शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

कीटकनाशक परवान्यांचे नूतनीकरण सुरूच!

By admin | Updated: May 23, 2017 01:25 IST

बंदीचा निर्णय धाब्यावर : कृषी आयुक्तांनी दिले आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कृषी साहित्य विक्री करणाऱ्या परवानाधारकांपैकी कीटकनाशकाची विक्री करणारांच्या परवान्याचे नूतनीकरणाची बाब वगळण्यात आल्यानंतरही राज्यात अनेक ठिकाणी हा प्रकार सुरू आहे, तो तातडीने बंद करावा, असा आदेश कृषी आयुक्तांनी दिला आहे. त्याचवेळी बियाणे आणि रासायनिक खत विक्रेत्यांना परवाने नूतनीकरणाचे भूत कायम असल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. कीटकनाशक विक्री करणाऱ्या परवानाधारकांची सोय शासनाने केली. त्यातून राज्यभरात शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या शुल्क वसुलीवर पाणी सोडण्यात आले आहे. कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या व्यावसायिकांना सातत्याने होणाऱ्या नूतनीकरणाच्या प्रक्रिया शुल्कातून सूट देण्यात आली. त्यासाठी केंद्र शासनाच्या कीटकनाशक नियम १९७२ मधील तरतूद वगळण्यात आली. ५ नोव्हेंबर २०१५ रोजी केंद्र शासनाने त्यासाठी अधिसूचना काढली. त्यामध्ये कीटकनाशक परवान्यांचे नूतनीकरण करणे, हे नियमातूनच वगळण्यात आल्याचे स्पष्ट केले. त्या दिवसापासूनच कीटकनाशक परवान्याचे नूतनीकरण करण्याची प्रक्रिया परवाना अधिकारी म्हणून जिल्हा परिषदांच्या कृषी विकास अधिकाऱ्यांनी थांबवणे आवश्यक होते. मात्र, तरीही परवाने नूतनीकरणाची प्रक्रिया राज्यभरात सुरूच असल्याची प्रकरणे आयुक्तालयांपर्यंत पोहोचली. त्यावर सर्वच कृषी विकास अधिकारी परवाने नूतनीकरणाची प्रक्रिया राबवत असल्याचे आयुक्त कार्यालयाने निदर्शनास आणून देत, यापुढे कायद्यानुसार परवाने देण्याची कार्यवाही सुरू ठेवावी, असा आदेशच कृषी आयुक्तांनी २० मे २०१७ रोजी दिला. त्यानुसार आता परवाना नूतनीकरणाची प्रक्रिया थांबणार आहे. शासनाच्या कोट्यवधींच्या महसुलावर पाणी!कृषी विभागाकडून बियाणे, खते, कीटकनाशके परवाने दिले जातात. त्या परवान्यांचे विहित मुदतीनंतर नूतनीकरण केले जाते. बियाणे आणि खत विक्रेत्यांनाच परवाना नूतनीकरण करणे आणि शासनाला शुल्क भरावे लागणार आहेत. त्यातून कीटकनाशक विक्रेत्यांना सूट देण्यात आली आहे. राज्यभरातील कीटकनाशक विक्रेत्यांची संख्या आणि त्यांच्याकडून ग्रामीणसाठी १५००, शहरी भागासाठी ७५०० रुपये प्रमाणे वसूल होणारी शुल्काची रक्कम पाहता शासनाला दरवर्षी १० ते १३ कोटी रुपये महसुलावर पाणी सोडावे लागले आहे.