शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून लूट

By admin | Updated: May 29, 2017 01:32 IST

३.५० हजार क्विंटलच्या भावाने तुरीची खरेदी

संजय खांडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नाफेडने तूर खरेदीची मुदत वाढविली असली, तरी शेतकऱ्यांना त्याची रक्कम मिळण्यास वेळ लागणार आहे. त्याचा गैरफायदा अकोल्यातील काही व्यापारी घेत, तुरीच्या पिकाची नगद रक्कम हवी असलेल्या शेतकऱ्यांचे शोषण करीत आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांकडून साडेतीन हजार रुपये क्विंटलच्या भावाने तुरीची खरेदी केली जात असल्याचे धक्कादायक वृत्त हाती लागले आहे. अकोल्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये जवळपास १३० डाळ मिल आहेत. यापैकी बहुतांश डाळ मिल तुरीच्या आहेत. इतर डाळ मिलमध्ये चणा, उडीद, मूग आदी डाळी तयार होतात. दरवर्षी अकोला परिसरातील तुरीचा साठा अकोल्यातील व्यापारी आणि डाळ मिल उद्योजक करीत असतात. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला लुटण्याचे काम सुरू आहे. साडेतीन हजारांच्या पडक्या भावाने तुरीची छुप्या मार्गे खरेदी होत आहे. साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.पेरा कमी झाला तरच भाव वाढतूर डाळ महागल्याने राज्यात मोठ्या प्रमाणात तुरीचे पीक घेतले गेले; पण पीक भरपूर आल्याने भाव घसरले. त्यामुळे अप्रत्यक्ष तूर डाळीचे भावही कमी झाले. त्यामुळे यंदा महाराष्ट्रातील तुरीचा पेरा कमी होण्याचे संकेत आहेत. जर पेरा कमी झाला, तरच तुरीचे भाव वाढणार, अन्यथा तुरीला भाव मिळणार नाही, असेही बोलले जात आहे. महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, झारखंड, छत्तीसगड, बिहार आणि कर्नाटक या परिसरातही तुरीचा पेरा वाढला. त्यामुळे तूर आणि तूर डाळीची मागणी घसरली. त्याला हेदेखील दुसरे कारण आहे.मागील तुरीचा साठा तसाचअकोल्यातील शेकडो डाळ मिल उद्योजकांकडे मागील वर्षांचा चढ्याभावाने घेतलेला तूरडाळीचा साठा तसाच आहे. तुरीचे भाव वाढतील, या आशेने गुंतवणूक झाली होती; मात्र तुरीचे भाव गडगडल्याने आता मागील तुरीचा साठाच काढणे व्यापाऱ्यांना कठीण झाले आहे. एमआयडीसीत लाखो गोणी तुरीचा साठा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.