शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

धान्य घोटाळ््याचा चौकशी अहवाल तयार

By admin | Updated: March 19, 2017 19:47 IST

बडनेरा गोदामातून हजारो क्विंटल धान्य गायब झाल्याचा चौकशी अहवाल भारतीय खाद्य निगमच्या मुंबई कार्यालयात सादर करण्यात आला आहे.

अमरावतीत १७ कोटीनंतर आता तीन कोटींचा घोटाळा अकोला: बडनेरा गोदामातून हजारो क्विंटल धान्य गायब झाल्याचा चौकशी अहवाल भारतीय खाद्य निगमच्या मुंबई कार्यालयात सादर करण्यात आला आहे. अपहारित धान्याची रक्कम वसुलीची कारवाई येत्या आठवड्यात होणार आहे. तीन वर्षापूर्वी अकोला, अमरावती जिल्ह्यातील गोदामातून २१ कोटींचे धान्य गायब झाल्यानंतर आता तीन कोटींपेक्षाही अधिक रकमेच्या धान्याचा अपहार झाल्याची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यात भारतीय खाद्य निगमच्या वतीने धान्य वाटप करण्यासाठी केंद्रीय वखार महामंडळाने बडनेरालगत दाभा येथे रेणुका वेअर हाउसचे गोदाम भाड्याने घेतले. त्या गोदामातून गेल्या काही महिन्यांत गहू आणि तांदळाच्या हजारो बॅगा गायब झाल्याचे वृत्त ह्यलोकमतह्णने लावून धरले. त्यानंतर गोदामातील गहू आणि तांदूळ मिळून तब्बल २३ हजार बॅगा गायब झाल्याचे पुढे आले. त्याची बाजारातील किंमत तीन कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे. ही चौकशी करण्यासाठी महिनाभर टाळाटाळ करण्यात आली. २ फेब्रुवारी रोजी खाद्य निगमच्या अधिकाऱ्यांनी बडनेरा गोदामात चौकशी केली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी ही नेहमीची भेट असल्याचे सांगत वेळ मारून नेली होती. त्यानंतर भारतीय खाद्य निगमच्या वर्धा येथील व्यवस्थापक नायक, यवतमाळ येथील सहायक खान यांना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. त्यांच्या पथकाने चौकशी करून तसा अहवाल नागपूर येथील विभागीय कार्यालयात सादर केला. त्या कार्यालयाने भारतीय खाद्य निगमच्या मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयातही पाठवला; मात्र त्यावर पुढील कार्यवाही करणारे सहायक उपमहाप्रबंधक दिल्ली येथे प्रशिक्षणासाठी असल्याने प्रस्ताव तयार झालेला नाही. बुधवारनंतर तो तयार होण्याची शक्यता आहे. प्रादेशिक व्यवस्थापकांच्या आदेशाने केंद्रीय वखार महामंडळाकडून अपहारित धान्याची रक्कम वसूल होण्याची शक्यता आहे. त्यानुसार रेणुका वेअर हाउसच्या व्यवस्थापनाकडून ती वसूल होणार आहे, असे भारतीय खाद्य निगमचे मुंबई येथील उपमहाव्यवस्थापक एस.जी. टेंभुर्णे यांनी सांगितले. - २१ कोटींचा धान्याचा अपहार विशेष म्हणजे, तीन वर्षांपूर्वी अकोला, अमरावती येथे भारतीय खाद्य निगमने धान्य साठा करण्याचे काम दिलेल्या केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामातून तब्बल २१ कोटी रुपयांच्या धान्याचा अपहार झाल्याचे पुढे आले होते. त्यापैकी ३ कोटी २७ लाख रुपयांचा अपहार अकोल्यातील होता. ती संपूर्ण रक्कम खाद्य महामंडळाने वसूल केली. त्यासोबतच सर्व संबंधितांवर फौजदारीही करण्यात आली. अकोल्यातील प्रकरण तर सीबीआयकडे आहे. आता बडनेरा प्रकरणात फौजदारी होण्याची शक्यता आहे.