शहरं
Join us  
Trending Stories
1
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
2
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
3
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
4
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
5
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
6
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
7
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
8
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
9
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?
10
"चीन अमेरिकेला मागे टाकणार, तिसरं महायुद्ध, अन्...!"; 2026 साठी बाबा वेंगाची भविष्यवाणी, भारतासह जागात काय-काय घडणार?
11
बाजारात गेलेल्या सुनेचा २ वर्षांनी विहिरीत सापडला सांगाडा; राँग नंबरवरुन सुरू झालेली लव्हस्टोरी
12
जगात पहिल्यांदा 'ड्रोन वॉल' बनणार; रशियाला घाबरुन २७ देशांनी निर्णय घेतला, जाणून घ्या कसे करणार काम
13
'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी
14
Pune Viral Video: केस पकडले, कमरेत लाथा मारल्या; पुण्यात भररस्त्यात तरुणीला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीनिमित्त सरकाने प्रसिद्ध केलं विशेष नाणं आणि टपाल तिकीट, मोदी म्हणाले...
17
Viral Video: मुंबई लोकलमध्ये नवरात्रीचा जल्लोष! 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर महिलांचा जबरदस्त डान्स
18
'मैत्रीमुळे विचारधारा सोडली, असे होत नाही.. ' संघाच्या निमंत्रण पत्रिकेवर न्यायाधीशांच्या आईचे नाव असल्याने वाद !
19
भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद
20
Asia Cup 2025 : ट्रॉफी द्या, अन्यथा..; BCCI ने मोहसिन नकवींना दिला ७२ तासांचा अल्टिमेटम

शंभरच्या वर कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:18 IST

प्रशांत विखे लोकमत न्यूज नेटवर्क तेल्हारा : थकीत वीजबिलांची वसुली करण्यासाठी महावितरणकडून धडक मोहीम सुरू करण्यात आली होती. या ...

प्रशांत विखे

लोकमत न्यूज नेटवर्क

तेल्हारा : थकीत वीजबिलांची वसुली करण्यासाठी महावितरणकडून धडक मोहीम सुरू करण्यात आली होती. या मोहिमेंतर्गत बिलाचा भरणा न करणाऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला जात होता. या कारवाईला विरोध झाल्यानंतर स्थगिती देण्यात आली होती; मात्र ही स्थगिती उठविल्यानंतर महावितरणकडून पुन्हा धडक मोहीम सुरू करण्यात आली असून, कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने विजेअभावी पाणी देता येत नसल्याने तालुक्यातील जवळपास शेकडो एकरावरील पिके धोक्यात सापडली आहेत.

विधानसभेत २ मार्च रोजी झालेल्या चर्चेदरम्यान महावितरणच्या थकबाकीदार ग्राहकांचा विद्युत पुरवठा तोडण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थगिती दिली होती; मात्र १० मार्च रोजी अधिवेशनाच्या समारोपीय सत्रात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्थगिती उठवून वीजबिलांची वसुली करण्याचे निर्देश दिले. यासंबंधीचा आदेश जिल्हास्तरावर धडकला असून, तालुक्यात महावितरकडून थकबाकीदार ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याची कारवाई जोरात सुरू आहे.

गतवर्षी चांगला पाऊस बरसल्याने यंदा रब्बी व उन्हाळी पिकांच्या पेरणीत मोठी वाढ झाली आहे. सध्या पिके शेतात बहरली असून, पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. तालुक्यातील कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने विजेअभावी पाणी देणे शक्य नसल्याने जवळपास ५०० च्या वर एकरावरील पिके संकटात सापडली आहेत.

-----------------------------------------

शेतकऱ्यांमध्ये रोष

थकीत वीजबिलांची वसुली महावितरणकडून सुरू करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये बिलाचा भरणा न करणाऱ्याचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. शासनाने सुरुवातीला स्थगिती दिली, त्यानंतर काही दिवसांतच स्थगिती उठवल्याने महावितरणकडून कार्यवाहीचा सपाटा सुरू आहे. स्थगिती म्हणजे केवळ अधिवेशनापुरते चॉकलेटच होते, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे. पिकांना पाण्याची गरज असतानाच वीज कनेक्शन कट केले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे.

----------------------

थकीत वीजबिल भरणा करण्याकरिता शासनाची योजना शेतकऱ्यांना समजावून सांगणे सुरू आहे. केवळ सप्टेंबर व डिसेंबर २०२० या महिन्यातील वीजबिलांचा भरणा करण्याचे शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे. आतापर्यंत १०० ते १२५ वीज कनेक्शन कट करण्यात आले आहेत.

- सचिन कोहळ, उपकार्यकारी अभियंता, तेल्हारा, महावितरण