शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

कीटकनाशक परवान्यांचे नूतनीकरण सुरूच!

By admin | Updated: May 23, 2017 01:25 IST

बंदीचा निर्णय धाब्यावर : कृषी आयुक्तांनी दिले आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कृषी साहित्य विक्री करणाऱ्या परवानाधारकांपैकी कीटकनाशकाची विक्री करणारांच्या परवान्याचे नूतनीकरणाची बाब वगळण्यात आल्यानंतरही राज्यात अनेक ठिकाणी हा प्रकार सुरू आहे, तो तातडीने बंद करावा, असा आदेश कृषी आयुक्तांनी दिला आहे. त्याचवेळी बियाणे आणि रासायनिक खत विक्रेत्यांना परवाने नूतनीकरणाचे भूत कायम असल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. कीटकनाशक विक्री करणाऱ्या परवानाधारकांची सोय शासनाने केली. त्यातून राज्यभरात शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या शुल्क वसुलीवर पाणी सोडण्यात आले आहे. कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या व्यावसायिकांना सातत्याने होणाऱ्या नूतनीकरणाच्या प्रक्रिया शुल्कातून सूट देण्यात आली. त्यासाठी केंद्र शासनाच्या कीटकनाशक नियम १९७२ मधील तरतूद वगळण्यात आली. ५ नोव्हेंबर २०१५ रोजी केंद्र शासनाने त्यासाठी अधिसूचना काढली. त्यामध्ये कीटकनाशक परवान्यांचे नूतनीकरण करणे, हे नियमातूनच वगळण्यात आल्याचे स्पष्ट केले. त्या दिवसापासूनच कीटकनाशक परवान्याचे नूतनीकरण करण्याची प्रक्रिया परवाना अधिकारी म्हणून जिल्हा परिषदांच्या कृषी विकास अधिकाऱ्यांनी थांबवणे आवश्यक होते. मात्र, तरीही परवाने नूतनीकरणाची प्रक्रिया राज्यभरात सुरूच असल्याची प्रकरणे आयुक्तालयांपर्यंत पोहोचली. त्यावर सर्वच कृषी विकास अधिकारी परवाने नूतनीकरणाची प्रक्रिया राबवत असल्याचे आयुक्त कार्यालयाने निदर्शनास आणून देत, यापुढे कायद्यानुसार परवाने देण्याची कार्यवाही सुरू ठेवावी, असा आदेशच कृषी आयुक्तांनी २० मे २०१७ रोजी दिला. त्यानुसार आता परवाना नूतनीकरणाची प्रक्रिया थांबणार आहे. शासनाच्या कोट्यवधींच्या महसुलावर पाणी!कृषी विभागाकडून बियाणे, खते, कीटकनाशके परवाने दिले जातात. त्या परवान्यांचे विहित मुदतीनंतर नूतनीकरण केले जाते. बियाणे आणि खत विक्रेत्यांनाच परवाना नूतनीकरण करणे आणि शासनाला शुल्क भरावे लागणार आहेत. त्यातून कीटकनाशक विक्रेत्यांना सूट देण्यात आली आहे. राज्यभरातील कीटकनाशक विक्रेत्यांची संख्या आणि त्यांच्याकडून ग्रामीणसाठी १५००, शहरी भागासाठी ७५०० रुपये प्रमाणे वसूल होणारी शुल्काची रक्कम पाहता शासनाला दरवर्षी १० ते १३ कोटी रुपये महसुलावर पाणी सोडावे लागले आहे.