शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

बियाणे, खत पुरवठय़ाचा आराखडा

By admin | Updated: April 27, 2015 01:44 IST

९८ हजार क्विंटल बियाणे; ९२ हजार मेट्रिक टन खत पुरवठा करणार.

संतोष येलकर /अकोला: येत्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील अपेक्षित पेरणीचे क्षेत्र आणि बियाणे, कीटकनाशके व खतांच्या पुरवठय़ाचा आराखडा कृषी विभागामार्फत तयार करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात ९७ हजार ७५१ क्विंटल बियाणे आणि ७२ हजार ४00 मेट्रिक टन खतांचा पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावर्षीचा खरीप हंगाम सुरू होण्यास एक महिन्याचा कालावधी शिल्लक राहिला आहे. या पृष्ठभूमीवर खरीप हंगामाची पूर्वतयारी म्हणून जिल्हा परिषद कृषी विभाग आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील अपेक्षित पेरणीचे क्षेत्र, पेरणीसाठी मागणीनुसार शेतकर्‍यांना लागणारे बियाणे, खते व कीटकनाशकांच्या पुरवठय़ाबाबत आराखडा तयार करण्यात आला. त्यानुसार जिल्हय़ात सरासरी ४ लाख ८२ हजार ६२0 हेक्टर खरीप पेरणीचे क्षेत्र असून, त्या तुलनेत यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात ४ लाख ५५ हजार १00 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी प्रस्तावित आहे. खरीप पेरणीसाठी जिल्ह्यात ९७ हजार ७५१ क्विंटल बियाण्याची गरज प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामध्ये सोयाबीन, कपाशी, ज्वार, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, सूर्यफूल, तीळ इत्यादी बियाण्यांचा समावेश आहे. तसेच खरीप हंगामात जिल्ह्यातील सातही तालुक्यात ७२ हजार ४00 मेट्रिक टन विविध खतांचा पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.