शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
2
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
3
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
4
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
5
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
6
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
7
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
8
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
9
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
10
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
11
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
12
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
13
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
14
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
15
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
16
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
17
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
18
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
19
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
20
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई

कृषीमंत्र्यांच्या दौऱ्यावरून राजकारण तापले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:19 IST

जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तसेच सत्तारुढ शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकार स्थापन झाल्यापासून सातत्याने लोकप्रतिनिधींचा अपमान करीत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात ...

जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तसेच सत्तारुढ शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकार स्थापन झाल्यापासून सातत्याने लोकप्रतिनिधींचा अपमान करीत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या बैठकांना भाजपच्या लोकप्रतिनिधींना जाणीवपूर्वक डावलण्यात येत असल्याचा आरोप भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तेजराव थोरात पाटील यांनी केला आहे. इतर पक्षाच्या लोकप्रतिनिधींना मात्र, निमंत्रणे दिली जातात. कृषिमंत्री दादाजी भुसे व पालकमंत्री बच्चू कडू हे बैठकीपासून भाजप लोकप्रतिनिधींना दूर ठेवण्याचा प्रकार करीत असल्याचा आरोपही थोरात यांनी केला आहे. हा भाजपच्या लोकप्रतिनिधींचा अपमान नसून, जनतेचा अपमान आहे. त्यामुळे भाजप याला योग्यवेळी उत्तर देईलच. असा इशाराही त्यांनी दिला आहे.

बैठकीपासून दूर ठेवण्यामागे हेतू काय?

भाजपचे लोकप्रतिनिधी नुकसानग्रस्त भागाचा दौरा करून जनतेला दिलासा देत असताना, त्यांना बैठकीत न बोलाविण्यामागे काय हेतू आहे. असा सवाल करून जिल्ह्यातील मतदारांचा अपमान सहन केला जाणार नाही. असा इशारा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व प्रदेश कार्यकारिणी सदस्य तेजराव थोरात यांनी दिला आहे.

आढावा बैठक घेऊन काय साध्य केले?

कृषिमंत्री दादाजी भुसे अकोला दौऱ्यावर आले. अकोला पूर्व मतदारसंघातील काही गावांमधील शेती नुकसानीचा आढावा घेतला. त्यांच्याकडून भरघोस मदतीची अपेक्षा होती. परंतु आढावा बैठक घेऊन काय साध्य झाले. शेतकऱ्यांसाठी कोणती घोषणा केली. काय आश्वासने दिली? कोणत्या समस्यांचे निराकरण केले. आढावा बैठकीचा काय फायदा झाला. असा सवाल आमदार रणधीर सावरकर यांनी उपस्थित केला.

कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांची रविवारी बैठक घेतली. या बैठकीचे भाजप आमदारांना निमंत्रण देण्यात आले नाही. पालकमंत्री बच्चू कडू यांच्या बाबतीतही तेच घडत आहे. भाजपचे आमदार अभ्यासपूर्ण मुद्दे उपस्थित करतात. त्याची उत्तरे त्यांच्याकडे नसतात. त्यामुळे जाणीवपूर्वक भाजपच्या आमदारांना बैठकीला बोलाविले जात नाही.

-रणधीर सावरकर आमदार व जिल्हाध्यक्ष भाजप

शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरले. घरे, अन्नधान्याचे नुकसान झाले. त्याकडे लक्ष देण्यापेक्षा सत्ताधारी पक्षाचे नेते पक्षभेद करीत आहेत. हे योग्य नाही. लोकप्रतिनिधी, महापौरांना बैठकीला बोलावून समस्या जाणून घ्यायला हव्या होत्या. परंतु दुदैवाने यात राजकारण होत आहे.

-विजय अग्रवाल, महानगराध्यक्ष भाजप