शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
4
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
5
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
6
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
7
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
8
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
9
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
10
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
11
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
12
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
13
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
14
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
15
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
16
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
17
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
18
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
19
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
20
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट

लाॅकडाऊन काळातही राजकारण अनलाॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:19 IST

अकाेला राजकारण हे प्रवाही अन् सर्वस्पर्शी असते, असे म्हणतात. त्याचे प्रत्यंतर २०२० मध्ये आले. काेराेनाच्या भीतीने संपूर्ण देश ठप्प ...

अकाेला

राजकारण हे प्रवाही अन् सर्वस्पर्शी असते, असे म्हणतात. त्याचे प्रत्यंतर २०२० मध्ये आले. काेराेनाच्या भीतीने संपूर्ण देश ठप्प झाला असतानाही राजकारण मात्र सुरूच हाेते. लाॅकडाऊनच्या उपयुक्ततेची, नियमांची अन् अंमलबजावणीच्या व्यवस्थेचेही राजकारणच झाले; त्याहीपेक्षा राजकारण रंगले ते अनलाॅकच्या प्रक्रियेचे. ते गुऱ्हाळ सरत्या वर्षाच्या अखेरपर्यंत सुरूच असून, नव्या वर्षातही कायमच राहील. अकाेल्याचे राजकीय क्षेत्रही याला अपवाद नव्हते. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी या प्रमुख पक्षांसह लहान-माेठ्या सर्वच पक्षांनी आपले अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न या लाॅकडाऊनमध्ये कायम ठेवला. सरत्या वर्षाचे मूल्यमापन करताना हे वर्ष शिवसेनेसाठी लाभदायी आणि विराेधकांची माेठी स्पेस भरून काढण्याचे श्रेय वंचितच्या खात्यात, असे स्पष्ट चित्र उभे राहते. केंद्रातील अन् महापालिकेतील सत्तेमुळे भाजपची बाेटं अडकली हाेती. दुसरीकडे राष्ट्रवादीला नवा आमदार मिळाला; पण, काँग्रेसलामात्र अजूनही आपण कुठे आहाेत हेच सापडले नसल्याचे वास्तवही सरत्या वर्षात कायम आहे.

भाजप

विराेधाची जबबादारी, पण...

२०१९ मधील सत्तांतरामुळे भाजपकडे विराेधकांची जबाबदारी आली; पण केंद्रातील मंत्रिपद आणी महापालिकेतील सत्ता यामुळे भाजपला विराेधकांची भूमिका आस्तेकदमच निभवावी लागली. जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आ. रणधीर सावरकर व महानगर अध्यक्षपदी विजय अग्रवाल यांच्याकडे साेपवून भाजपने सत्तेचे केंद्रीकरण केले; मात्र महापालिकेत सत्ता सांभाळताना शिवसेना व काँग्रेसने माेठे आव्हान उभे करून ठेवले आहे. आ. सावरकर यांचे न झालेले उपाेषण गाजले व शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मिळवून देत फलद्रुपही झाले. तर पक्षाकडून आलेल्या आंदाेलनांची औपचारिकता वर्षभरात पार पाडली गेली. भाजपच्या इतर आमदारांची कामगिरी मागील पानावरून पुढे एवढीच सरकली.

वंचित

कक्षा रुंदावल्या

वंचित बहुजन आघाडीने आपल्या चाैकटीतून बाहेर येत सरत्या वर्षात नेतृत्वाच्या कक्षा रुंदावल्या. पंढरपूरचे मंदिर आंदाेलन, राजराजेश्वराच्या मंदिरात जाऊन दर्शन, बिहारच्या निवडणुकीत मित्रपक्षांना मदत, युवा आघाडीकडे लक्ष, प्रत्येक विषयावर मत व्यक्त करतीलच असे प्रवक्ते असा सर्व बदल वंचितने जाणीवपूर्वक केलाच; साेबतच जिल्हा परिषदेवरची सत्ता कायम ठेवत आपली ताकदही कायम ठेवली. ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी राज्यात स्वत:ला चर्चेत ठेवत विराेधी पक्षांची माेठी स्पेस भरून काढण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी सर्वस्पर्शी असे मुद्दे शाेधून लाॅकडाऊनमध्येही राजकारण रंगत ठेवले. सरत्या वर्षात त्यांच्या पक्षाचे दाेन माजी आमदार मात्र पक्ष साेडून गेले. आपणच माेठी केलेली मंडळी आपल्याला का साेडून जातात? याचे मूल्यमापन व चिंतन याही वर्षात वंचितने केल्याचे दिसून आले नाही. हेसुद्धा सातत्यच म्हणावे लागेल.

राष्ट्रवादी

अखेर आमदार मिळालाच!

राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेत जागांचा टक्का वाढविला. पक्ष संघटना जिल्हाभर कार्यरत ठेवली. पक्षातील इनकमिंग वाढले. दाेन माजी आमदारही पक्षात दाखल झाले. दुसरीकडे विधान परिषदेत आ. अमाेल मिटकरी यांना संधी मिळाली. राष्ट्रवादी महानगर अध्यक्षपदाचे घाेंगडे मात्र भिजतच पडले आहे.

काँग्रेस

शांतता! आम्ही सत्तेत आहाेत

राज्यातील सत्तेत वाटेकरी असलेली काँग्रेस अकाेल्यात मात्र शांत आहे. केंद्र सरकारच्या विराेधातील विविध आंदाेलनांचे आले तसे नियाेजन करून त्याची कार्यवाही करण्याची काम काँग्रेसने केले. अजूनही जिल्हा समित्या गठीत झाल्या नाहीत. पालकमंत्र्यांचा साधा कार्यक्रमही काँग्रेसला कळविला जात नाही. दुसरीकडे जिल्हाध्यक्ष व महानगराध्यक्ष पदांसाठी बाशिंग बाधून असलेल्यांना पक्षश्रेष्ठींनी दिलेला थांबा कायमच आहे.

शिवसेना

सबकुछ नितीन देशमुख

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि सत्तेतील आमदार या दाेन्ही जबाबदाऱ्या नितीन देशमुख यांच्याकडे असल्याने त्यांनी मिळालेल्या संधीचे साेने करीत सत्ता कशी राबवावी हे दाखवून दिले. पक्षातील अंतर्गत विराेधकांनाही शांत व समान अंतरावर ठेवून त्यांनी सेनेवर एकहाती पकड निर्माण केलीच; मात्र भाजपला काेंडीत पकडण्याची एकही संधी साेडलेली नाही. बाळापूर मतदारसंघ हा त्यांचा एकमेव अजेंडा असणे स्वाभाविकच आहे पण जिल्हाप्रमुख म्हणून इतर तालुक्यांना कमी संधी देणे भविष्यात अडचणीचे ठरण्याची पेरणीही याच सरत्या वर्षात झाली आहे हे मान्य करावे लागेल.

पालकमंत्री आहेत, पण पालकत्वाचे काय?

अकाेल्याला आयात पालकमंत्री मिळाले असले तरी बच्चू भाऊ यांची शैली अन् सामाजिक भान लक्षात घेता त्यांच्याकडून अकाेलेकरांना माेठ्या अपेक्षा हाेत्या. मात्र बच्चू भाऊ यांचा जीव त्यांच्याच मतदारसंघात अन् फारफार तर अकाेटातच अडकल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी आवाहन केलेला जनता कर्फ्यू त्यांनाच मागे घ्यावा लागला. पालकमंत्री म्हणून त्यांनी निराधार, अनाथ व अपंगांसाठीच्या याेजनांकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले ही त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरली तरी प्रशासकीय पकड अन् नेतृत्वाचा धाक तयार करून प्रहार करताना ते फारसे दिसले नाहीत.

काळाच्या पडद्याआड

माजी आमदार डाॅ. जगन्नाथ ढाेणे

दादाराव मते पाटील

रमेश मामा म्हैसने

नगरसेवक ॲड. धनश्री देव

संताेष शेगाेकार नंदा पाटील