शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांना दिली कोरी देयके!

By admin | Updated: February 29, 2016 02:30 IST

वांझोटी केळी रोपे प्रकरणात आणखी खुलासा; देयकांवर ना परवाना क्रमांक, ना नोंदनीक्रमांक.

आकोट/पातूर: केळीची वांझोटी रोपे देऊन शेतकर्‍यांची फसवणूक केल्याप्रकरणी धक्कादायक माहिती उजेडात येत असून, शेतकर्‍यांना इंद्रायणी अँग्रोटेकची कोरी देयके देण्यात आल्याचे समोर आले आहे. यावर इंद्रायणी अँग्रोटेकतर्फे स्वाक्षरीही करण्यात आली असून, देयकावर ना परवाना क्रमांक आहे, ना जैवतंत्रज्ञान विभागाचा नोंदणी क्रमांक. आकोट, तेल्हारा व पातूर तालुक्यातील शेतकर्‍यांनी केळी पिकाची लागवड केली होती. त्यांनी रमेश रामचंद्र आकोटकर यांच्या इंद्रायणी अँग्रोटेककडून केळीची रोपांसाठी मागणी नोंदविली. मात्र, प्रत्यक्षात शेतकर्‍यांना माउली हायटेक नर्सरी (मु.पो. सेलू. ता. खेड, जि. पुणे) या कंपनीची रोपे पुरविण्यात आली होती. या रोपांची लागवड केल्यानंतर पिकांची वाढ खुंटली. शेतकर्‍यांचे यामुळे जवळपास ६0 लाखपेक्षा जास्त रुपयांचे नुकसान झाले होते. याबाबत तीन कंपन्यांसह रमेश आकोटकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बनवाबनवीचा कळसनिकृष्ट व उत्पादनक्षमता नसलेली केळी रोपे जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांना पुरविण्यात आली. यासाठी शेतकर्‍यांना अग्रिम रक्कम भरण्यास सांगण्यात आली. शेतकर्‍यांनी ही रक्कमही भरली. अग्रिम रक्कम भरताना त्यांना इंद्रायणी अँग्रोटेकची पावती देण्यात आली. नंतर केळी रोपे देताना देयक मात्र माउली हायटेक नर्सरीचे देण्यात आले. यावर काही शेतकर्‍यांनी आक्षेप घेतला. नोंदणीच्या वेळी इंद्रायणी अँग्रोटेकची पावती व केळी रोपे देताना मात्र माउली नर्सरीचे देयक का, असा सवाल काही शेतकर्‍यांनी उपस्थित केला. त्यावेळी शेतकर्‍यांना इंद्रायणी अँग्रोटेकची कोरी देयके देण्यात आली.

देयकावर हवी माहितीकृषितज्ज्ञांच्या तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीने आंबोडा येथील केळी पिकाची पाहणी केली होती. कंपनीने दिलेल्या देयकावर परवाना क्रमांक, बॅच क्रमांक, उत्पादन तिथी व अंतिम वैधतेच्या दिनाकांचा उल्लेख नाही. देयकावर शेतकर्‍याची स्वाक्षरीही नाही. वास्तविक, देयकावर परवाना क्रमांक छापणे अनिवार्य आहे. त्यामुळे कंपनीने बियाणे कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे.

अनुदान मिळणे कठीणकेळी रोपे पुरविणार्‍या कंपनीकडे शासनाच्या विविध विभागांचे परवाने, नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक असते. ही प्रकिया पूर्ण न करणार्‍या कंपनीकडून केळी रोपे घेतल्यास संबंधित शेतकर्‍याला अनुदान मिळणे कठीण होणार आहे.

नुकसानभरपाई देण्याची मागणी केळीची बोगस रोपे देऊन फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. तूर्तास तरी सुमारे एक कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. त्यामुळे या संबंधित तीनही कंपनींकडून नुकसानभरपाई वसूल करून ही रक्कम शेतकर्‍यांना देण्यात यावी, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.

कलमे वाढविणे आवश्यक कंपन्यांनी बनावट पावती पुस्तके छापल्याचा व संगनमताने रोपे पुरवठा केल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये (प्रथम खबरी अहवाल) आहे. त्यामुळे पोलिसांनी गुन्ह्यात भादंविचे कलम ४६८ (बनावट दस्तावेज तयार करणे), ४७१ (बनावट दस्तावेज खरे असल्याचे भासवून वापरणे), १२0 (२) ( संगनमत, कटात सहभागी होणे) ही कलमे वाढवावी, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.