शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

धान्य घोटाळ््याचा चौकशी अहवाल तयार

By admin | Updated: March 19, 2017 19:47 IST

बडनेरा गोदामातून हजारो क्विंटल धान्य गायब झाल्याचा चौकशी अहवाल भारतीय खाद्य निगमच्या मुंबई कार्यालयात सादर करण्यात आला आहे.

अमरावतीत १७ कोटीनंतर आता तीन कोटींचा घोटाळा अकोला: बडनेरा गोदामातून हजारो क्विंटल धान्य गायब झाल्याचा चौकशी अहवाल भारतीय खाद्य निगमच्या मुंबई कार्यालयात सादर करण्यात आला आहे. अपहारित धान्याची रक्कम वसुलीची कारवाई येत्या आठवड्यात होणार आहे. तीन वर्षापूर्वी अकोला, अमरावती जिल्ह्यातील गोदामातून २१ कोटींचे धान्य गायब झाल्यानंतर आता तीन कोटींपेक्षाही अधिक रकमेच्या धान्याचा अपहार झाल्याची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यात भारतीय खाद्य निगमच्या वतीने धान्य वाटप करण्यासाठी केंद्रीय वखार महामंडळाने बडनेरालगत दाभा येथे रेणुका वेअर हाउसचे गोदाम भाड्याने घेतले. त्या गोदामातून गेल्या काही महिन्यांत गहू आणि तांदळाच्या हजारो बॅगा गायब झाल्याचे वृत्त ह्यलोकमतह्णने लावून धरले. त्यानंतर गोदामातील गहू आणि तांदूळ मिळून तब्बल २३ हजार बॅगा गायब झाल्याचे पुढे आले. त्याची बाजारातील किंमत तीन कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे. ही चौकशी करण्यासाठी महिनाभर टाळाटाळ करण्यात आली. २ फेब्रुवारी रोजी खाद्य निगमच्या अधिकाऱ्यांनी बडनेरा गोदामात चौकशी केली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी ही नेहमीची भेट असल्याचे सांगत वेळ मारून नेली होती. त्यानंतर भारतीय खाद्य निगमच्या वर्धा येथील व्यवस्थापक नायक, यवतमाळ येथील सहायक खान यांना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. त्यांच्या पथकाने चौकशी करून तसा अहवाल नागपूर येथील विभागीय कार्यालयात सादर केला. त्या कार्यालयाने भारतीय खाद्य निगमच्या मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयातही पाठवला; मात्र त्यावर पुढील कार्यवाही करणारे सहायक उपमहाप्रबंधक दिल्ली येथे प्रशिक्षणासाठी असल्याने प्रस्ताव तयार झालेला नाही. बुधवारनंतर तो तयार होण्याची शक्यता आहे. प्रादेशिक व्यवस्थापकांच्या आदेशाने केंद्रीय वखार महामंडळाकडून अपहारित धान्याची रक्कम वसूल होण्याची शक्यता आहे. त्यानुसार रेणुका वेअर हाउसच्या व्यवस्थापनाकडून ती वसूल होणार आहे, असे भारतीय खाद्य निगमचे मुंबई येथील उपमहाव्यवस्थापक एस.जी. टेंभुर्णे यांनी सांगितले. - २१ कोटींचा धान्याचा अपहार विशेष म्हणजे, तीन वर्षांपूर्वी अकोला, अमरावती येथे भारतीय खाद्य निगमने धान्य साठा करण्याचे काम दिलेल्या केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामातून तब्बल २१ कोटी रुपयांच्या धान्याचा अपहार झाल्याचे पुढे आले होते. त्यापैकी ३ कोटी २७ लाख रुपयांचा अपहार अकोल्यातील होता. ती संपूर्ण रक्कम खाद्य महामंडळाने वसूल केली. त्यासोबतच सर्व संबंधितांवर फौजदारीही करण्यात आली. अकोल्यातील प्रकरण तर सीबीआयकडे आहे. आता बडनेरा प्रकरणात फौजदारी होण्याची शक्यता आहे.