टेंभुर्णे यांनी सांगितले. - २१ कोटींचा धान्याचा अपहार विशेष म्हणजे, तीन वर्षांपूर्वी अकोला, अमरावती येथे भारतीय खाद्य निगमने धान्य साठा करण्याचे काम दिलेल्या केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामातून तब्बल २१ कोटी रुपयांच्या धान्याचा अपहार झाल्याचे पुढे आले होते. त्यापैकी ३ कोटी २७ लाख रुपयांचा अपहार अकोल्यातील होता. ती संपूर्ण रक्कम खाद्य महामंडळाने वसूल केली. त्यासोबतच सर्व संबंधितांवर फौजदारीही करण्यात आली. अकोल्यातील प्रकरण तर सीबीआयकडे आहे. आता बडनेरा प्रकरणात फौजदारी होण्याची शक्यता आहे.