शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शंभरच्या वर कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:18 IST

प्रशांत विखे लोकमत न्यूज नेटवर्क तेल्हारा : थकीत वीजबिलांची वसुली करण्यासाठी महावितरणकडून धडक मोहीम सुरू करण्यात आली होती. या ...

प्रशांत विखे

लोकमत न्यूज नेटवर्क

तेल्हारा : थकीत वीजबिलांची वसुली करण्यासाठी महावितरणकडून धडक मोहीम सुरू करण्यात आली होती. या मोहिमेंतर्गत बिलाचा भरणा न करणाऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला जात होता. या कारवाईला विरोध झाल्यानंतर स्थगिती देण्यात आली होती; मात्र ही स्थगिती उठविल्यानंतर महावितरणकडून पुन्हा धडक मोहीम सुरू करण्यात आली असून, कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने विजेअभावी पाणी देता येत नसल्याने तालुक्यातील जवळपास शेकडो एकरावरील पिके धोक्यात सापडली आहेत.

विधानसभेत २ मार्च रोजी झालेल्या चर्चेदरम्यान महावितरणच्या थकबाकीदार ग्राहकांचा विद्युत पुरवठा तोडण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थगिती दिली होती; मात्र १० मार्च रोजी अधिवेशनाच्या समारोपीय सत्रात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्थगिती उठवून वीजबिलांची वसुली करण्याचे निर्देश दिले. यासंबंधीचा आदेश जिल्हास्तरावर धडकला असून, तालुक्यात महावितरकडून थकबाकीदार ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याची कारवाई जोरात सुरू आहे.

गतवर्षी चांगला पाऊस बरसल्याने यंदा रब्बी व उन्हाळी पिकांच्या पेरणीत मोठी वाढ झाली आहे. सध्या पिके शेतात बहरली असून, पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. तालुक्यातील कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने विजेअभावी पाणी देणे शक्य नसल्याने जवळपास ५०० च्या वर एकरावरील पिके संकटात सापडली आहेत.

-----------------------------------------

शेतकऱ्यांमध्ये रोष

थकीत वीजबिलांची वसुली महावितरणकडून सुरू करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये बिलाचा भरणा न करणाऱ्याचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. शासनाने सुरुवातीला स्थगिती दिली, त्यानंतर काही दिवसांतच स्थगिती उठवल्याने महावितरणकडून कार्यवाहीचा सपाटा सुरू आहे. स्थगिती म्हणजे केवळ अधिवेशनापुरते चॉकलेटच होते, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे. पिकांना पाण्याची गरज असतानाच वीज कनेक्शन कट केले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे.

----------------------

थकीत वीजबिल भरणा करण्याकरिता शासनाची योजना शेतकऱ्यांना समजावून सांगणे सुरू आहे. केवळ सप्टेंबर व डिसेंबर २०२० या महिन्यातील वीजबिलांचा भरणा करण्याचे शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे. आतापर्यंत १०० ते १२५ वीज कनेक्शन कट करण्यात आले आहेत.

- सचिन कोहळ, उपकार्यकारी अभियंता, तेल्हारा, महावितरण